शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
2
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
3
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
4
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
5
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
6
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
7
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
8
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
9
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
10
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
11
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
12
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
13
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
14
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
15
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
16
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
17
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
18
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
19
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
20
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
Daily Top 2Weekly Top 5

जमीन मोबदल्याने घराघरांत भांडणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2022 05:00 IST

महागाव-कलगाव ते नागपूर या मार्गावरील आंबोडा, हिवरा व इतर गावांतील शेतकऱ्यांची जमीन गेली आहे. काहींना मोबदला मिळाला तर काहींना अद्यापही मोबदल्याची प्रतीक्षा आहे. ज्यांना मोबदला मिळाला त्यांच्या घरात हिस्से वाटणीवरून वाद सुरू झाले. अंबोडा येथील एका शेतकऱ्याने याच पैशाच्या वादातून झाडाला फाशी लावून आत्महत्या केली. विभक्त कुटुंबांमध्ये टोकाचे मतभेद निर्माण झाले. काहींनी मतभेद समुपचाराने मिटविले.

संजय भगत लोकमत न्यूज नेटवर्कमहागाव : नागपूर-बोरी-तुळजापूर हा महामार्ग महागाव तालुक्यातून गेला आहे. त्यासाठी संपादित झालेल्या जमिनीच्या मोबदल्यावरून घराघरांत भांडणे लागली आहेत. पैशाच्या वाटणीवरून काहींना आपला जीवसुद्धा गमवावा लागला आहे. महागाव ते भोसा आणि महागाव ते नांदगाव असा प्रत्येकी २० म्हणजेच एकूण ४० किलोमीटरचा हा महामार्ग तालुक्यातून गेला आहे. वारंगा ते महागाव आणि महागाव ते नागपूर असा हा मार्ग दोन कंपन्यांकडे बांधकामासाठी सोपविण्यात आला. महागाव-कलगाव ते नागपूर या मार्गावरील आंबोडा, हिवरा व इतर गावांतील शेतकऱ्यांची जमीन गेली आहे. काहींना मोबदला मिळाला तर काहींना अद्यापही मोबदल्याची प्रतीक्षा आहे. ज्यांना मोबदला मिळाला त्यांच्या घरात हिस्से वाटणीवरून वाद सुरू झाले. अंबोडा येथील एका शेतकऱ्याने याच पैशाच्या वादातून झाडाला फाशी लावून आत्महत्या केली. विभक्त कुटुंबांमध्ये टोकाचे मतभेद निर्माण झाले. काहींनी मतभेद समुपचाराने मिटविले. मात्र काहींनी मिळालेल्या मोबदल्याचा दुरूपयोगी केल्याचे दिसून येते. मात्र या बक्कळ पैशाने अनेक घरांमध्ये ठिणगी पडून कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे. 

७० शेतकरी न्यायाच्या प्रतीक्षेतजमिनीचा मोबदला कमी मिळाल्यामुळे ७० शेतकरी अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. दुसरीकडे हिवरा संगम येथील ११ शेतकऱ्यांनी न्यायालयात धाव घेतली. त्यांनी आहे त्याच रस्त्यावरून महामार्गाचे बांधकाम करण्याची मागणी केली. याशिवाय इतर १४ शेतकरीही बायपासला विरोध म्हणून न्यायालयात गेले आहेत.

अपघाताची मालिका सुरूचमोबदल्याचा वाद न्यायालयात प्रलंबित असल्याने दोन किलोमीटरचा रस्ता अद्याप पूर्ण झाला नाही. संबंधित शेतकऱ्यांसोबत प्रशासन चर्चा करण्यास तयार नाही. या रस्त्याची डागडुजीसुद्धा केली जात नाही. त्यामुळे या दोन किलोमीटरच्या अंतरात वारंवार अपघात होत आहे. त्यात आतापर्यंत काहींचे बळी गेले आहे. 

विहीर, हातपंपांची नोंदच घेतली नाहीमहामार्गासाठी जमीन संपादित करताना बांधकाम, विहिरी, हातपंप, दुकाने आदींची नोंदच घेण्यात आली नाही. पंचनाम्यातून ही कामे वगळण्यात आली. त्यामुळे अंबोडा येथील अनेक शेतकऱ्यांना अत्यंत कमी प्रमाणात मोबदला मिळाला. विहीर, हातपंप आणि इतर वस्तूंच्या नुकसानीची पंचनाम्यात नोंद घेतली गेली असती तर लाभार्थ्यांना जादा प्रमाणात मोबदला मिळाला असता. मात्र पंचनामा करताना या बाबी वगळण्यात आल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. 

  प्रकल्पग्रस्त म्हणतात...  

मोजणीमधून जागा सुटली. त्यामुळे पुन्हा मोजणीची मागणी केली. काऊरवाडी, खडका, दहीसावळी, भोसा, वाघनख, अंबोडा येथील ७० शेतकरी लाभापासून वंचित आहेत. काही शेतकऱ्यांनी न्यायालयात धाव घेतली आहे.- हनवतराव देशमुख, अंबोडा 

जमिनीच्या मोबदल्याची काही प्रकरणे अपर जिल्हाधिकाऱ्यांनी मंजूर केली. मात्र नॅशनल हायवेने अमान्य केली. त्याचा शेतकऱ्यांना फटका बसत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी प्रकरणे तात्काळ निकाली काढावी. - पंजाबराव देशमुख खडकेकर, खडका

हिवरा बायपासमधील जमिनी बंजर दाखविण्यात आल्या. प्रत्यक्षात त्या ओलिताखाली आहे. त्यामुळे आम्ही १४ शेतकरी न्यायालयात गेलो. बायपासला आमचा विरोध आहे. ११ शेतकरी रस्ता गावामधून नेण्यासाठी न्यायालयात गेले आहे. - प्रा. मुकुंद पांडे, हिवरा संगम

 

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्ग