शहरं
Join us  
Trending Stories
1
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
2
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
3
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
4
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
5
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
6
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
7
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
8
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
9
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
10
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
11
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
12
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
13
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
14
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
15
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
16
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
17
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...
18
धक्कादायक! लिव्ह-इन पार्टनरची केली हत्या, सिग्नलवर गाडी थांबवली, पेट्रोल ओतून पेटवून दिले
19
‘मतचोरीचा अणुबॉम्ब टाकला, आता हायड्रोजन बॉम्ब येणार, त्यानंतर नरेंद्र मोदी...', राहुल गांधींचा निशाणा
20
याला म्हणतात स्टॉक...! झटक्यात ₹३७०० नं वधारला शेअर; एकाच दिवसात गुंतवणूकदारांना केलं मालामाल, आपल्याकडे आहे का?

जनतेच्या तक्रारी बेदखल

By admin | Updated: November 18, 2015 02:39 IST

वणी उपविभागातील जनतेला आता पालकमंत्र्यांच्या जनता दरबाराची प्रतीक्षा लागली आहे.

जनता दरबाराची प्रतीक्षा : पाच महिन्यांचा पडला खंडवणी : वणी उपविभागातील जनतेला आता पालकमंत्र्यांच्या जनता दरबाराची प्रतीक्षा लागली आहे. पहिला जनता दरबार झाल्यानंतर पाच महिन्याचा खंड पडल्याने पुन्हा नागरिकांकडे अनेक तक्रारी निर्माण झाल्या आहेत. या तक्रारींना संबंधित अधिकाऱ्यांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने नागरिक हैराण झाले आहे. पालकमंत्री पुन्हा कधी जनता दरबार घेणार व आम्ही कधी आपली गाऱ्हाणी मांडतो असे जनतेला वाटू लागले आहे.वणी उपविभागातील अनेक विभागामध्ये जनतेच्या कामांकडे दुर्लक्ष केले जाते. सामान्य नागरिक नियमात बसणारे काम करण्यासाठीही कोणत्याही कार्यालयात गेले असता त्यांना कार्यालयातील बाबुगीरीकडून तक्रारकर्त्यांनाच हुसकावून लावले जाते. मात्र वशिल्याने तात्काळ प्रतिसाद मिळतो. असा अनुभव अनेकांना आला आहे. जनतेची बाबुगीरीच्या जाचातून मुक्तता व्हावी म्हणून पालकमंत्री ना.संजय राठोड यांनी जुलै महिन्यात वणी उपविभागीय स्तरावर जनता दरबार घेतला होता. त्यावेळी वणी, मारेगाव व झरी तालुक्यातून अक्षरश: तक्रारींचा पाऊस पडला होता. सतत आठ तास बसूनही संपूर्ण तक्रारीचा निपटारा पालकमंत्र्यांना करता आला नव्हता. मात्र अनेक तक्रारीवर संबंधित अधिकाऱ्याने सकारात्मक उत्तरे दिल्याने तक्रारकर्त्यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. दुसरा जनता दरबार आॅगस्ट महिन्यात घेण्यात येईल. त्यावेळेपर्यंत पहिल्या जनता दरबारातील सर्व तक्रारींचा निपटारा व्हायला पाहिजे, अशी तंबी त्यावेळी पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिली होती. नागरिकांच्या तक्रारीवर काय निर्णय घेण्यात आला. याचे लेखी उत्तर तक्रारकर्त्याला कळविण्याच्या सूचनाही त्यावेळी देण्यात आल्या होत्या. मात्र अनेक तक्रारकर्त्यांना अजूनही त्यांच्या तक्रारीचे काय झाले, याची माहिती प्राप्त झाली नाही. त्यामुळे अधिकाऱ्यांनी त्यावेळी आपली वेळ मारून नेली तर नाही ना, असे अनेकांना वाटू लागले आहे. दुसऱ्या दरबारात या अधिकाऱ्यांची पोलखोल होणार, असे जनतेला वाटत होते. मात्र पाच महिने लोटूनही दुसरा जनता दरबार घेण्यात आलाच नाही. त्यामुळे जनतेची घोर निराशा झाली असून आता जनतेला दुसऱ्या जनता दरबाराची प्रतीक्षा आहे. (स्थानिक प्रतिनिधी)