शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळी मदत वाटपात राजकीय अपयश उघड

By admin | Updated: March 9, 2016 00:18 IST

संपूर्ण जिल्हा दुष्काळात असताना केवळ नऊ लाखांची मदत देवून तोंडाला पाने पुसली गेली असतानाच दुसऱ्या टप्प्यातही मदत वाटपात जिल्ह्याला वगळण्यात

यवतमाळ : संपूर्ण जिल्हा दुष्काळात असताना केवळ नऊ लाखांची मदत देवून तोंडाला पाने पुसली गेली असतानाच दुसऱ्या टप्प्यातही मदत वाटपात जिल्ह्याला वगळण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार पुढे आला आहे. यानिमित्ताने जिल्ह्यातील सत्ताधारी भाजप-शिवसेनेचे राजकीय अपयश उघड झाले आहे. सन २०१५ चा खरीप हंगाम अपुऱ्या पावसामुळे बुडाला. त्यावेळी शासनाने ५० पैशांपेक्षा कमी पैसेवारी असलेल्या गावांसाठी साडेतीन हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले. पहिल्या टप्प्यात २१ जिल्ह्यांना दोन हजार कोटी रुपयांचा निधी वाटप केला गेला. त्यात यवतमाळ जिल्ह्याला केवळ नऊ लाख रुपये दिले गेले. त्यावरून शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. जिल्ह्यातील सरकारने सारवासारव करताना दुसऱ्या टप्प्यात निधी खेचून आणू, असे आश्वासन दिले. त्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचे वेळोवेळी येथे बैठकांदरम्यान आणि माध्यमांपुढे छातीठोकपणे सांगितलेसुद्धा. त्यामुळे शेतकऱ्यांच्या या मदतीकडे नजरा लागलेल्या असतानाच दुसऱ्या टप्प्यातही यवतमाळ जिल्ह्यावर घोर अन्याय केला गेल्याची बाब उघड झाली आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये ५३६ कोटींचा निधी वाटप केला गेला. मात्र त्यातून यवतमाळ जिल्ह्याला पुन्हा वगळण्यात आले. यापूर्वी मदत वाटपासाठी दिलेल्या निधीतील रकमेचे वाटप ९० टक्क्यांपेक्षा कमी आहे, असे कारण त्यासाठी पुढे केले गेले. वास्तविक महसूलमंत्र्यांच्या बुलडाणा या पालकत्व स्वीकारलेल्या जिल्ह्याला पहिल्या टप्प्यात १८३ कोटी ८३ लाख व दुसऱ्या टप्प्यात ७२ कोटी ५१ लाख एवढी भरीव मदत दिली गेली. मदतीची ही रक्कम त्यांनी शेतकऱ्यांसाठी अक्षरश: खेचून नेल्याचे दिसून येते. त्या तुलनेत ही मदत खेचून आणण्यात जिल्ह्यातील पालकमंत्री आणि विशेषत: भाजपाचे मंत्री, पाचही आमदार अपयशी ठरल्याचे दिसून येते. (प्रतिनिधी)