शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटील 'मातोश्री'वर उद्धव ठाकरेंच्या भेटीला; मुंबईत NCP शरद पवार गट ठाकरे बंधूंसोबत येणार?
2
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, मुंबईत जागावाटपाचा तिढा सुटला; भाजपा-शिंदेसेना किती जागा लढणार?
3
UPSC यशानंतर IPS अधिकारी बनली पूर्वा चौधरी, सौंदर्यासोबतच वादामुळे चर्चेत, जाणून घ्या प्रकरण
4
सोनं विक्रमी उच्चांकावर, चांदी एका झटक्यात १३११७ रुपयांनी उसळली! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
5
काँग्रेसची १२५हून अधिक तिकिटे फायनल; प्रदेश निवड समितीच्या बैठकीत १५ मिनिटांत आटोपली चर्चा
6
"२१ कोटींची मागणी आणि...", अक्षय खन्नाची 'दृश्यम ३' सिनेमातून एक्झिट, अखेर खरं कारण समोर
7
MS Dhoni Pension: बीसीसीआय महेंद्रसिंह धोनीला किती पेन्शन देते? जाणून घ्या!
8
"मुंबईचा महापौर पठाण, शैख, सैयद, अन्सारी का होऊ शकत नाही?"; वारीस पठाण यांचा प्रश्न, संजय राऊतांचंही स्पष्टच उत्तर!
9
भारतीयांना रशियन दारूचे वेड! १० महिन्यांत ५२० टन व्हिस्की, जिन आणि वोडका रिचवली
10
Vijay Hazare Trophy: थोरल्या भावाने दिली धाकट्याला पदार्पणाची कॅप; दोघांच्यातील शतकी भागीदारीनंतर जे घडलं ते कमालच!
11
कानातले, मोजे आणि अंडरगारमेंट गायब...; उदयपूर गँगरेपमधील IT मॅनेजर पीडितेची आपबीती
12
मनसेचं ‘नऊ’निर्माण होईल? १६-०१-२०२६ ची ‘बेरीज’ राज ठाकरेंसाठी ठरेल का ‘मंगल’? काय सांगते अंक-ज्योतिषशास्त्राची युती?
13
मंत्री भरत गोगावलेंचे पुत्र विकास गोगावले २४ दिवसांपासून पोलिसांना सापडेना, महाडमधील प्रकरण काय?
14
पोलिसांवर दगडफेक! 12 महिलांसह 75 जणांना अटक; जयपूरमध्ये मध्यरात्री नेमकं काय झालं?
15
"धुरंधर हा एक भयानक कुत्रा, तो प्रत्येक 'बिग बजेट'...", राम गोपाल वर्मा यांची पोस्ट चर्चेत; नेमकं काय म्हणाले?
16
"राहिलेलं आयुष्य राजसाहेबांसोबत" म्हणणाऱ्या पाटलांनी मनसे सोडली; भाजपला लबाड म्हटल्याचा व्हिडीओ व्हायरल
17
भाईंदरनंतर आता ठाण्यात बिबट्या घुसला, नागरिकांमध्ये दहशत, नेमका कुठे आणि कधी दिसला?
18
भाजपाच्या सांगण्यावरून शिवसेना चालणार का?; संतप्त शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांचं पुण्यात आंदोलन
19
भारतातच फिरायला जायचा विचार करताय? 'या' ४ राज्यांत विनापरवाना गेलात तर होईल ५ वर्षांची जेल!
20
₹७६१३ वरुन ₹१५२२ वर आला 'हा' शेअर; अखेर का एका दिवसात ८० टक्क्यांनी स्वस्त झाला स्टॉक?
Daily Top 2Weekly Top 5

जनतेच्या तक्रारी बेदखल

By admin | Updated: November 18, 2015 02:39 IST

वणी उपविभागातील जनतेला आता पालकमंत्र्यांच्या जनता दरबाराची प्रतीक्षा लागली आहे.

जनता दरबाराची प्रतीक्षा : पाच महिन्यांचा पडला खंडवणी : वणी उपविभागातील जनतेला आता पालकमंत्र्यांच्या जनता दरबाराची प्रतीक्षा लागली आहे. पहिला जनता दरबार झाल्यानंतर पाच महिन्याचा खंड पडल्याने पुन्हा नागरिकांकडे अनेक तक्रारी निर्माण झाल्या आहेत. या तक्रारींना संबंधित अधिकाऱ्यांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने नागरिक हैराण झाले आहे. पालकमंत्री पुन्हा कधी जनता दरबार घेणार व आम्ही कधी आपली गाऱ्हाणी मांडतो असे जनतेला वाटू लागले आहे.वणी उपविभागातील अनेक विभागामध्ये जनतेच्या कामांकडे दुर्लक्ष केले जाते. सामान्य नागरिक नियमात बसणारे काम करण्यासाठीही कोणत्याही कार्यालयात गेले असता त्यांना कार्यालयातील बाबुगीरीकडून तक्रारकर्त्यांनाच हुसकावून लावले जाते. मात्र वशिल्याने तात्काळ प्रतिसाद मिळतो. असा अनुभव अनेकांना आला आहे. जनतेची बाबुगीरीच्या जाचातून मुक्तता व्हावी म्हणून पालकमंत्री ना.संजय राठोड यांनी जुलै महिन्यात वणी उपविभागीय स्तरावर जनता दरबार घेतला होता. त्यावेळी वणी, मारेगाव व झरी तालुक्यातून अक्षरश: तक्रारींचा पाऊस पडला होता. सतत आठ तास बसूनही संपूर्ण तक्रारीचा निपटारा पालकमंत्र्यांना करता आला नव्हता. मात्र अनेक तक्रारीवर संबंधित अधिकाऱ्याने सकारात्मक उत्तरे दिल्याने तक्रारकर्त्यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. दुसरा जनता दरबार आॅगस्ट महिन्यात घेण्यात येईल. त्यावेळेपर्यंत पहिल्या जनता दरबारातील सर्व तक्रारींचा निपटारा व्हायला पाहिजे, अशी तंबी त्यावेळी पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिली होती. नागरिकांच्या तक्रारीवर काय निर्णय घेण्यात आला. याचे लेखी उत्तर तक्रारकर्त्याला कळविण्याच्या सूचनाही त्यावेळी देण्यात आल्या होत्या. मात्र अनेक तक्रारकर्त्यांना अजूनही त्यांच्या तक्रारीचे काय झाले, याची माहिती प्राप्त झाली नाही. त्यामुळे अधिकाऱ्यांनी त्यावेळी आपली वेळ मारून नेली तर नाही ना, असे अनेकांना वाटू लागले आहे. दुसऱ्या दरबारात या अधिकाऱ्यांची पोलखोल होणार, असे जनतेला वाटत होते. मात्र पाच महिने लोटूनही दुसरा जनता दरबार घेण्यात आलाच नाही. त्यामुळे जनतेची घोर निराशा झाली असून आता जनतेला दुसऱ्या जनता दरबाराची प्रतीक्षा आहे. (स्थानिक प्रतिनिधी)