शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

सरकार-प्रशासनाच्या गतिमानतेने जिल्ह्याला दिलासा

By admin | Updated: May 26, 2015 01:29 IST

जिल्ह्यात युती सरकार आणि प्रशासन प्रचंड गतीमान झाल्याने सामान्य नागरिक व शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

राजेश निस्ताने ल्ल यवतमाळ जिल्ह्यात युती सरकार आणि प्रशासन प्रचंड गतीमान झाल्याने सामान्य नागरिक व शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. वर्षानुवर्षे रखडलेली त्यांची कामे वेगाने मार्गी लागत आहेत. त्यातून त्यांच्या चेहऱ्यावर समाधान पहायला मिळत आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी जनता दरबारांचा सपाटा लावला आहे. या दरबारांना जनतेतून प्रचंड प्रतिसाद मिळत असून शेकडो तक्रारींचा पाऊसही पडतो आहे. सलग आठ ते दहा तास चालणाऱ्या या जनता दरबारात तक्रार घेऊन येणाऱ्या नागरिकांच्या चेहऱ्यावर ‘आता आपली समस्या सुटणार’ याचा आनंद पाहायला मिळतो आहे. यापूर्वी पालकमंत्र्यांचे केवळ ध्वजारोहण आणि जिल्हा नियोजन समितीच्या बैठकांनाच दर्शन व्हायचे. या परंपरेला संजय राठोड यांनी फाटा दिला आहे. मंत्र्यांना आपल्या गृहजिल्ह्यातच पालकमंत्री म्हणून नेमण्याच्या युती सरकारच्या निर्णयाचा हा चांगला परिणाम पहायला मिळत आहे. जिल्ह्याला सचिंद्र प्रताप सिंग हे नवे जिल्हाधिकारी लाभले आहेत. त्यांनी आढावा बैठकांची जणू मोहिमच हाती घेतली. विशेष असे या बैठका ‘फॉर्मेलिटी’ नाहीत, तर रिझल्ट ओरिएंटेड ठरत आहेत. शनिवार व रविवार या सुटीच्या दिवशी जिल्ह्यातील शासकीय अधिकाऱ्यांनी पहिल्यांदाच बैठकांचा फड अनुभवला. आतापर्यंत बँकर्स कमिटीच्या बैठकांना केवळ जिल्ह्याचे प्रमुख व्यवस्थापक उपस्थित राहत होते. मात्र यावेळी पहिल्यांदाच जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व बँकांच्या सर्व शाखा व्यवस्थापकांना बैठकीत बोलविले. पीक कर्ज वाटपाचे उद्दीष्ट न गाठणाऱ्या अधिकाऱ्यांची झाडाझडती घेण्यात आली. पीक कर्ज न देणे हे क्राईम आहे, असे स्पष्ट करताना आधीच संकटात असलेल्या शेतकऱ्यांपुढे आणखी मानवी संकट लादू नका असे आवाहनही त्यांनी केले. शेतकऱ्यांशी सन्मानाने बोला, त्यांचे समाधान करा अशा सूचना केल्या गेल्या. कर्ज वाटपाची उद्दीष्टपूर्ती न झाल्यास तुमची खैर नाही, अशी तंबीही या बँक व्यवस्थापकांना देण्यात आली. या बैठकीत अनेक व्यवस्थापकांच्या तोंडून शब्दही फुटत नव्हते एवढी ही बैठक गाजली.