शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
2
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
3
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
4
'मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते; राष्ट्रवादीने मराठ्यांचा वापर केला', प्रकाश सोळंकेंचा पक्षाला घरचा आहेर
5
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
6
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
7
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
8
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा
9
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
10
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?
11
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
12
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
13
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
14
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
15
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
16
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया
17
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
18
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
19
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
20
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण

जिल्हा बँकेचे व्यवहार कंत्राटी कर्मचाऱ्यांवर

By admin | Updated: July 10, 2015 02:22 IST

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला प्रभारी संचालक मंडळ असल्याने नोकर भरतीसारखे धोरणात्मक निर्णय घेता येत नाही.

लिपिकाच्या ४५० जागा रिक्त : संचालक मंडळ ‘प्रभारी’ असल्याचा परिणामयवतमाळ : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला प्रभारी संचालक मंडळ असल्याने नोकर भरतीसारखे धोरणात्मक निर्णय घेता येत नाही. नोकरभरतीला नाबार्ड मंजूरी देत नाही. पर्यायाने जिल्हा बँकेचे व्यवहार कंत्राटी कर्मचाऱ्यांवर चालवावे लागत आहे. सुमारे साडेसात वर्षांपासून जिल्हा बँकेत एकच संचालक मंडळ कार्यरत आहे. अडीच वर्षांपासून या संचालक मंडळाला मुदतवाढ दिली जात आहे. आता तर एका याचिकेच्या आडोशाने हे संचालक मंडळ आणखी पाच वर्षे कार्यरत राहते की काय, अशी चर्चा होवू लागली आहे. हे संचालक मंडळ कायम राहण्यामागे सत्ताधारी भाजपा-शिवसेनेच्या आमदारांची निष्क्रियता कारणीभूत ठरल्याचा सूर सहकारातून ऐकायला मिळतो आहे. प्रभारी संचालक मंडळ असल्याने जणू बँकेची घोडदौड-प्रगती थांबली आहे.बँकेत दर महिन्याला कुणीतरी कर्मचारी सेवानिवृत्त होतो आहे. त्यातून लिपिकाच्या तब्बल ४५० जागा रिक्त झाल्या आहेत. काऊंटरवर लिपिकच व्यवहार करीत असल्याने या जागा भरणे आवश्यक आहे. कोअर बँकिंग झाल्यनंतर आठ महिन्यांपूर्वी जिल्हा बँकेने ४५० जागांचा प्रस्ताव नाबार्डकडे मंजुरीसाठी पाठविला. मात्र संचालक मंडळच प्रभारी असल्याने या प्रस्तावाला मंजूरी मिळाली नाही. पर्यायाने तो तेथे पडून आहे. यावर उपाय म्हणून बीसीए, एमसीए झालेले तब्बल १४५ कंत्राटी कर्मचारी ११ महिन्यांसाठी नेमले जाणार आहे. त्यांच्यामार्फत आता बँकेचे व्यवहार होणार आहे. प्रभारी संचालक मंडळामुळे नव्या शाखा, एटीएम, बँकेच्या स्वत:च्या इमारती, ग्राहकांना आकर्षित करणाऱ्या योजना आदी प्रगतीची कामे थंड बस्त्यात पडून आहे. पूर्णवेळ संचालक मंडळ केव्हा येणार आणि ही कामे केव्हा मार्गी लागणार याचे काहीच निश्चित नाही. भाजप-सेनेचे प्रशासक नेमले जाणार, ही चर्चा आता केवळ थोतांड वाटू लागली आहे. कारण त्या दिशेने युतीच्या नेत्यांकडून कोणतेही प्रयत्न होताना दिसत नाही. प्रशासक होण्यास इच्छुक कार्यकर्त्यांनीही आता बँकेचा नाद सोडल्याचे सांगितले जाते. जिल्हा बँकेला १२ नवीन शाखांना मंजूरी मिळाली होती. यातील सात शाखा सुरू झाल्या आहेत. पुसद व दारव्हा विभागातील पाच शाखा अद्याप बाकी आहेत. बँकेच्या ८९ शाखा असून त्यातील केवळ २३ शाखा स्वत:च्या इमारतीत आहे. उर्वरित शाखा या ग्रामपंचायत कार्यालय, खरेदी-विक्री संघ व ग्राम विविध कार्यकारी सोसायट्यांच्या कार्यालयात थाटल्या गेल्या आहेत. तेथे पुरेशी सुरक्षा नसल्याने या बँक शाखा नेहमीच चोरट्यांच्या निशाण्यावर असतात. त्यातूनच अनेकदा बँक फोडणे, गैस कटरने तिजोरी कापणे असे प्रकार घडले आहेत. जिल्हा बँकेने आतापर्यंत ३०४ कोटी रुपयांच्या कर्जाचे वाटप केले असून ११३ कोटींचे पुनर्गठन झाले आहे. दुष्काळ जाहीर झाल्याने सक्तीची वसुली बंद आहे. पर्यायाने आतापर्यंत ३१३ कोटी रुपयेच वसूल होवू शकले. आणखी ४०० कोटी बाकी आहेत. या वसुलीतून जिल्हा बँकेने आपले राज्य बँकेचे कर्ज नील केले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)