शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
2
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
3
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
4
एअर इंडिया विमान अपघात: प्रेमानंद महाराजांची मोठी शिकवण; तुम्हालाही ‘ती’ गोष्ट माहिती हवीच!
5
वर्ल्ड कप आधी स्मृती मानधनाची मुसंडी! ५ वर्षांनी पुन्हा झाली वनडेची 'क्वीन'
6
Sonam Raghuvanshi : "लग्नानंतर राजा त्याच्या मित्रांसह..."; सोनम रघुवंशीने रिसेप्शनला नवऱ्याला दिलेलं 'हे' वचन
7
स्वामी विवेकानंदांना महाकालीकडे मागायचे होते एक, पण मागितले भलतेच आणि ते मिळालेसुद्धा!
8
'आमच्या देशाकडे पाहिलं तरी डोळे काढून...’, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची इस्राइलला धमकी
9
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
10
मारुतीची पहिली e Vitara लाँच झाली! व्हेरिअंटनुसार ३५ लाख ते ४२ लाख किंमत, फिचर्स, रेंज आणि कोण घेणार पहा...
11
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्तानची लुडबुड; शाहबाज शरीफ यांना कशाची वाटतेय भीती?
12
विरार- अलिबाग कॉरिडोरच्या भूसंपादनाला मिळणार गती!
13
उलटेच झाले! सामुहिक बलात्काराची केस दाखल केली, तिलाच सात वर्षांची शिक्षा झाली
14
PF साठी एजंट्सची मदत घेताय? सावधान! EPFO ने दिली धोक्याची घंटा, पैसे आणि डेटा दोन्ही जाईल!
15
स्वामी विवेकानंदांनी सांगितलेली 'ही' तीन ध्येय साध्य केली तर आपला पराभव होऊच शकणार नाही!
16
'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे'चा सीक्वेल येणार? काजोल म्हणाली, "सिनेमाचा जो शेवट झाला..."
17
डोनाल्ड ट्रम्प यांनी आणला स्वत:च्याच ब्रँडचा स्मार्टफोन; अमेरिकेत भूकंप, कमी किंमतीत एवढे फिचर्स देणार की...
18
Crude Oil Reserves India : भारताला अंदमानात २ लाख कोटी लिटर कच्च्या तेलाचं भांडार मिळालं, GDP २० ट्रिलियन डॉलर्सवर जाणार?
19
इस्रायल-इराण यांचे एकमेकांवर बॉम्ब; सरकारी न्यूज चॅनेलच्या इमारतीवर हल्ले

सलग १८ तास वीज बंदने कळंबमध्ये असंतोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 21:44 IST

येथील वीज वितरण कंपनीचा कारभार अतिशय ढेपाळला आहे. थोडाही पाऊस, वारा आला की वीजपुरवठा बंद होतो. शुक्रवारी रात्रीपासून सलग १८ तास वीज बंद होती. याचा जाब नागरिकांनी विद्युत कंपनीच्या अधिकाऱ्यांना विचारुन रोष व्यक्त केला.

ठळक मुद्देसंडे अँकर । विद्युत कंपनीच्या अधिकाऱ्यांना धरले धारेवर, वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले

लोकमत न्यूज नेटवर्ककळंब : येथील वीज वितरण कंपनीचा कारभार अतिशय ढेपाळला आहे. थोडाही पाऊस, वारा आला की वीजपुरवठा बंद होतो. शुक्रवारी रात्रीपासून सलग १८ तास वीज बंद होती. याचा जाब नागरिकांनी विद्युत कंपनीच्या अधिकाऱ्यांना विचारुन रोष व्यक्त केला.मागील काही दिवसांपासून अचानक विद्युत पुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढले आहे. बºयाचदा काही भागातील विद्युत पुरवठा तातडीने सुरळीत केला जात नाही. नागरिकांच्या विद्युत विभागाशी असलेल्या प्रश्नाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जाते. वीज बिल वेळेवर दिले जात नाही. त्यामुळे दंडाच्या रकमेचा भुर्दंड सहन करावा लागतो. त्यामळे नागरिक पुरते हैराण झाले आहे.शुक्रवारी रात्रीपासून विद्युत खंडित होती. त्यामुळे नागरिकांनी आपला मोर्चा कंपनीच्या कार्यालयाकडे वळविला. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने ठाणेदार विजय राठोड यांनी सर्व सूत्र आपल्या हातात घेतले. जमावाला शांत करुन बोलणी करण्यासाठी सर्वांना ठाण्यात पाचारण केले. याठिकाणी विद्युत कंपनीचे उपअभियंता गुर्जर व कनिष्ठ अभियंता भोयर यांना बोलावण्यात आले. येथूनच त्यांनी अधीक्षक अभियंता सुरेश मडावी यांच्याशी संपर्क करून लोकांच्या भावना त्यांच्या कानावर टाकल्या. समस्या न सुटल्यास कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, याचीही त्यांना माहिती देण्यात आली.विद्युत पुरवठा खंडित होण्याचा प्रकार येत्या ८ तारखेपर्यंत न थांबल्यास विद्युत कंपनीच्या कार्यालयात ठिय्या आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. विद्युत कंपनीच्या अधिकाºयांकडून नागरिकांना समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने त्यांच्यामध्ये रोष व्यक्त केला जात होता. अनेक तक्रारींवर तोडगा काढला जात नसल्याची ओरड यावेळी करण्यात आली. थोड्याशा कारणावरून वीज पुरवठा खंडित होण्याचा प्रकार थांबविण्यात यावा, अशी मागणी नागरिकांनी यावेळी केली. वारंवार वीज खंडित होण्याचे प्रकार वाढल्याचे सांगितले. यावेळी प्रमोद उरकुडे, राजाभाऊ तांबेकर, अब्दुल अजीज, रूपेश राऊत, मुन्ना लाखीयाँ, प्रवीण निमकर, रूपेश सुचक, अनिल दुद्दलवार, विशाल हजारे, नितीन ठाकरे, अतिफ, हबीब, गोलू तिवाडे आदी उपस्थित होते.ग्राहकांच्या तक्रारींकडे केले जाते दुर्लक्षविद्युत कंपनीच्या कळंब येथील कार्यालयात नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप आहे. वैयक्तिक स्वरूपातील कुठल्याही तक्रारींची दखल घेतली जात नाही. शेतकºयांच्या विजेविषयीच्या समस्याही प्रलंबित ठेवल्या जातात. कित्येक महिने तक्रारींचे फाईल निकाली काढले जात नसल्याची ओरड आहे.

टॅग्स :electricityवीजmahavitaranमहावितरण