शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
3
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
4
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
5
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
6
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
7
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
8
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
9
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
10
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
11
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
12
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
13
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...
14
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
15
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
16
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
17
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
18
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
19
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
20
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली

खातेरावासीय भेटले जिल्हाधिकाऱ्यांना

By admin | Updated: November 10, 2015 03:10 IST

गेल्या काही महिन्यांपासून तालुक्यातील खातेरा येथील शेतकरी विजेच्या समस्येमुळे त्रस्त झाले. त्यांनी थेट शनिवारी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन समस्या कथन केली.

झरी : गेल्या काही महिन्यांपासून तालुक्यातील खातेरा येथील शेतकरी विजेच्या समस्येमुळे त्रस्त झाले. त्यांनी थेट शनिवारी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन समस्या कथन केली.कधी भारनियमन, तर कर कमी दाबाचा वीज पुरवठा होत असल्याने शेतकरी व ग्राहक कमालिचे वैतागले आहेत. कमी होल्टेजमुळे मोटारपंप सुरू होत नाही. अनेक ट्रान्सफार्मरवर अधिक जोडण्या करण्यात आल्याने मोटारपंपला पुरेसे व्होल्टेज मिळत नाही. दिवसभर भारनियमन असते. त्यामुळे ओलित करता येत नाही. रात्री होल्टेज वाढते म्हणून शेतकरी रात्र जागून काढत ओलित करतात. मात्र रात्रीही अनेकदा होल्टेज वाढतच नाही.शेतकऱ्यांना सोयाबीनने दगा दिल्यानंतर आता परिसरातील मिरची पिकावरही रोग येत आहे. परिणामी काहींनी मिरची उपटून हरभराची पेरणी केली. मात्र वीज समस्येमुळे पीक कसे वाचवावे, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला. बहुतांश शेतकरी अल्पभूधारक आहे. त्यांनी पैसे जमा करून सिंचनाची व्यवस्था केली. मात्र विजेची समस्या असल्याने त्यांना ओलित करणेही आता कठीण झाले आहे. येथील महावितरणच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांशी फोनवर संपर्क केल्यास वरूनच वीज पुरवठा बंद असल्याचे सांगण्यात येते. मात्र या परिसरातील चुना भट्ट्यांना वीज पुरवठा व्यवस्थित मिळतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी काय गुन्हा केला, असा प्रश्न उपस्थित होत आहे. सध्या विद्यार्थ्यांच्या हिवाळी परीक्षा सुुरू आहे. त्यांना कमी होल्टेजमुळे अभ्यास करता येत नाही. शेतकऱ्यांनी आखलेली स्वप्नेही विजेअभावी धुळीस मिळत आहे. ही विजेची समस्या कायमची सोडवावी, हअशी मागणी खातेरावासीयांनी केली. तेथील प्रा.देविदास गायकवाड यांच्या नेतृत्वातील शेतकरी मंडळाने या समस्येबाबत थेट जिल्हाधिकारी व महावितरणचे अधीक्षक अभियंता यांची यवतमाळ येथे भेट घेतली. त्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी मनोहर ताजने, कवडू बुट्टे, शंकर भोयर, रंजीत गोडे, जगन उरकुडे, गंगाधर बांधे, पांडुरंग कोडापे, नितीन भोयर आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)