शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
2
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
3
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
4
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू
5
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया
6
IPL 2025 अंतिम सामन्यावरून मोठा गोंधळ; BCCIच्या 'या' निर्णयावर चाहते संतापले, नेमकं काय घडलं?
7
जबरदस्त! कंपनी असावी तर अशी, नफा होताच बोनस म्हणून दिली ७ महिन्यांची दिली सॅलरी
8
पुणे IED केस: ISIS साठी काम करणाऱ्या दोन जणांना NIA ने विमानतळावरून केली अटक
9
चर्चा युद्धबंदीची सुरू होती, रशियाने हल्ले वाढवले, प्रवाशांवर बॉम्ब टाकले; ९ जणांचा मृत्यू झाला
10
मनाविरुद्ध गोष्टी घडल्या की राग राग होतो? त्यावर नियंत्रण मिळवण्याच्या सोप्या टिप्स!
11
भयानक! तरुणाची स्टंटबाजी, वेगाने कार चालवून ४ जणांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
12
आता 'टीम इंडिया' पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणणार; श्रीकांत शिंदेंसह सुप्रिया सुळेंना जबाबदारी
13
"ओशो आश्रमात गेल्यावर बाबांनी.."; अक्षय खन्नाचा मोठा खुलासा, विनोद खन्नांविषयी काय म्हणाला?
14
Video: केदारनाथ धामला जाताना हेलिकॉप्टर क्रॅश; दैव बलवत्तर म्हणून वाचले
15
Coronavirus Outbreak: टेन्शन वाढलं! हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोनाचं थैमान, रुग्णांमध्ये मोठी वाढ; भारताला किती धोका?
16
Video - जॉर्जिया मेलोनींच्या स्वागतासाठी अल्बेनियाचे पंतप्रधान भर पावसात गुडघ्यावर बसले अन्...
17
"लग्नानंतर टिंडरवर अकाऊंट उघडून मी दोन तीन मुलींसोबत..."; अभिजीत सावंतची कबूली, म्हणाला-
18
UPI Lite, वॉलेट पेमेंट... युजर्सच्या पसंतीस का उतरत नाहीयेत हे नवे फीचर्स? कुठे येतेय समस्या
19
कारगिलमधून बेपत्ता झालेली नागपूरची महिला LOC पार करून पाकिस्तानात पोहचली, कारण...
20
परेश रावल यांचा 'हेराफेरी ३'ला रामराम! सुनील शेट्टीनं सोडलं मौन, म्हणाला - "बाबू भैयाशिवाय श्याम..."

पुसदला प्लास्टिकसह घाणीचा विळखा

By admin | Updated: September 3, 2016 00:40 IST

‘सुंदर पुसद, स्वच्छ पुसद’ ही संकल्पना केवळ कागदोपत्रीच राहिली असून शहराला प्लास्टिकच्या पिशव्यांनी जणू विळखाच घातला आहे.

साथरोगाचा धोका : नगरपरिषदेचे अक्षम्य दुर्लक्ष पुसद : ‘सुंदर पुसद, स्वच्छ पुसद’ ही संकल्पना केवळ कागदोपत्रीच राहिली असून शहराला प्लास्टिकच्या पिशव्यांनी जणू विळखाच घातला आहे. या प्लास्टिक पिशव्यामुळे पर्यावरण प्रदूषणासह जनावरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. प्लास्टिक बंदी असतानासुद्धा शहरात प्रशासनाच्या नाकावर टिच्चून प्लास्टिक पिशव्यांचा सर्रास वापर होत आहे.शहराच्या अनेक भागामध्ये प्लास्टिकचे ढिगारे मोठ्या प्रमाणात पडून आहेत. प्लास्टिकच्या पिशव्या सरळ जनावरांच्या पोटात जात आहेत. गल्लीबोळामध्ये पडून असलेल्या प्लास्टिकच्या ढिगाऱ्याजवळ जनावरे आपली भूक भागवत असून त्यामुळे त्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. ज्या ठिकाणी भाजीबाजार भरतो त्याच्या आजूबाजूला रिकाम्या जागेत मोठ्या प्रमाणात प्लास्टिकच्या पिशव्या व ढिगारे दिसून येतात. मोकाट जनावरे त्या ठिकाणी पिशव्या खात असल्याचे दिसून येते. नगर पालिकेने शहरात साचलेली प्लास्टिकची ढिगारे शहराबाहेर फेकून प्लास्टिकच्या पिशव्या नष्ट करण्याची आवश्यकता आहे. ‘नगराध्यक्ष’ या पर्यावरणप्रेमी तर मुख्याधिकारी ‘डॉक्टर’ असूनसुद्धा त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे पुसदकर बोलत आहे. पुसद शहराच्या बहुतेक नाल्या पिशव्यांनी भरलेली आहे. शहरात मोठ्या प्रमाणात जागोजागी प्लास्टिकच्या अस्ताव्यस्त फेकलेल्या पिशव्या दिसतात. मात्र पुसद नगर पालिकेमध्ये सध्या दिसत असलेले चित्र सुखावह नाही. पुसद शहर नागरी समस्यांबाबत मागासलेले आहे. सध्या पावसाळ्यात दहा मिनिटाच्या पावसात नालीतील घाण रस्त्यावर येते. नाल्यात कचरा साचून पडलेला आहे. साफसफाईच नाही शहरात साचलेल्या प्लास्टिकच्या कचऱ्यामुळे अनेक ठिकाणी दुर्गंधी पसरली असून त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. शहराच्या विविध भागात अजूनही मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढिग दिसून येतात. लोकांनी रस्त्यावर कचरा टाकू नये, थुंकू नये यासाठी नगर पालिकेच्या वतीने दंडाची आकारणी करता येते. पालिकेच्यावतीने कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. पण फलश्रृती मात्र शून्य! उलट कचऱ्याची समस्या वाढतच आहे. नगरपालिकेच्यावतीने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत नगराध्यक्ष, मुख्याधिकारी, नगरसेवक, राजकीय मंडळी सहभागी झाले होते. स्वच्छता मोहीम ही संकल्पना चांगली असली तरी स्वच्छतेच्या दृष्टीने अशा मोहिमेची अंमलबजावणी होणे तितकेच महत्वाचे आहे. अन्यथा कचऱ्याची समस्या ही गंभीर बनणार आहे. (तालुका प्रतिनिधी)