शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमुक्तीसाठी ३३५ कोटींचा पहिला टप्पा जिल्ह्याला मिळाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2020 05:00 IST

कर्जमुक्ती योजनेला बहुप्रतीक्षेनंतर गती मिळण्याचे संकेत मिळाले आहे. यामुळे कर्जमुक्तीला पात्र ठरणाºया शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. महाविकास आघाडी सरकारने कर्जमुक्ती जाहीर केली. आणि कोरोनामुळे ही कर्जमुक्ती अडचणीत सापडली होती. यासंदर्भात राज्य शासनाने पुढाकार घेत कर्जमुक्ती योजनेत बँकाकडे थेट निधी वळता करण्याचे काम जिल्ह्यात हाती घेतले आहे.

ठळक मुद्दे४५ हजार शेतकऱ्यांची चिंता मिटणार : हजारो शेतकऱ्यांचे आधार प्रमाणिकरण झाले यशस्वी

रूपेश उत्तरवार।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेतील निम्या पात्र शेतकऱ्यांचा पहिला हप्ता बँकेला मिळाला आहे. यामुळे ४५ हजार शेतकºयांचे ३३५ कोटींचे कर्जमुक्त होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.कर्जमुक्ती योजनेला बहुप्रतीक्षेनंतर गती मिळण्याचे संकेत मिळाले आहे. यामुळे कर्जमुक्तीला पात्र ठरणाºया शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. महाविकास आघाडी सरकारने कर्जमुक्ती जाहीर केली. आणि कोरोनामुळे ही कर्जमुक्ती अडचणीत सापडली होती. यासंदर्भात राज्य शासनाने पुढाकार घेत कर्जमुक्ती योजनेत बँकाकडे थेट निधी वळता करण्याचे काम जिल्ह्यात हाती घेतले आहे.संपूर्ण जिल्ह्यात एक लाख आठ हजार शेतकरी कर्जमुक्तीच्या योजनेत निवडण्यात आले होते. यातील ९८ हजार शेतकऱ्यांचे अर्ज कर्जमुक्तीसाठी अपलोड झाले. आठ हजार शेतकरी खाते कर्जमुक्तीला अपात्र ठरले आहेत. तर पाच हजार शेतकऱ्यांचे अर्ज अद्यापही कर्जमुक्तीच्या प्रक्रियेत आहे. ८५ हजार खाते कर्जमुक्तीला पात्र ठरले आहेत. त्यापैकी ६९ हजार खातेधारकांनी आधार अथेंटिकेशन पूर्ण केले आहे. अद्याप १६ हजार शेतकऱ्यांचे आधार अपडेशन बाकी आहे.६९ हजार खात्यापैकी ४५ हजार शेतकऱ्यांच्या खात्यातील ३३५ कोटी रूपयांची कर्ज रक्कम जिल्ह्याकडे वळती झाली आहे. यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँक, राष्ट्रीयीकृत बँका, ग्रामीण बँक आणि व्यापारी बँकाचा समावेश आहे. या कर्ज रकमेतून बँक शेतकऱ्यांचे खाते निल करण्याची प्रक्रिया राबविणार आहे. उर्वरित ४० हजार शेतकऱ्यांची कर्जमुक्ती अद्याप लांबणीवर आहे. त्यांच्यासाठी ३८५ कोटींची गरज आहे.दुसऱ्या टप्प्यासाठी हवे ३८५ कोटी रुपयेकर्जमुक्तीला पात्र ठरलेल्या ४० हजार शेतकऱ्यांच्या खात्यातील ३८५ कोटींची रक्कम अद्याप जिल्ह्याला प्राप्त व्हायची आहे. ही रक्कमही लवकर प्राप्त होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.जिल्ह्याला कर्जमुक्तीची ३३५ कोटींची रक्कम प्राप्त झाली आहे. बँकांनी हा अहवाल सादर केला आहे. यानंतरची कर्ज वितरणाची प्रक्रियाही बँका राबविणार आहे. यामुळे कर्जमुक्तीला गती मिळणार आहे.- रमेश कटके, जिल्हा उपनिबंधक, यवतमाळ

टॅग्स :Crop Loanपीक कर्जbankबँक