शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना 'सर्वोच्च' दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून शिक्षेला स्थगिती; आमदारकीही जाणार नाही
2
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
3
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
4
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
5
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
6
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
7
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
8
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
9
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
10
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
11
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
12
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
13
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
14
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
15
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
16
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
17
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
18
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
19
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
20
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्याच्या विकासाबाबत अधिकाऱ्यांना दिली तंबी

By admin | Updated: December 11, 2015 03:08 IST

अनेक सिंचन प्रकल्पात शेतकऱ्यांना फायदेशीर पाणीसाठा असतानाही या पाण्याचा वापर होत नसल्याचे दिसून येते.

कृती आराखडा सादर करा : मुख्यमंत्र्यांकडून यवतमाळ जिल्ह्याचा आढावा, सिंचनाचे क्षेत्र दुप्पटीवर न्यावे, कामचुकारांवर होईल कारवाईयवतमाळ : अनेक सिंचन प्रकल्पात शेतकऱ्यांना फायदेशीर पाणीसाठा असतानाही या पाण्याचा वापर होत नसल्याचे दिसून येते. जे प्रकल्प पूर्ण झाले आहे आणि त्यातील पाण्याचा वापर होत नाही, अशा प्रकल्पातील पाण्याच्या वापरासाठी कृती आराखडा सादर करा. या प्लॅनप्रमाणे यवतमाळ जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाणी पोहचविण्याचा प्रयत्न करा तसेच मार्च अखेरपर्यंत एकही कृषीपंपाची वीजजोडणी प्रलंबित राहता कामा नये, अशी तंबी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकारीवर्गाला दिली.मुख्यमंत्र्यांनी विधानभवनातील सभागृहामध्ये बुधवारी यवतमाळ जिल्ह्यातील विविध प्रश्नांचा आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते. जिल्ह्यातील अनेक प्रकल्पामध्ये सिंचनासाठी उपयुक्त असा पाणीसाठा उपलब्ध आहे. परंतु शेतापर्यंत पाणी नेण्याची पुरेशी सुविधा उपलब्ध न झाल्याने शेतकऱ्यांना सिचंनाचा लाभ घेता येत नाही. जे प्रकल्प पूर्ण झाले आहेत आणि ज्यातून सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून दिले जाऊ शकते, अशा प्रकल्पातील पाण्याच्या वापरासाठी तातडीने अ‍ॅक्शन प्लॅन तयार करून सादर करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी केली. जिल्ह्यात सिंचनाचे क्षेत्र वाढविण्यासाठी या कामास गती देण्याची सूचना करतांनाच सिंचनाचे क्षेत्र दुप्पटीवर नेण्याचे निर्देश त्यांनी दिले. अनेक प्रकल्पात उपयुक्त पाणीसाठा असताना केवळ कालव्याची कामे अपूर्ण असल्याने सिंचन होऊ शकत नाही. अ‍ॅक्शन प्लॅन करताना प्रकल्पातील पाणी शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत कसे नेता येईल, याचा त्यात अंतर्भाव करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.यवतमाळ जिल्ह्यातील अडाण, अरुणावती, बेंबळा, कोहोड, नवरगाव, अमडापूर या प्रकल्पाच्या कामांचा आढावा घेताना प्रकल्प क्षेत्रातील शेतकऱ्यांना तातडीने पाणी उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. यावेळी जिल्ह्यातील प्रलंबित कृषिपंपाच्या जोडण्या तातडीने देण्याची सूचना करताना मार्च अखेरपर्यंत एकही जोडणी प्रलंबित राहता कामा नये, यासाठी अधिकचा निधी उपलब्ध करुन दिला जाईल, असेही त्यांनी सांगितले.वीज जोडणीची अनेक कामे केवळ कंत्राटदारांनी वेळेत न केल्यामुळे प्रलंबित आहेत. त्यामुळे अशा कामांकडे दुर्लक्ष करणाऱ्या आणि काम योग्य पद्धतीने न करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा, असे निर्देश यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले. मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यातील कर्ज वाटप, सावकारी कर्ज मुक्तीची प्रकरणे, जीवनदायी योजना याचाही आढावा घेतला. लवकरच या सर्व बाबींचा पुन्हा आढावा घेऊ त्यावेळी या कामांमध्ये चांगली प्रगती आढळून आली पाहिजे, अशी तंबी मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. बैठकीला यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांच्यासह, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रीय, आमदार मदन येरावार, मनोहर नाईक, संजीवरेड्डी बोदकुरवार, डॉ. अशोक उईके, राजू नजरधने, राजू तोडसाम, हरिभाऊ राठोड, ख्वाजा बेग, अपर मुख्य सचिव आनंद कुलकर्णी, दिनेशकुमार जैन, यवतमाळचे पालक सचिव व्ही. गिरीराज, प्रधान सचिव मुकेश खुल्लर, सतीश गवई, सचिव मनिषा म्हैसकर, प्रभाकर देशमुख, गोविंदराज, दीपक कपूर, आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर, यवतमाळचे जिल्हाधिकारी सचिंद्र प्रतापसिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)