शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझं बालवाङ्मय वाचण्याचं वय राहिलेलं नाही"; CM देवेंद्र फडणवीसांचा संजय राऊतांना खोचक टोला
2
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार
3
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
4
Kedarnath Weather Alert: केदारनाथला जात आहात! जाणून घ्या, पुढील ५ दिवस कसे असणार हवामान?
5
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
6
'भाजपवर शंका घेणाऱ्यांनी पाकिस्तानात...' शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांचे मोठे वक्तव्य
7
सचिन तेंडुलकर, धोनीनंतर आता रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनाही मिळणार 'हा' सन्मान?
8
डिफेन्स शेअर्सची घोडदौड सुरुच; मिड आणि स्मॉलकॅपमध्येही तेजी, 'या' स्टॉक्सना मोठं नुकसान
9
Astrology: १७ मे, गजकेसरी योगात शनिकृपेचा ५ राशींवर वर्षाव; घडणार अविस्मरणीय घटना!
10
Astro Tips: शनिवारी सायंकाळी पिंपळपारावार लावा पंचदिप; भाग्योदय येईल समीप!
11
"मला त्यांचं तोंडही पाहायचं नाही..", पाकिस्तानी वडिलांचा प्रचंड द्वेष करते ही अभिनेत्री
12
ना रस्ता... ना बस, मोबाइलला तर रेंजही नाही; अखेर गावकऱ्यांनी बीडमधील वाडीच काढली विक्रीला!
13
अनुष्का तिवारी नाही, कारागिरांसारखी मुलं करत होती शस्त्रक्रिया! 'हेअर ट्रान्सप्लांट' प्रकरणात धक्कादायक खुलासा
14
डोकं फिरलंया! फायटर जेट पाडून भारताने लावली पाकची वाट, तरी इशाक दार यांनी थोपटली त्यांच्या वायुदलाची पाठ
15
परेश रावल यांची 'हेरा फेरी ३' मधून एक्झिट! समोर आलं कारण; चाहत्यांची घोर निराशा
16
टीम कुक यांनी ट्रम्प यांचा सल्ला का धुडकावला? अ‍ॅपल अमेरिकेला स्थलांतरीत केल्यास काय होईल?
17
COVID 19 : हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोना परतला, रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ
18
पाकला पाठिंबा देणं तुर्कस्तान आणि अझरबैजानच्या अंगलट! भारताने थेट वर्मावरच घातला घाव
19
Rajnath Singh : "ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही; हा फक्त ट्रेलर, योग्य वेळ आल्यावर पूर्ण चित्रपट दाखवू"
20
माऊंट एव्हरेस्टवर भारतीय गिर्यारोहकाचा मृत्यू, शिखर सर करून परतताना घडली दुर्घटना

राष्ट्रीयकृत बँकांना जिल्हाधिकाऱ्यांनी फटकारले

By admin | Updated: March 30, 2015 02:04 IST

शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यास राष्ट्रीयकृत बँका टाळाटाळ करीत असल्याचा नेहमीचा अनुभव आहे.

यवतमाळ : शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यास राष्ट्रीयकृत बँका टाळाटाळ करीत असल्याचा नेहमीचा अनुभव आहे. यावर्षीही राष्ट्रीयकृत बँकांनी दिलेल्या उद्दिष्टाच्या केवळ ४७ टक्केच कर्ज वितरण केले. त्यामुळे शेतकऱ्यांना सावकाराकडे धाव घ्यावी लागली. हा प्रकार भविष्यात घडू नये, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेल्या बैठकीत राष्ट्रीयकृत बँकांच्या व्यवस्थापकांना चांगलेच फटकारल्याची माहिती आहे.जिल्हा बँकेसोबतच राष्ट्रीयकृत बँकांनाही पीक कर्ज वाटपाचे उद्दीष्ट दिले जाते. यावर्षी जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँकांना ८८० कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होेते. मात्र या बॅँकांनी केवळ ४१० कोटी रुपयांचेच कर्ज वितरित केले. उद्दिष्टाच्या तुलनेत हे कर्ज वाटप केवळ ४७ टक्क्याच्या घरात आहे. शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी पीक कर्ज महत्वाचे असते. यावरच शेतीचा डोल्हारा अवलंबून असतो. यानंतरही राष्ट्रीयकृत बँका शेतकऱ्यांना कर्ज वितरण करण्यासाठी टाळाटाळ करतात. शेतकऱ्यांना कर्ज वितरित केल्यानंतर ते परतफेड करणार की नाही याबाबत शंका व्यक्त करण्यात येते. गत काही वर्षाचा हा अनुभव आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी आगामी पीक कर्ज वाटपासंदर्भात बँकेच्या व्यवस्थापकांची बैठक घेतली. या बैठकीत कर्ज वाटपाचे उद्दीष्ट पूर्ण न करणाऱ्या बँकांना चांगलेच फटकारल्याची माहिती आहे. तसेच दुष्काळी मदत वाटपाच्या यादीत नाव नसल्याचे कारण पुढे करीत अनेकांना मदत मिळाली नाही. या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी राष्ट्रीयकृत बँकेच्या व्यवस्थापकांना अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. (शहर वार्ताहर)