शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
2
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
3
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
4
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
5
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
6
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
7
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
8
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
9
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
10
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
11
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
12
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
13
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
14
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
15
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
16
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
17
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
18
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
19
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
20
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...

आरोग्यदूत ‘आशा’च्या पदरी निराशाच

By admin | Updated: February 20, 2015 01:48 IST

आरोग्य क्षेत्रात मुलभूत बदल घडवून आणण्याच्या उद्देशाने शासनाने आरोग्य अभियान राबविणे सुरू केले आहे. ग्रामीण भागात या अभियानासाठी ‘आशा’ची नियुक्ती केली आहे.

मांगलादेवी : आरोग्य क्षेत्रात मुलभूत बदल घडवून आणण्याच्या उद्देशाने शासनाने आरोग्य अभियान राबविणे सुरू केले आहे. ग्रामीण भागात या अभियानासाठी ‘आशा’ची नियुक्ती केली आहे. आरोग्य खात्याच्या योजना व संदेश ग्रामीण जनतेपर्यंत पोहोचविण्याची धुरा ‘आशा’च्या खांद्यावर आहे. त्या देखील सक्षमपणे आपले कार्य पार पाडत आहेत. मात्र हे काम करीत असताना त्यांच्या पदरी केवळ उपेक्षाच येत आहे. आरोग्य विभागात गलेलठ्ठ पगार घेवून मुख्यालयी न राहता केवळ मोबाईलवरून आशांची संपर्क साधून गावांच्या आरोग्याचा गाडा हाकणारे अनेक अधिकारी, कर्मचारी आहेत. मात्र रात्रंदिवस या अभियानात झटणाऱ्या ‘आशां’ना शासनाकडून पगार तर सोडाच मानधनही वेळेवर मिळत नाही. ग्रामीण भागात आरोग्य विभागांतर्गत काम करणाऱ्या ‘आशां’ना आतापर्यंत विनावेतन काम करावे लागत होते. शासनाने १ एप्रिल २०१४ पासून ५०० रुपये असे अत्यल्प मानधन मंजूर केले आहे. परंतु अद्याप ते देखील मिळाले नाही. कामाचा मोबदला देखील चार-पाच महिने त्यांना मिळत नाही. बाल संगोपन, कुटुंब कल्याण, हिवताप, क्षयरोग, कुष्ठरोग, साथरोग, हत्तीपाय, जंतांचे औषधी वाटप, विविध प्रकल्पांचा सर्वे, शौचालय बांधणे व वापरण्यास नागरिकांना प्रोत्साहित करणे, गरोदर मातांना दवाखान्यातच प्रसूतीकरिता प्रोत्साहित करणे, प्राथमिक तपासणी, प्रसूती, प्रसूतीनंतरचे लसीकरण, पल्स पोलिओ आदी अनेक महत्त्वपूर्ण कामे आणि आरोग्यासंबंधीच्या राष्ट्रीय योजनांच्या अंमलबजावणीमध्ये ‘आशां’चा महत्त्वपूर्ण सहभाग असतो. शून्य ते सहा वर्ष वयोगटातील बालकांची तपासणी आदींमध्येदेखील आशा स्वयंसेविकांचा सक्रिय सहभाग असतो. आशा स्वयंसेविकांमुळे ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा आधार मिळाला आहे. पूर्वी मोलमजूरी करून आशा स्वयंसेविका आपला संसार चालवायच्या. आता स्त्री आरोग्यदूत म्हणून कार्य करीत असताना तिला अंगणवाडी सेविकांप्रमाणे सात हजार रुपये मासिक वेतन मिळावे, अशी त्यांची अपेक्षा आहे. (वार्ताहर)