शहरं
Join us  
Trending Stories
1
"लाज वाटू द्या, गिधाडांनो !"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावला, पोलिसांची दडपशाही (video viral)
2
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
3
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
4
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
5
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
6
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
7
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
8
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
9
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
10
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
11
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
12
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
13
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
14
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
15
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
16
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
17
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  
18
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
19
सेन्सेक्स-निफ्टी सपाट! पण, अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये धडाकेबाज वाढ! कोणत्या क्षेत्रात घसरण?
20
"संजय शिरसाट यांच्या मुलाची मालमत्ता शून्य, मग त्यांनी हॉटेल विकत कसं घेतलं?" अंबादास दानवेंचा सवाल

दुष्काळी मदत वाटपात राजकीय अपयश उघड

By admin | Updated: March 9, 2016 00:18 IST

संपूर्ण जिल्हा दुष्काळात असताना केवळ नऊ लाखांची मदत देवून तोंडाला पाने पुसली गेली असतानाच दुसऱ्या टप्प्यातही मदत वाटपात जिल्ह्याला वगळण्यात

यवतमाळ : संपूर्ण जिल्हा दुष्काळात असताना केवळ नऊ लाखांची मदत देवून तोंडाला पाने पुसली गेली असतानाच दुसऱ्या टप्प्यातही मदत वाटपात जिल्ह्याला वगळण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार पुढे आला आहे. यानिमित्ताने जिल्ह्यातील सत्ताधारी भाजप-शिवसेनेचे राजकीय अपयश उघड झाले आहे. सन २०१५ चा खरीप हंगाम अपुऱ्या पावसामुळे बुडाला. त्यावेळी शासनाने ५० पैशांपेक्षा कमी पैसेवारी असलेल्या गावांसाठी साडेतीन हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले. पहिल्या टप्प्यात २१ जिल्ह्यांना दोन हजार कोटी रुपयांचा निधी वाटप केला गेला. त्यात यवतमाळ जिल्ह्याला केवळ नऊ लाख रुपये दिले गेले. त्यावरून शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. जिल्ह्यातील सरकारने सारवासारव करताना दुसऱ्या टप्प्यात निधी खेचून आणू, असे आश्वासन दिले. त्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचे वेळोवेळी येथे बैठकांदरम्यान आणि माध्यमांपुढे छातीठोकपणे सांगितलेसुद्धा. त्यामुळे शेतकऱ्यांच्या या मदतीकडे नजरा लागलेल्या असतानाच दुसऱ्या टप्प्यातही यवतमाळ जिल्ह्यावर घोर अन्याय केला गेल्याची बाब उघड झाली आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये ५३६ कोटींचा निधी वाटप केला गेला. मात्र त्यातून यवतमाळ जिल्ह्याला पुन्हा वगळण्यात आले. यापूर्वी मदत वाटपासाठी दिलेल्या निधीतील रकमेचे वाटप ९० टक्क्यांपेक्षा कमी आहे, असे कारण त्यासाठी पुढे केले गेले. वास्तविक महसूलमंत्र्यांच्या बुलडाणा या पालकत्व स्वीकारलेल्या जिल्ह्याला पहिल्या टप्प्यात १८३ कोटी ८३ लाख व दुसऱ्या टप्प्यात ७२ कोटी ५१ लाख एवढी भरीव मदत दिली गेली. मदतीची ही रक्कम त्यांनी शेतकऱ्यांसाठी अक्षरश: खेचून नेल्याचे दिसून येते. त्या तुलनेत ही मदत खेचून आणण्यात जिल्ह्यातील पालकमंत्री आणि विशेषत: भाजपाचे मंत्री, पाचही आमदार अपयशी ठरल्याचे दिसून येते. (प्रतिनिधी)