शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंच्या भेटीबाबत अनिल परबांनी सगळे सांगितले; म्हणाले, “युती, जागावाटप अन्...”
2
"एक मुस्लीम महिला म्हणून…!"; हिजाब ओढल्यावरून 'दंगल गर्ल' जायरा नीतीश कुमारांवर भडकली!
3
निवडणुका जाहीर होताच उद्धवसेनेला धक्का; माजी नगरसेवकांचा जय महाराष्ट्र, शिंदे गटात प्रवेश
4
“२०२९ मध्ये भाजपा विरुद्ध सर्व पक्ष असे चित्र दिसेल, राक्षसी महत्त्वाकांक्षा...”: रोहित पवार
5
IPL 2026 Auction : लिलावासाठी काव्या मारन नटली; सोशल मीडियावर तिच्या स्टायलिश Look ची चर्चा रंगली
6
Marriage: लग्नात आधी वधू वरमाला का घालते? त्यामागे काय आहे धार्मिक आणि सामाजिक कारण 
7
कष्टाचं फळ! आईसोबत शेतात केली मजुरी; ८ वेळा अपयश पण खचला नाही, झाला मोठा अधिकारी
8
विराट आणि अनुष्का पुन्हा एकदा पोहचले वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे घेतले आशीर्वाद
9
"अरे मर्दा, मागे तर बघ, आम्ही बिहारहून आलोय!" Vaibhav Suryavanshi याचा 'तो' व्हिडीओ व्हायरल
10
८ दिवसांत १८० टक्क्यांची तेजी; सातत्यानं 'या' शेअरला लागतंय अपर सर्किट, केडियांचीही आहे गुंतवणूक
11
पश्चिम बंगालमध्ये ५८ लाख मतदारांची नावे वगळली, निवडणूक आयोगाने नवी यादी केली प्रसिद्ध
12
IPL 2026 Auction: अखेरच्या क्षणी BCCI कडून यादीत बदल! टीम इंडियातून डावललेला खेळाडूही लिलावात दिसणार
13
धक्कादायक...! हल्लेखोर पिता-पूत्र भारताच्या पासपोर्टवर मनिलाला आलेले; फिलिपिन्सच्या दाव्याने खळबळ 
14
‘मनरेगा’चं नाव बदलण्याविरोधात प्रियंका गांधी आक्रमक, लोकसभेत सरकारला सुनावले खडेबोल
15
PAN-Aadhaar लिंक करण्याची अखेरची तारीख जवळ; विसरलात तर लागेल इतका दंड, पाहा स्टेप बाय स्टेप प्रोसिजर
16
ज्या ठिकाणी गायब होतात विमाने अन् जहाज...'त्या' बर्म्युडा ट्रॅंगलवर वैज्ञानिकांचा नवा खुलासा
17
जनरल याह्या खान, नियाझी 'मदिरा, महिलां'त अडकलेले...; बांगलादेश मुक्तीसंग्रामाचा रिपोर्ट पाकिस्तानने दडपलेला...
18
संजय राऊतांनी घेतली राज ठाकरेंची भेट; म्हणाले, “काँग्रेस आमच्यासोबत नाही, भाजपाला मदत...”
19
Video - मनालीला गेलेल्या पर्यटकासोबत 'स्नो स्कॅम'; युजर म्हणतात, "यापेक्षा जास्त बर्फ फ्रीजमध्ये"
20
फोल्डेबल आयफोनमध्ये काय काय मिळणार? अ‍ॅप्पलनं निश्चित केले फीचर्स, किंमत जाणून थक्क व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

अन्न सुरक्षा प्रकल्पाचे वाभाडे

By admin | Updated: November 11, 2014 22:48 IST

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत कृषी विभागामार्फत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बियाण्यांचे वाटप करण्यात येत आहे. वास्तविक बाजार भावापेक्षा कमी किमतीत आणि दर्जेदार असे बियाणे कृषी

शिवानंद लोहिया - हिवरीराष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत कृषी विभागामार्फत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बियाण्यांचे वाटप करण्यात येत आहे. वास्तविक बाजार भावापेक्षा कमी किमतीत आणि दर्जेदार असे बियाणे कृषी विभागाने द्यायला हवे. मात्र या धोरणाला हरताळ फासत शेतकऱ्यांची लूट केली जात आहे. बाजारात दोन हजार रुपये किमतीचे असलेले हरभरा बियाणे कृषी विभागामार्फत त्यातही शासनाच्या योजनेतून ३ हजार ३५० रुपये किमतीत विकले जात आहे. परिणामी शेतकऱ्यांनी या योजनेकडे पाठ फिरविली आहे.राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत शेतकऱ्यांना माफक दरात दर्जेदार बियाणे उपलब्ध करून देण्याचे शासनाचे धोरण आहे. हा प्रकल्प राबविल्या जाणाऱ्या गावांमध्ये जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी या बियाण्यांचा लाभ घ्यावा, यासाठी शासन प्रयत्नशिल आहे. कृषी विभागाच्या माध्यमातून जनहिताची ही योजना जिल्ह्यातील ग्रामीण भागात राबविली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून यवतमाळ तालुक्यातही तीन ठिकाणी ही योजना राबविली जात आहे. यवतमाळ तालुक्यातील भांबराजा, वरूड, मंगरूळ या तीन गावांसाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानामार्फत प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून संबंधित आणि परिसरातील गावांमध्ये सध्या रबी पीक लागवडीच्या तोंडावर हरभरा बियाण्यांचे वितरण करण्यात येत आहे. या प्रकल्पामार्फत हरभरा बियाण्यांसह रसायनांची किटच शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली जात आहे. मात्र अव्वाच्या सव्वा दराने या किट कृषी विभागामार्फत विकल्या जात आहे. ८० किलो हरभरा बियाणे, १० किलो झिंक सल्फेट, १० किलो फेरस, एचएनपीव्ही २५० ग्रॅम, एक लिटर निंबोळी अर्क, रायझोबियम, ट्रायकोट्राका आदी रसायनांचा या कीटमध्ये समावेश आहे. वास्तविक बाजारात ८० किलो हरभरा बियाणे हे जास्तीत जास्त एक हजार ४०० रुपयांत होते. शिवाय झिंक सल्फेट आणि फेरस हे १० किलो प्रत्येकी ४०० ते ५०० रुपयादरम्यान उपलब्ध आहे. या शिवाय रायझोबियम, एचएनपीव्ही, निंबोळी अर्क आणि ट्रायकोट्राका हे २०० ते ३०० रुपये किमतीत उपलब्ध होते. दोन हजार ५०० रुपयात या सर्व वस्तू बाजारात उपलब्ध होत असताना शासनाकडून राबविल्या जाणाऱ्या प्रकल्पामार्फत मात्र ३ हजार ३५० रुपयांमध्ये कुठलेही अनुदान न देता विकल्या जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी या योजनेच्या लाभाकडे पाठ फिरवली आहे. बोटावर मोजण्याइतके शेतकरी सोडले तर कुणाचाही हे बियाणे खरेदी करण्याकडे कल नसल्याचे दिसून येते.