शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

शेतकऱ्यांना १५ जूनपर्यंत कर्ज वाटप करा

By admin | Updated: May 29, 2016 02:35 IST

तालुक्यातील शेतकऱ्यांना बँकांनी १५ जूनपर्यंत पीक कर्जाचे वाटप करावे, असे न केल्यास संबंधितांवर फौजदारी कारवाई करण्यात येईल,

किशोर तिवारी : उमरखेड पंचायत समितीमधील बैठकीत फौजदारी कारवाईची तंबीउमरखेड : तालुक्यातील शेतकऱ्यांना बँकांनी १५ जूनपर्यंत पीक कर्जाचे वाटप करावे, असे न केल्यास संबंधितांवर फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा इशारा वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी दिला. पीक कर्ज वाटपासंदर्भात पंचायत समितीच्या सभागृहात बैठक पार पडली. यावेळी तिवारी बोलत होते. बैठकीला आमदार राजेंद्र नजरधने, तहसीलदार भगवान कांबळे, भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र डांगे यांच्यासह सर्व विभागाचे अधिकारी तसेच सर्व बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते. बँकेने केलेल्या कर्ज वाटपाच्या संदर्भात बैठक घेण्यात आली. बँकांनी खूप कमी प्रमाणात कर्ज वाटप केल्याचे यावेळी उघड झाले. काही शेतकरी तर गेल्या अनेक दिवसांपासून पीक कर्जासाठी बँकेत चकरा मारत आहे. तरीही त्यांना कर्ज मिळाले नाही, अशी अनेक प्रकरणे पुढे आली. त्यामुळे किशोर तिवारी चांगलेच भडकले. त्यांनी सर्व बँकेच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. कर्ज पुरवठा करणे हे बँकेचे कर्तव्य असून त्याची संपूर्ण जबाबदारी शासनाने घेतली आहे. असे असतानाही तुम्ही कर्ज वाटप का करीत नाही, अशा शब्दात तिवारी यांनी बँक प्रतिनिधींची कानउघाडणी केली. उमरखेड तालुक्यातील शेतकऱ्यांना १५ जूनपर्यंत कर्ज पुरवठा झालाच पाहिजे, अन्यथा फौजदारी कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले. बैठकीला बँकेचे जे अधिकारी, प्रतिनिधी उपस्थित नसतील त्यांना कारणेदाखवा नोटीस बजावण्याचे आदेश तहसीलदार भगवान कांबळे यांंना तिवारी यांनी दिले. फौजदारी कारवाई करण्याच्या इशाऱ्यामुळे अधिकाऱ्यांमध्ये खळबळ माजली आहे. मात्र तिवारी यांचा इशारा प्रत्यक्षात उतरणार का हे १५ जूननंतरच स्पष्ट होणार आहे. (शहर प्रतिनिधी)