शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
2
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
3
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
4
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
5
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
6
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
7
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
8
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
9
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
10
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
11
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
12
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
13
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
14
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
15
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
16
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
17
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
18
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
19
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
20
VIDEO: दोन बैलांमध्ये भांडण, स्कूटीवाल्या मुलीला बसली जोरदार धडक, ती रस्त्यावर पडली अन् मग...

पुसदला प्लास्टिकसह घाणीचा विळखा

By admin | Updated: September 3, 2016 00:40 IST

‘सुंदर पुसद, स्वच्छ पुसद’ ही संकल्पना केवळ कागदोपत्रीच राहिली असून शहराला प्लास्टिकच्या पिशव्यांनी जणू विळखाच घातला आहे.

साथरोगाचा धोका : नगरपरिषदेचे अक्षम्य दुर्लक्ष पुसद : ‘सुंदर पुसद, स्वच्छ पुसद’ ही संकल्पना केवळ कागदोपत्रीच राहिली असून शहराला प्लास्टिकच्या पिशव्यांनी जणू विळखाच घातला आहे. या प्लास्टिक पिशव्यामुळे पर्यावरण प्रदूषणासह जनावरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. प्लास्टिक बंदी असतानासुद्धा शहरात प्रशासनाच्या नाकावर टिच्चून प्लास्टिक पिशव्यांचा सर्रास वापर होत आहे.शहराच्या अनेक भागामध्ये प्लास्टिकचे ढिगारे मोठ्या प्रमाणात पडून आहेत. प्लास्टिकच्या पिशव्या सरळ जनावरांच्या पोटात जात आहेत. गल्लीबोळामध्ये पडून असलेल्या प्लास्टिकच्या ढिगाऱ्याजवळ जनावरे आपली भूक भागवत असून त्यामुळे त्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. ज्या ठिकाणी भाजीबाजार भरतो त्याच्या आजूबाजूला रिकाम्या जागेत मोठ्या प्रमाणात प्लास्टिकच्या पिशव्या व ढिगारे दिसून येतात. मोकाट जनावरे त्या ठिकाणी पिशव्या खात असल्याचे दिसून येते. नगर पालिकेने शहरात साचलेली प्लास्टिकची ढिगारे शहराबाहेर फेकून प्लास्टिकच्या पिशव्या नष्ट करण्याची आवश्यकता आहे. ‘नगराध्यक्ष’ या पर्यावरणप्रेमी तर मुख्याधिकारी ‘डॉक्टर’ असूनसुद्धा त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे पुसदकर बोलत आहे. पुसद शहराच्या बहुतेक नाल्या पिशव्यांनी भरलेली आहे. शहरात मोठ्या प्रमाणात जागोजागी प्लास्टिकच्या अस्ताव्यस्त फेकलेल्या पिशव्या दिसतात. मात्र पुसद नगर पालिकेमध्ये सध्या दिसत असलेले चित्र सुखावह नाही. पुसद शहर नागरी समस्यांबाबत मागासलेले आहे. सध्या पावसाळ्यात दहा मिनिटाच्या पावसात नालीतील घाण रस्त्यावर येते. नाल्यात कचरा साचून पडलेला आहे. साफसफाईच नाही शहरात साचलेल्या प्लास्टिकच्या कचऱ्यामुळे अनेक ठिकाणी दुर्गंधी पसरली असून त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. शहराच्या विविध भागात अजूनही मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढिग दिसून येतात. लोकांनी रस्त्यावर कचरा टाकू नये, थुंकू नये यासाठी नगर पालिकेच्या वतीने दंडाची आकारणी करता येते. पालिकेच्यावतीने कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. पण फलश्रृती मात्र शून्य! उलट कचऱ्याची समस्या वाढतच आहे. नगरपालिकेच्यावतीने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत नगराध्यक्ष, मुख्याधिकारी, नगरसेवक, राजकीय मंडळी सहभागी झाले होते. स्वच्छता मोहीम ही संकल्पना चांगली असली तरी स्वच्छतेच्या दृष्टीने अशा मोहिमेची अंमलबजावणी होणे तितकेच महत्वाचे आहे. अन्यथा कचऱ्याची समस्या ही गंभीर बनणार आहे. (तालुका प्रतिनिधी)