शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
5
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
6
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
7
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
8
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
9
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
10
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
11
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
12
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
13
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
14
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
15
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
16
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
17
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
18
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
19
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
20
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)

दूषित पाण्यामुळे आजार बळावले

By admin | Updated: April 12, 2015 00:05 IST

तालुक्यातील ग्रामीण भागात दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून साथींच्या आजारात वाढ होत आहे़...

पांढरकवडा तालुका : अशुद्ध पाण्यामुळे ग्रामस्थ बेजार, फ्लोराईडयुक्त पाणीही आले नशिबीपांढरकवडा : तालुक्यातील ग्रामीण भागात दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून साथींच्या आजारात वाढ होत आहे़ग्रामीण भागात विहिरी, नद्या, नाले, हातपंप याद्वारे गावकरी आपली पाण्याची गरज भागवतात़ जनतेला शुद्ध पाणी पोहोचविणे ही शासनाची जबाबदारी आहे़ त्यासाठी शासनाकडून अनेक उपाययोजनाही केल्या जातात़ मात्र प्रशासनातर्फे त्याची योग्य ती अंमलबजावणी होत नसल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना स्वच्छ पाणी मिळणे दुरापास्त झाले आहे़ ग्रामीण भागातील जनताही जे पाणी जशा प्रकारे मिळेल, ते पाणी प्राशन करून अनेक आजारांना निमंत्रण देत आहे़ग्रामीण भागातील नागरिकांना शुद्ध पाणी मिळावे म्हणून जिल्हा परिषदेमार्फत अनेक योजना कार्यान्वित करण्यात आल्या़ तथापि या योजना राबविल्याच जात नसल्यामुळे ग्रामस्थांना अशुद्ध पाणी प्राशन करावे लागत आहे. तालुक्यात अनेक गावांत पाणी पुरवठा योजना कार्यान्वित आहे़ हातपंप, सार्वजनिक विहिरी, ट्युबवेल यातूनही नागरिकांना पाणी पुरवठा होतो़ पिण्यासाठी वापरण्यात येणारे पाणी पिण्यास योग्य आहे किंवा नाही, यासाठी पाणी तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविणे आवश्यक आहे़ तशा स्पष्ट सूचनाही प्रशासनातर्फे देण्यात आल्या आहेत़ मात्र या सूचनांकडे गंभीरतेने पाहिल्या जात नाही़ स्थानिक प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष केले जाते़ पाणी अशुद्ध आहे हे माहित असूनही बरेचदा पाण्याचे दुसरे कोणतेही स्त्रोत उपलब्ध नसल्यामुळे त्याच पाण्याचा पुरवठा केला जातो़ अनेक गावात फ्लोराइडयुक्त पाणी असून ते पिण्यास अयोग्य आहे़ तरीही ग्रामस्थांना तेच पाणी प्यावे लागत आहे. त्यामुळे अनेकांना हाडांचे आजार झाले आहेत़ सर्वाधिक फ्लोराइडयुक्त पाणी तालुक्यात मंगी (कोलाम पोड) या गावात आहे़ (तालुका प्रतिनिधी)दूषित पाण्याला डॉक्टरांचा दुजोरापाणी ज्या स्त्रोतापासून मिळते त्या विहिरी, हातपंपांजवळ मोठ्या प्रमाणात घाण पसरलेली असते़ त्यामुळे पाणी दूषित होते़ पाण्यात नियमित ब्लिचिंग पावडरही टाकले जात नाही़ त्यामुळे याच दूषित पाण्यामुळे साथीच्या आजारात सतत वाढ होत असल्याचे येथील शासकीय उपजिल्हा रूग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले़ सध्या तालुक्यात साथीच्या आजारांनी जोर पकडला आहे़ दूषित पाण्यामुळे या आजारात सतत वाढ होत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे़ पाण्याचे स्त्रोत स्वच्छ राखण्यासाठी यंत्रणा नाही़ त्यामुळेच ग्रामस्थांना अशुद्ध पाणी प्यावे लागत असून विविध आजारांना तोंड द्यावे लागत आहे़