शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
2
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
3
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
4
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
5
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
6
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
7
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
8
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
9
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
10
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
11
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
12
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
13
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
14
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
15
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!
16
ही तरुणी बनणार मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती, कोण आहे एलिसा कार्सन, म्हणते सुखरूप परतले तर...
17
'डियर क्रिकेट... डोन्ट गिव्ह वन मोअर चान्स' असं म्हणायची वेळ! करुण नायर चौथ्या प्रयत्नातही 'नापास'
18
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
19
Sushil Kedia Office Vandalise: सुशील केडिया यांच्या मुंबईतील कार्यालयाची तोडफोड, मनसेच्या ५ कार्यकर्त्यांना अटक
20
Himachal Flood : पावसाचे थैमान! ७२ जणांचा मृत्यू, ३७ बेपत्ता; हिमाचलमध्ये ढगफुटीमुळे नुकसान, रेड अलर्ट जारी

राष्ट्रीयकृत बँकांना जिल्हाधिकाऱ्यांनी फटकारले

By admin | Updated: March 30, 2015 02:04 IST

शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यास राष्ट्रीयकृत बँका टाळाटाळ करीत असल्याचा नेहमीचा अनुभव आहे.

यवतमाळ : शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यास राष्ट्रीयकृत बँका टाळाटाळ करीत असल्याचा नेहमीचा अनुभव आहे. यावर्षीही राष्ट्रीयकृत बँकांनी दिलेल्या उद्दिष्टाच्या केवळ ४७ टक्केच कर्ज वितरण केले. त्यामुळे शेतकऱ्यांना सावकाराकडे धाव घ्यावी लागली. हा प्रकार भविष्यात घडू नये, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेल्या बैठकीत राष्ट्रीयकृत बँकांच्या व्यवस्थापकांना चांगलेच फटकारल्याची माहिती आहे.जिल्हा बँकेसोबतच राष्ट्रीयकृत बँकांनाही पीक कर्ज वाटपाचे उद्दीष्ट दिले जाते. यावर्षी जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँकांना ८८० कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होेते. मात्र या बॅँकांनी केवळ ४१० कोटी रुपयांचेच कर्ज वितरित केले. उद्दिष्टाच्या तुलनेत हे कर्ज वाटप केवळ ४७ टक्क्याच्या घरात आहे. शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी पीक कर्ज महत्वाचे असते. यावरच शेतीचा डोल्हारा अवलंबून असतो. यानंतरही राष्ट्रीयकृत बँका शेतकऱ्यांना कर्ज वितरण करण्यासाठी टाळाटाळ करतात. शेतकऱ्यांना कर्ज वितरित केल्यानंतर ते परतफेड करणार की नाही याबाबत शंका व्यक्त करण्यात येते. गत काही वर्षाचा हा अनुभव आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी आगामी पीक कर्ज वाटपासंदर्भात बँकेच्या व्यवस्थापकांची बैठक घेतली. या बैठकीत कर्ज वाटपाचे उद्दीष्ट पूर्ण न करणाऱ्या बँकांना चांगलेच फटकारल्याची माहिती आहे. तसेच दुष्काळी मदत वाटपाच्या यादीत नाव नसल्याचे कारण पुढे करीत अनेकांना मदत मिळाली नाही. या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी राष्ट्रीयकृत बँकेच्या व्यवस्थापकांना अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. (शहर वार्ताहर)