शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

प्रसूती वॉर्डात महिलेची अवहेलना

By admin | Updated: May 27, 2014 01:11 IST

वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रसूती वॉर्ड हा येथील कर्मचार्‍यांच्या वर्तणुकीमुळे नेहमीच वादग्रस्त ठरला आहे. रात्री ११.३० वाजता प्रसूतीसाठी आलेल्या

 ‘मेडिकल’मधील प्रकार : बालक गंभीर, दोषींवर कारवाईची मागणी

यवतमाळ : वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रसूती वॉर्ड हा येथील कर्मचार्‍यांच्या वर्तणुकीमुळे नेहमीच वादग्रस्त ठरला आहे. रात्री ११.३० वाजता प्रसूतीसाठी आलेल्या महिलेला चक्क एक तास तडफडत ठेवून नंतर उपचारासाठी दाखल करून घेतले. दोन दिवस उपचार केल्यानंतर त्या महिलेला अक्षरश: हाकलून देण्यात आले. या प्रकरणी नातेवाईकांनी अधीष्ठात्यांकडे तक्रार केली आहे. नेर तालुक्यातील सिंदखेड येथील पपिता जगदीश राठोड या महिलेला प्रसवकळा सुरू असताना २१ मे रोजी रात्री ११.३० वाजता शासकीय रुग्णालयात आणण्यात आले. यावेळी कर्तव्यावर असलेल्या प्रसूती विभागातील कर्मचार्‍यांनी या महिलेला वॉर्डात दाखल करून घेतले नाही. तिच्याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले. त्यानंतर रात्री १२ वाजता दाखल करून घेतले. एवढ्या रात्री उपचारासाठी औषधी लागत असल्याने नातेवाईकांना वारंवार एका खासगी रुग्णालयात पाठविले. प्रसूतीदरम्यान हयगय केल्याने बाळाची प्रकृती गंभीर झाली. अशा स्थितीत २३ मे रोजी बाळ व बाळंतीणीला रजा न देता गंभीर अवस्थेत रुग्णालयातून हाकलून दिले. याबाबत दाद मागितली असता सर्वच कर्मचार्‍यांनी उद्धटपणाची वागणूक देत कुठेही जा, अशा शब्दात दरडावून हाकलून दिले, अशी तक्रार वसंत सवाई राठोड यांनी अधीष्ठाता डॉ.आनंद डोंगरे यांच्याकडे केली आहे. आर्थिक परिस्थिती नसतानाही बाळाची प्रकृती गंभीर असल्याने शेवटी त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रसूती विभागात रुग्णांना योग्य उपचार व वागणूक मिळत नसल्याच्या तक्रारी होत आहे. प्रसूतीदरम्यान माता मृत्यू आणि बालमृत्यूचे प्रमाणही अधिक आहे. या संदर्भात राज्य मानवी हक्क आयोगाकडे प्रकरण दाखल असतानाही वागणुकीत कोणताच बदल झालेला दिसत नाही. रुग्णालय प्रशासनाकडून केवळ थातूरमातूर चौकशी करून प्रकरण दडपण्याचाच प्रयत्न केला जातो. येथील प्रसूती विभाग आणि बालरोग विभागाचा कारभार महिला व बालकांच्या जीवावर उठल्याचे दिसून येते. या बाबत वरिष्ठांसह तेथील कार्यरत अधिकारी, डॉक्टर व कर्मचारी दोषी आहे. त्यानंतरही परिस्थिती सुधारण्यासाठी ठोस पावले उचलली जात नसल्याचे दिसून येते. त्यामुळेच रुग्णांसोबत चुकीचा व्यवहार करण्याचे प्रकार वारंवार घडत आहे. (कार्यालय प्रतिनिधी)