शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

जिल्ह्यातील रेतीघाट चोरट्यांच्या निशाण्यावर

By admin | Updated: October 26, 2014 22:46 IST

तब्बल महिनाभरापूर्वी जिल्ह्यातील रेती घाटांची मुदत संपली. मात्र अद्यापही रेतीघाट लिलावाच्या प्रक्रियेला प्रारंभ झाला नाही. अशा स्थितीत रेतीघाट चोरट्यांच्या निशाण्यावर असून जिल्ह्यातील रेती घाटातून

३० सप्टेंबरला मुदत संपली : परवानगीसाठी लिलाव खोळंबलेयवतमाळ : तब्बल महिनाभरापूर्वी जिल्ह्यातील रेती घाटांची मुदत संपली. मात्र अद्यापही रेतीघाट लिलावाच्या प्रक्रियेला प्रारंभ झाला नाही. अशा स्थितीत रेतीघाट चोरट्यांच्या निशाण्यावर असून जिल्ह्यातील रेती घाटातून दररोज शेकडो ब्रास रेती शहरात पोहोचत आहे. भूजल सर्वेक्षण विभागाने लिलावाला मंजुरी दिली असली तरी पर्यावरण विभागाने अद्यापही परवानगी दिली नाही. त्यामुळे लिलाव प्रक्रिया खोळंबली आहे.यवतमाळ जिल्ह्यात २९५ रेती घाट आहेत. नदी, नाल्यावर असलेल्या या रेती घाटांमध्ये मोठ्या प्रमाणात रेतीचा साठा आहे. मात्र अद्यापही या रेती घाटांचा लिलाव झाला नाही. विशेष म्हणजे खनिकर्म विभागाने २०१३ मध्ये लिलाव केलेल्या घाटांची मुदत ३० सप्टेंबर रोजी संपली आहे. त्यामुळे कंत्राटदारांंचा घाटावरील ताबा संपुष्टात आला आहे. ही मुदत संपण्यापूर्वी जिल्हा खनिकर्म विभागाकडून रेती घाटांचा लिलाव प्रक्रिया पूर्ण करणे अपेक्षित होते. परंतु प्रत्यक्षात रेती घाटाची लिलाव प्रक्रिया खोळंबली आहे. अधिक माहिती घेतली असता रेती घाट असलेल्या सर्व ग्रामपंचायतींनी लिलावासाठी परवानगी दिली आहे. असे प्रस्ताव जिल्हा प्रशासनाला पाठविण्यात आले. त्यातील ९५ रेती घाटांचे लिलाव करण्याची मंजुरी भूजल सर्वेक्षण विभागाने दिली आहे. मात्र पर्यावरण विभागाने अद्याप एकाही रेती घाटाला परवानगी दिली नाही. त्यामुळे लिलाव खोळंबला आहे. गतवर्षी रेती घाटांच्या लिलावातून प्रशासनाला १७ कोटींचा महसूल मिळाला होता. यावर्षी आलेल्या निवडणुका आणि दिवाळीमुळे रेती घाटांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले. अशा स्थितीत रेती माफियांनी घाटांवरून रेती चोरण्याचा सपाटा लावला आहे. रात्रीच्या वेळी ट्रक-ट्रॅक्टरद्वारे रेती चोरुन शहरात आणल्या जाते. शहराबाहेर रेतीचे मोठे ढिगारे तयार झाले आहे. पुसद, उमरखेड, महागाव या तालुक्यातून वाहणाऱ्या पैनगंगा नदीवर रेतीचे अनेक घाट आहेत. या घाटांमध्ये मोठ्या प्रमाणात रेती साठा आहे. परंतु या घाटांची मुदत संपली असून नवीन लिलाव प्रक्रिया झाली नाही. तरीही या घाटांवर अनेक वाहने रेती चोरताना दिसून येतात. राजरोसपणे सुरू असलेल्या या प्रकाराकडे महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. निवडणुकीच्या काळात महसूल प्रशासन व्यस्त होते. त्यामुळे दुर्लक्ष झाले. त्यानंतर दिवाळी आली. सुट्यांमुळे कुणीही घाटांवर लक्ष दिले नाही. याचा फायदा रेती माफियांनी घेत रेती चोरीचा सपाटा लावला आहे. (शहर वार्ताहर)