शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

समित्याच बरखास्त करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 00:01 IST

जिल्हा परिषदेच्या समित्यांना अधिकारच नसेल, तर सर्व समित्याच बरखास्त करा,....

ठळक मुद्देसदस्य आक्रमक : जिल्हा परिषद शिक्षण समितीची सभा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हा परिषदेच्या समित्यांना अधिकारच नसेल, तर सर्व समित्याच बरखास्त करा, अशी आक्रमक भूमिका शिक्षण समितीच्या सभेत सदस्यांनी घेतली. यामुळे बराच काळ सभेत वादंग झाले.शिक्षण सभापती नंदिनी दरणे यांच्या अध्यक्षतेखाली समितीची सभा पार पडली. यात स्वाती येंडे यांनी सुरूवातीलाच अधिकारी चुकीचे मार्गदर्शन करून चुकीचो ठराव पारित करून घेतात, असा घणाघात केला. चुकीचे प्रोसीडींग लिहिले जात असून पुढील सभेत तेच इतिवृत्त मंजूर केले जात असल्याचा आक्षेप घेतला. अधिकारी कोणत्याही समस्येवर तो अधिकार मुख्य कार्यकारी अधिकाºयांना असल्याचे सांगून समितीची दिशाभूल करता, असा आरोपही स्वाती येंडे यांनी केला.यावरून सभेत वादंग झाले. सीईओंचे नाव घेऊन चुकीची माहिती देऊ नका, असा दम येंडे यांनी भरला. तसेच सभेचे शुटीेंग केले जात असून ते सीईओंना दाखवू अशा इशारा दिला. शिक्षण समितीला कोणताच निर्णय घेण्याचा अधिकार नसेल, सर्व अधिकार सीईओंनाच असेल, तर समिती बरखास्तच करून टाका, अशी तोफ त्यांनी डागली. कोणत्याच समितींना अधिकार नसतील, सर्व अधिकार सीइोंकडेच असतील, तर सर्वच समित्या बरखास्त का करीत नाही, असा सवाल येंडे यांच्यासह सर्वच सदस्यांनी उपस्थित केला. यामुळे बुधवारची सभा वादळी ठरली.सभेत २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांवर जर दोन शिक्षक असतील, तर तेथील एक शिक्षक जादा पटसंख्या असलेल्या शाळेवर पाठविण्याचा निर्णय झाला. सर्व शिक्षा अभियानातून जिल्ह्यातील ६१ शाळांना हॅन्डवॉश आणि स्वच्छता गृह बांधण्यासाठी प्रत्येकी एक लाख ७५ हजारांचा निधी देणे, तसेच जिल्ह्यातील ८८० विद्यार्थ्यांना तीन हजारांचा वाहतूक भत्ता देण्याचाही निर्णय झाला.दोन सत्रात शाळा भरणारजादा पटसंख्या असून वर्गखोल्या कमी असणाºया शाळा येत्या पाच दिवसांत दोन सत्रात सुरू करण्याचा निर्णय सभेत घेण्यात आला. तसेच प्रत्येक सदस्याने आपल्या सर्कलधील प्रत्येकी एक शाळा आदर्श करण्याचा संकल्प केला. येत्या १५ दिवसांत दिव्यांग शिक्षकांच्या प्रमाणपत्रांची तपासणी करण्याचा निर्णयही सभेत झाला.फौजदारीच्या तंबीवरून नाराजीजिल्ह्यातील कोणत्याही शाळांना कोणत्याही कारणांवरून पालकांनी कुलूप ठोकल्यास त्यांच्याविरूद्ध फौजदारी कारवाई करण्याची भूमिका सीईओंनी जाहीर केली. या भूमिकेला सर्वच सदस्यांनी विरोध दर्शविला. शिक्षक व मूलभूत सुविधांची वारंवार मागणी करूनही ते मिणत नसेल, तर पालकांनी नेमके काय करावे, असा प्रश्न सदस्यांनी उपस्थित केला.