शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

जलजन्य आजारांचे थैमान

By admin | Updated: July 26, 2016 00:02 IST

जिल्हा आरोग्य अधिकारी के.झेड. राठोड यांच्या विरोधात छेडखानीची तक्रार महिला आरोग्य कर्मचाऱ्यांनी दाखल केली.

तिघांचा गॅस्ट्रोने मृत्यू : शासकीय व खासगी रुग्णालये हाऊसफुल्ल, आरोग्य यंत्रणा सतर्क आरोग्य यंत्रणेत सावळा गोंधळ जिल्हा आरोग्य अधिकारी के.झेड. राठोड यांच्या विरोधात छेडखानीची तक्रार महिला आरोग्य कर्मचाऱ्यांनी दाखल केली. त्यापूर्वीच आरोग्य कर्मचारी आंदोलन करीत होते. शिवाय वैद्यकीय अधिकाऱ्यांचाही रोष होता. ही सर्व स्थिती ऐन पावसाळ्याच्या तोंडावर निर्माण झाली. आता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातही गेल्या काही दिवसांपासून अधिष्ठाताविरोधात विभाग प्रमुख असे शीतयुद्ध सुरू आहे. येथील औषधशास्त्र विभाग प्रमुखसुद्धा यामुळेच वैद्यकीय रजेवर गेले आहेत. या सर्व घडामोडींचा परिणाम थेट सर्वसामान्य रुग्णांवर होत आहे. जिल्हा हिवताप निर्मूलन अधिकारी डॉ. सुरेश तरोडेकर यांच्या बदलीने जागा रिक्त आहे. या ठिकाणी अद्याप कुणीच रुजू झालेले नाही. तंत्रज्ञाकडे प्रभार सोपवून कामकाज सुरू आहे. यवतमाळ : दमदार पावसासोबतच निर्माण झालेल्या दूषित जलस्रोताने जिल्ह्यात जलजन्य आणि साथीच्या आजाराचा उद्रेक झाला आहे. शासकीय आणि खासगी रुग्णालयात रुग्णांची चिकार गर्दी झाली आहे. दररोज रुग्ण संख्या वाढत असून हगवण, ताप, उलटी आदींचे रुग्ण मोठ्या प्रमाणात रुग्णालयात दाखल होत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने आरोग्य यंत्रणेला सतर्क राहण्याचे आदेश दिले आहे. दरम्यान जिल्ह्यात महिनाभरात गॅस्ट्रोमुळे तिघांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. गत तीन वर्षानंतर यंदा जिल्ह्यात सर्वत्र दमदार पाऊस कोसळत आहे. जुलै महिन्यातच वार्षिक सरासरीच्या ६० टक्के पाऊस कोसळला आहे. नदी, नाल्यांसह सर्व जलस्रोतात तुडुंब पाणी भरले आहे. ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचे जलस्रोत अद्यापही निर्जंतुक करण्यात आले नाही. त्यासोबतच शेतशिवारात जाणारे मजूर मिळेल तेथील पाणी प्राशन करीत आहे. दूषित पाण्यातून जलजन्य आजार होण्याचा धोका वाढला आहे. हगवण, उलटी आणि ताप हे तीन लक्षणे असलेले रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. दूषित पाण्यामुळेच गॅस्ट्रोची लागण होते. याशिवाय डायरिया, कॉलरा, कावीळ आणि टायफाईडचे रुग्णही येत आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.टी.जी. धोटे यांनी जिल्ह्यातील १४ ग्रामीण रुग्णालय, तीन उपजिल्हा रुग्णालयात अतिदक्षतेसंदर्भात सूचना दिल्या आहेत. नागपूर जिल्ह्यातील सावर येथे कॉलराची मोठ्याप्रमाणात दूषित पाण्यामुळे लागण झाली होती. याची दखल घेत आरोग्य सहसंचालक डॉ. जयंत जगताप यांनी अकोला आणि नागपूर मंडळातील सर्व जिल्हा शल्यचिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेऊन प्रतिबंधात्मक उपाययोजनेवर भर देण्यास सांगितले. ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालयात दरदिवशी तपासणीसाठी चार ते पाच हजार रुग्ण येतात. त्यापैकी २० टक्के रुग्ण हे गॅस्ट्रोच्या आजाराने त्रस्त आहेत. (कार्यालय प्रतिनिधी) डेंग्यूचा धोका शहरातील अनेक वसाहतींमध्ये मोकळ्या जागेत पाण्याचे डबके साचले आहेत. यातील पाणी निथळ असून त्या ठिकाणी डेंग्यूच्या डासांची पैदास होण्यासाठी पुरक स्थिती आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात शहरात मोठ्या प्रमाणात डेंग्यूचा फैलाव होण्याची शक्यता आहे. याकडे नगरपरिषद प्रशासनाचे पूर्णत: दुर्लक्ष आहे. याशिवाय मलेरिया, फायलेरिया, चंडीपुरा व्हायरल या सारख्या कीटकजन्य आजारांचा धोका वाढला आहे. ओआरएसचे दोन लाख पॅकेटस्जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडूनही अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. यासंदर्भात शनिवारी मुख्य कार्यकारी अधिकार दीपक सिंघला, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डी.डी. भगत यांनी सर्व विभाग प्रमुख आणि जिल्ह्यातील गटविकास अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेतली. या बैठकीमध्ये जलस्रोत कसे शुद्ध ठेवता येईल, प्रतिबंधात्मक कोणत्या उपाययोजना कराव्या याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. शिवाय ओआरएसचे दोन लाख पॅकेट शासनाकडून मिळाले असल्याचेही सांगण्यात आले. याचे घरोघरी जाऊन वितरण करण्याची जबाबदारी आरोग्य कर्मचाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. वॉर्डात जमिनीवर रुग्ण वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या औषधशास्त्र विभागात तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांची संख्याही दिवसाकाठी १०० ते १५० ने वाढली आहे. त्यामध्ये जलजन्य आणि विषाणूजन्य तापाचेही रुग्ण आहेत. सर्दी, खोकला, अंगदुखी, उलट्या आणि मळमळ ही लक्षणे असलेले रुग्ण येत आहे. शिवाय गॅस्ट्रोची लागण झालेले १५ ते २० रुग्ण दरदिवशी दाखल होत आहे. शासकीय रुग्णालयात पुरुषांसाठी ६० खाटा तर स्त्रियांसाठी ४५ खाटांची व्यवस्था आहे. त्यामुळे आता रुग्णसेवा वाढल्याने वार्डात खाली गाद्या टाकण्याची वेळ आली आहे. तिघांचा बळी गॅस्ट्रोमुळे कळंब तालुक्यात, आर्णी तालुक्यातील पहाबळ येथील महिलेचा शासकीय रुग्णालयात आणि पुसद येथे एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. जोरदार झालेल्या पावसाने जलस्रोत दूषित झाले आहे. पाणी गुणवत्ता समितीकडून यलो कार्ड मिळालेल्या नगरपरिषद आणि ग्रामपंचायतींनी जलस्रोताच्या शुद्धीकरणासाठी वेळीच उपाययोजना न केल्यामुळे हा उद्रेक झाला आहे. पावसाळ्यात नागरिकांनी उकळून पाणी प्यावे, जेणे करून जलजन्य आजाराचा धोका टाळता येईल, शिवाय उघड्यावरचे आणि शिळे अन्न घेणे टाळावे. नागरिकांनी उपचारासाठी हयगय न करता तत्काळरुग्णालयात जाऊन उपचार करावे- डॉ.बाबा येलकेविभाग प्रमुख, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय.