शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
3
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
4
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
5
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
6
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
7
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
8
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
9
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
10
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
13
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
14
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
15
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
16
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
17
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
18
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
19
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

शिस्तबद्ध जीवन हेच सुखाचे साधन

By admin | Updated: November 14, 2016 01:37 IST

सेवा, समर्पण आणि सहकार्याची भावना अगदी पुरातन काळापासून मानवी मनात वसत आली आहे.

जीवन देशमुख : निवृत्त अभियंता मित्र मंडळाची व्याख्यानमालायवतमाळ : सेवा, समर्पण आणि सहकार्याची भावना अगदी पुरातन काळापासून मानवी मनात वसत आली आहे. अगोदरच्या काळात या भावनांचे प्रकटीकरण मानवाकडून मोठ्या प्रमाणात व्हायचे. परंतु आज या भावना फारशा प्रकट होताना दिसत नाही. कारण आपण आपली जीवनशैली झपाट्याने बदलायला लागलो आहोत. परंतु शिस्तबद्ध जीवन हेच सुखाचे साधन आहे, ही गोष्ट आपण विसरता कामा नये, असे उद्गार जीवन देशमुख यांनी काढले. निवृत्त अभियंता मित्र मंडळाद्वारे येथे आयोजित प्रबोधन व्याख्यानमालेत ‘हसत खेळत तणावमुक्त जीवन’ या विषयावर ते बोलत होते. ते म्हणाले, वेदना हृदयात सांभाळता आल्या असत्या तर नेत्रात अश्रू आलेच नसते. अश्रूंद्वारे वेदना बाहेर पडतात आणि आपण तणावमुक्त होतो. तणावमुक्त जीवन जगण्यासाठी ‘जिंदगी का नाम कभी खुशी गभी गम है’ ही गोष्ट आपणास स्वीकारता आली पाहिजे. शुद्ध आचार, शुद्ध विचार आणि निसर्गानुकुल दिनचर्या यावर आपण लक्ष केंद्रीत करू शकलो तर हसत खेळत तणावमुक्त जीवन जगणे मानवास सहज शक्य आहे. परमेश्वराने सर्वांनाच बुद्धी दिलेली आहे. त्याचा योग्य वापर करता आला तर जीवनातील उदासीनता, निराशा दूर होवून हसत-खेळत तणावमुक्त जीवन सहजपणे जगता येते, असे ते म्हणाले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष गोपाळराव भास्करवार होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला वसुधा पांडे यांनी स्वागतगीत सादर केले. माजी खासदार राजाभाऊ ठाकरे यांच्या हस्ते जीवन देशमुख यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. पाहुण्यांचा परिचय किशोर इंगळे यांनी करून दिला. संचालन वसंत पांडे यांनी केले. उत्तम राठोड यांनी सादर केलेल्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. (वार्ताहर)