शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

जिल्हा बँकेचे पीक कर्जवाटप ठप्प

By admin | Updated: May 11, 2016 02:28 IST

राज्य सहकारी बँकेकडून अद्याप कर्ज मंजूर न झाल्याने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे पीक कर्ज वाटप शुक्रवारपासून

यवतमाळ : राज्य सहकारी बँकेकडून अद्याप कर्ज मंजूर न झाल्याने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे पीक कर्ज वाटप शुक्रवारपासून ठप्प झाले आहे. ही स्थिती आणखी चार ते पाच दिवस राहण्याची चिन्हे आहेत. कर्जासाठी जिल्हा बँकेच्या सर्वच शाखांमध्ये शेतकऱ्यांच्या रांगा असल्यातरी त्यांना काही दिवस तरी प्रतीक्षा करावी लागणार आहे. शासनाने राज्य सहकारी बँकेला ४२६ कोटी रुपयांच्या पीक कर्ज वाटपाचे उद्दीष्ट सन २०१६-१७ साठी निश्चित करून दिले आहे. बँकेने आतापर्यंत १२० कोटी रुपयांच्या पीक कर्जाचे वाटप केले आहे. परंतु आता बँकेचा पीक कर्ज वाटपासाठीचा निधी संपल्याने काही ठिकाणी कर्ज वाटपाची गती मंदावली आहे. तर बहुतांश ठिकाणी हे वाटप ठप्प झाले आहे. या मागे जिल्हा बँकेला अद्याप कर्ज मंजूर न झाल्याचे कारण सांगितले जाते. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने राज्य सहकारी बँकेकडे यंदाच्या हंगामासाठी ३०० कोटींच्या कर्जाची मागणी नोंदविली आहे. राज्य बँक त्यापैकी २३० कोटी रुपये कर्ज मंजूर करण्याची अपेक्षा आहे. परंतु अद्याप ते मंजूर केले गेले नाही. पर्यायाने जिल्हा बँकेचे कर्ज वाटप ठप्प पडले आहे. हे कर्ज तातडीने मंजूर व्हावे म्हणून जिल्हा बँकेने गतवर्षीच्या २३० कोटींच्या कर्जाची आधीच परतफेड केली आहे. त्यानंतरही राज्य बँक नव्या कर्ज मंजुरीस विलंब लावत असल्याने जिल्हा बँकेचे आर्थिक कोंडी झाली आहे. हे कर्ज मंजूर होण्यास शिखर बँकेत आणखी चार ते पाच दिवस लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. जिल्हा बँकेच्या ९१ शाखांमधून कर्ज वाटप केले जाते. मात्र बहुतांश शाखांमध्ये ‘निधी संपला’ हे मूळ कारण न सांगता चलन तुटवड्यामुळे पीक कर्ज वाटप मंदावल्याचे-ठप्प पडल्याचे तेथील यंत्रणेकडून शेतकऱ्यांना सांगितले जात आहे. शुक्रवार ६ मेपासून जिल्ह्यातील बहुतांश शाखांमध्ये पीक कर्ज वाटप थांबले आहे. प्रत्येकच शाखेत शेतकरी कर्जासाठी धडक देत आहे. मात्र त्यांना कर्जाशिवाय परत जावे लागत आहे. पैसाच नसल्याने बियाणे, खते कसे खरेदी करावे याचा पेच शेतकऱ्यांपुढे आहे. राज्य बँकेने कर्जाची लिमिट मंजूर न केल्याने आर्थिक अडचण निर्माण झाल्याची बाब जिल्हा बँकेच्या व्यवस्थापनाने कबूल केली आहे. (जिल्हा प्रतिनिधी) शासनाकडून हवे कर्जपुनर्गठणाचे दीडशे कोटी ४सततची नापिकी व दुष्काळी परिस्थितीमुळे शासनाने थकबाकीदार शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठण करण्याचे आदेश जारी केले आहे. त्याअनुषंगाने सेवा सहकारी सोसायटी स्तरावर पुनर्गठणाचे काम सुरू आहे. या सर्व सोसायट्यांच्या याद्या प्राप्त झाल्यानंतर जिल्हा बँक शासनाकडे या पुनर्गठित कर्जाच्या रकमेची मागणी करणार आहे. जिल्हा बँकेकडून सुमारे दीडशे कोटी रुपयांची मागणी केली जाऊ शकते. यातील १५ टक्के कर्ज शासन तर उर्वरित ८५ टक्के कर्ज नाबार्डकडून दिले जाते. त्याचा व्याजदर जिल्हा बँकेसाठी जास्त राहतो. दीडशे कोटींची ही रक्कम आल्यास जिल्हा बँकेच्या पीक कर्ज वाटपाची कोंडी फुटण्यास मदत होईल. शासन व नाबार्डने वेळीच पैसा उपलब्ध करून दिला तरच कर्जाचे पुनर्गठण व थकबाकीदार शेतकऱ्यांना नव्याने कर्ज देणे शक्य होणार असल्याचे बँकेच्या सूत्रांनी सांगितले. ४जिल्हा बँक यावर्षी किमान ३५० कोटी रुपयांच्या पीक कर्ज वाटपाचे नियोजन करीत आहे. त्यात ५५ हजार शेतकऱ्यांना कर्जाचा लाभ मिळणार आहे.४जुने कर्ज थकीत राहिल्याने एक लाख ४५ हजार शेतकरी नव्या पीक कर्जापासून वंचित राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ४वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना बँकेने नाकारल्यास सावकाराच्या दारी जाण्याशिवाय पर्याय उरणार नाही. तेथे हा शेतकरी पुन्हा व्याजचक्रात अडकण्याची भीती आहे.