शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
3
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
4
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
5
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
6
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
7
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
8
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
9
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
10
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
11
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
12
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
13
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
14
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
15
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
16
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
17
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
18
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
19
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
20
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

अन्न सुरक्षा प्रकल्पाचे वाभाडे

By admin | Updated: November 11, 2014 22:48 IST

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत कृषी विभागामार्फत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बियाण्यांचे वाटप करण्यात येत आहे. वास्तविक बाजार भावापेक्षा कमी किमतीत आणि दर्जेदार असे बियाणे कृषी

शिवानंद लोहिया - हिवरीराष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत कृषी विभागामार्फत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बियाण्यांचे वाटप करण्यात येत आहे. वास्तविक बाजार भावापेक्षा कमी किमतीत आणि दर्जेदार असे बियाणे कृषी विभागाने द्यायला हवे. मात्र या धोरणाला हरताळ फासत शेतकऱ्यांची लूट केली जात आहे. बाजारात दोन हजार रुपये किमतीचे असलेले हरभरा बियाणे कृषी विभागामार्फत त्यातही शासनाच्या योजनेतून ३ हजार ३५० रुपये किमतीत विकले जात आहे. परिणामी शेतकऱ्यांनी या योजनेकडे पाठ फिरविली आहे.राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत शेतकऱ्यांना माफक दरात दर्जेदार बियाणे उपलब्ध करून देण्याचे शासनाचे धोरण आहे. हा प्रकल्प राबविल्या जाणाऱ्या गावांमध्ये जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी या बियाण्यांचा लाभ घ्यावा, यासाठी शासन प्रयत्नशिल आहे. कृषी विभागाच्या माध्यमातून जनहिताची ही योजना जिल्ह्यातील ग्रामीण भागात राबविली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून यवतमाळ तालुक्यातही तीन ठिकाणी ही योजना राबविली जात आहे. यवतमाळ तालुक्यातील भांबराजा, वरूड, मंगरूळ या तीन गावांसाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानामार्फत प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून संबंधित आणि परिसरातील गावांमध्ये सध्या रबी पीक लागवडीच्या तोंडावर हरभरा बियाण्यांचे वितरण करण्यात येत आहे. या प्रकल्पामार्फत हरभरा बियाण्यांसह रसायनांची किटच शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली जात आहे. मात्र अव्वाच्या सव्वा दराने या किट कृषी विभागामार्फत विकल्या जात आहे. ८० किलो हरभरा बियाणे, १० किलो झिंक सल्फेट, १० किलो फेरस, एचएनपीव्ही २५० ग्रॅम, एक लिटर निंबोळी अर्क, रायझोबियम, ट्रायकोट्राका आदी रसायनांचा या कीटमध्ये समावेश आहे. वास्तविक बाजारात ८० किलो हरभरा बियाणे हे जास्तीत जास्त एक हजार ४०० रुपयांत होते. शिवाय झिंक सल्फेट आणि फेरस हे १० किलो प्रत्येकी ४०० ते ५०० रुपयादरम्यान उपलब्ध आहे. या शिवाय रायझोबियम, एचएनपीव्ही, निंबोळी अर्क आणि ट्रायकोट्राका हे २०० ते ३०० रुपये किमतीत उपलब्ध होते. दोन हजार ५०० रुपयात या सर्व वस्तू बाजारात उपलब्ध होत असताना शासनाकडून राबविल्या जाणाऱ्या प्रकल्पामार्फत मात्र ३ हजार ३५० रुपयांमध्ये कुठलेही अनुदान न देता विकल्या जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी या योजनेच्या लाभाकडे पाठ फिरवली आहे. बोटावर मोजण्याइतके शेतकरी सोडले तर कुणाचाही हे बियाणे खरेदी करण्याकडे कल नसल्याचे दिसून येते.