शहरं
Join us  
Trending Stories
1
Sindhudurg: शिरोडा वेळागर समुद्रात आठ पर्यटक बेपत्ता, तिघांचे मृतदेह सापडले
2
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
3
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
4
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
5
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
6
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
7
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
8
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
9
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
11
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
12
बेडरूममध्ये कॅमेरा बसवून खासगी व्हिडीओ काढले अन् परदेशात...; पत्नीने समोर आलं पतीचे किळसवाणं कृत्य
13
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
14
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
15
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
16
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
17
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
18
भारीच! महागडे प्रोडक्ट सोडा... गळणाऱ्या केसांवर रामबाण उपाय; एकदा करून बघाच
19
“मुंबईच्या गरब्यात सेलिब्रिटींवर लाखोंची उधळण, तेच पैसे शेतऱ्यांना दिले असते”: रोहित पाटील
20
Video: अमानवीय! आधी टक्कर मारली, मग गाडीखाली चिरडले; बैलाची अतिशय क्रुर हत्या...

पीक कर्जमुक्तीसाठी जिल्हा बँकेचा करार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 05:00 IST

राज्य शासनाने महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजनेतून दोन लाखांपर्यंत कर्जमाफी जाहीर केली आहे. या योजनेत थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमुक्ती दिली जाणार होती. मात्र कोरोनामुळे हा कालावधी मार्चच्या पुढे गेला. ही सर्व खाते एनपीएमध्ये गेली. यामुळे आरबीआयने अशा थकीत खात्यांना नव्याने कर्ज देण्यासाठी कुठल्याही सूचना दिल्या नाही. यामुळे कर्जमुक्ती योजना थांबली आहे.

ठळक मुद्देराज्यात पहिल्यांदाच यवतमाळात : आयुक्तांच्या मंजुरीनंतर सुटणार कर्जमुक्तीचा तिढा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कर्जमुक्ती योजनेच्या अंमलबजावणीसाठी एसएलबीसीने (स्टेट लेव्हल बँकर्स कमिटी) कर्ज वितरणासाठी करारनाम्याचा फॉर्म्युला प्रसिद्ध केला आहे. या फॉर्म्युल्यानुसार जिल्हा मध्यवर्ती बँकेने कर्जमुक्ती देण्यासाठी आयुक्तांकडे अ‍ॅग्रीमेंट पाठविले आहे. यामुळे जिल्हा बँकेचा कर्जमुक्तीचा तिढा सुटणार आहे. यातून बँकेने शेतकऱ्यांचे थम्ब अथेन्टीकेशन सुरू केले आहे. राज्यातील हे पहिले अ‍ॅग्रीमेंट असणार आहे.राज्य शासनाने महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजनेतून दोन लाखांपर्यंत कर्जमाफी जाहीर केली आहे. या योजनेत थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमुक्ती दिली जाणार होती. मात्र कोरोनामुळे हा कालावधी मार्चच्या पुढे गेला. ही सर्व खाते एनपीएमध्ये गेली. यामुळे आरबीआयने अशा थकीत खात्यांना नव्याने कर्ज देण्यासाठी कुठल्याही सूचना दिल्या नाही. यामुळे कर्जमुक्ती योजना थांबली आहे.या संदर्भात राज्य शासनाने कर्ज वितरणाची हमी घेणारे अध्यादेश प्रसिद्ध केले. परंतु आरबीआयने कुठलीही हमी घेतली नाही. यामुळे जिल्हा बँका आणि राष्ट्रीयीकृत बँकांनी कर्ज वितरणाची प्रक्रिया थांबविली होती. यामधून जिल्ह्यातील एक लाख शेतकरी अडचणीत सापडले आहे. या शेतकºयांना साडेसातशे कोटी रुपयांची कर्जमाफी होणार आहे.आता अ‍ॅग्रीमेंट प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेने आयुक्तांकडे अ‍ॅग्रीमेंट पाठविले आहे. यामध्ये १ एप्रिल २०२० पासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत कर्ज रकमेवर मुद्दलासह व्याजाची रक्कम देण्याचे स्पष्ट केले आहे. सप्टेंबर अखेरपर्यंत शासनाने ही रक्कम बँकेच्या खात्यात वळती न केल्यास राज्य शासनाविरोधात बँकेला कायदेशीर कारवाई करण्याचा अधिकार मिळणार आहे. यामुळे जिल्हा मध्यवर्ती बँक कर्ज रक्कम मिळण्याची हमी मिळाल्याने कर्ज वितरणास तयार झाली आहे. आता अ‍ॅग्रीमेंटवर आयुक्तांची स्वाक्षरी झाल्यानंतर हा दस्तावेज मुख्य कार्यकारी अधिकाºयांकडे येणार आहे.१८ हजार शेतकरी माफीच्या प्रतीक्षेतअ‍ॅग्रीमेंटचा हा कागद संचालक मंडळापुढे ठेवण्यात येणार आहे. यानंतर कर्जमुक्ती प्रक्रियेला गती मिळणार आहे. तत्पूर्वी कर्जमुक्तीस पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना थम्ब अथेन्टीकेशन करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे १८ हजार शेतकरी कर्जमुक्तीस पात्र ठरले आहे. या शेतकऱ्यांना ३७ कोटी रुपयांचे कर्ज माफ होणार आहे.जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पात्र शेतकऱ्यांनी लगतच्या सीएससी सेंटरमध्ये जाऊन आपले थम्ब अ‍ॅथेन्टीकेशन करावे यामुळे अ‍ॅग्रीमेंट प्राप्त होताच कर्ज वितरणाच्या प्रक्रियेला गती मिळेल.- अरविंद देशपांडेमुख्य कार्यकारी अधिकारीजिल्हा सहकारी बँक, यवतमाळ.

टॅग्स :bankबँकCrop Loanपीक कर्ज