शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
5
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
6
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
7
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
8
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
9
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
10
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
11
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
12
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
13
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
14
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
15
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
16
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
17
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
18
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
19
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
20
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...

जिल्ह्यातील रेतीघाट चोरट्यांच्या निशाण्यावर

By admin | Updated: October 26, 2014 22:46 IST

तब्बल महिनाभरापूर्वी जिल्ह्यातील रेती घाटांची मुदत संपली. मात्र अद्यापही रेतीघाट लिलावाच्या प्रक्रियेला प्रारंभ झाला नाही. अशा स्थितीत रेतीघाट चोरट्यांच्या निशाण्यावर असून जिल्ह्यातील रेती घाटातून

३० सप्टेंबरला मुदत संपली : परवानगीसाठी लिलाव खोळंबलेयवतमाळ : तब्बल महिनाभरापूर्वी जिल्ह्यातील रेती घाटांची मुदत संपली. मात्र अद्यापही रेतीघाट लिलावाच्या प्रक्रियेला प्रारंभ झाला नाही. अशा स्थितीत रेतीघाट चोरट्यांच्या निशाण्यावर असून जिल्ह्यातील रेती घाटातून दररोज शेकडो ब्रास रेती शहरात पोहोचत आहे. भूजल सर्वेक्षण विभागाने लिलावाला मंजुरी दिली असली तरी पर्यावरण विभागाने अद्यापही परवानगी दिली नाही. त्यामुळे लिलाव प्रक्रिया खोळंबली आहे.यवतमाळ जिल्ह्यात २९५ रेती घाट आहेत. नदी, नाल्यावर असलेल्या या रेती घाटांमध्ये मोठ्या प्रमाणात रेतीचा साठा आहे. मात्र अद्यापही या रेती घाटांचा लिलाव झाला नाही. विशेष म्हणजे खनिकर्म विभागाने २०१३ मध्ये लिलाव केलेल्या घाटांची मुदत ३० सप्टेंबर रोजी संपली आहे. त्यामुळे कंत्राटदारांंचा घाटावरील ताबा संपुष्टात आला आहे. ही मुदत संपण्यापूर्वी जिल्हा खनिकर्म विभागाकडून रेती घाटांचा लिलाव प्रक्रिया पूर्ण करणे अपेक्षित होते. परंतु प्रत्यक्षात रेती घाटाची लिलाव प्रक्रिया खोळंबली आहे. अधिक माहिती घेतली असता रेती घाट असलेल्या सर्व ग्रामपंचायतींनी लिलावासाठी परवानगी दिली आहे. असे प्रस्ताव जिल्हा प्रशासनाला पाठविण्यात आले. त्यातील ९५ रेती घाटांचे लिलाव करण्याची मंजुरी भूजल सर्वेक्षण विभागाने दिली आहे. मात्र पर्यावरण विभागाने अद्याप एकाही रेती घाटाला परवानगी दिली नाही. त्यामुळे लिलाव खोळंबला आहे. गतवर्षी रेती घाटांच्या लिलावातून प्रशासनाला १७ कोटींचा महसूल मिळाला होता. यावर्षी आलेल्या निवडणुका आणि दिवाळीमुळे रेती घाटांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले. अशा स्थितीत रेती माफियांनी घाटांवरून रेती चोरण्याचा सपाटा लावला आहे. रात्रीच्या वेळी ट्रक-ट्रॅक्टरद्वारे रेती चोरुन शहरात आणल्या जाते. शहराबाहेर रेतीचे मोठे ढिगारे तयार झाले आहे. पुसद, उमरखेड, महागाव या तालुक्यातून वाहणाऱ्या पैनगंगा नदीवर रेतीचे अनेक घाट आहेत. या घाटांमध्ये मोठ्या प्रमाणात रेती साठा आहे. परंतु या घाटांची मुदत संपली असून नवीन लिलाव प्रक्रिया झाली नाही. तरीही या घाटांवर अनेक वाहने रेती चोरताना दिसून येतात. राजरोसपणे सुरू असलेल्या या प्रकाराकडे महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. निवडणुकीच्या काळात महसूल प्रशासन व्यस्त होते. त्यामुळे दुर्लक्ष झाले. त्यानंतर दिवाळी आली. सुट्यांमुळे कुणीही घाटांवर लक्ष दिले नाही. याचा फायदा रेती माफियांनी घेत रेती चोरीचा सपाटा लावला आहे. (शहर वार्ताहर)