शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

आरोग्यदूत ‘आशा’च्या पदरी निराशाच

By admin | Updated: February 20, 2015 01:48 IST

आरोग्य क्षेत्रात मुलभूत बदल घडवून आणण्याच्या उद्देशाने शासनाने आरोग्य अभियान राबविणे सुरू केले आहे. ग्रामीण भागात या अभियानासाठी ‘आशा’ची नियुक्ती केली आहे.

मांगलादेवी : आरोग्य क्षेत्रात मुलभूत बदल घडवून आणण्याच्या उद्देशाने शासनाने आरोग्य अभियान राबविणे सुरू केले आहे. ग्रामीण भागात या अभियानासाठी ‘आशा’ची नियुक्ती केली आहे. आरोग्य खात्याच्या योजना व संदेश ग्रामीण जनतेपर्यंत पोहोचविण्याची धुरा ‘आशा’च्या खांद्यावर आहे. त्या देखील सक्षमपणे आपले कार्य पार पाडत आहेत. मात्र हे काम करीत असताना त्यांच्या पदरी केवळ उपेक्षाच येत आहे. आरोग्य विभागात गलेलठ्ठ पगार घेवून मुख्यालयी न राहता केवळ मोबाईलवरून आशांची संपर्क साधून गावांच्या आरोग्याचा गाडा हाकणारे अनेक अधिकारी, कर्मचारी आहेत. मात्र रात्रंदिवस या अभियानात झटणाऱ्या ‘आशां’ना शासनाकडून पगार तर सोडाच मानधनही वेळेवर मिळत नाही. ग्रामीण भागात आरोग्य विभागांतर्गत काम करणाऱ्या ‘आशां’ना आतापर्यंत विनावेतन काम करावे लागत होते. शासनाने १ एप्रिल २०१४ पासून ५०० रुपये असे अत्यल्प मानधन मंजूर केले आहे. परंतु अद्याप ते देखील मिळाले नाही. कामाचा मोबदला देखील चार-पाच महिने त्यांना मिळत नाही. बाल संगोपन, कुटुंब कल्याण, हिवताप, क्षयरोग, कुष्ठरोग, साथरोग, हत्तीपाय, जंतांचे औषधी वाटप, विविध प्रकल्पांचा सर्वे, शौचालय बांधणे व वापरण्यास नागरिकांना प्रोत्साहित करणे, गरोदर मातांना दवाखान्यातच प्रसूतीकरिता प्रोत्साहित करणे, प्राथमिक तपासणी, प्रसूती, प्रसूतीनंतरचे लसीकरण, पल्स पोलिओ आदी अनेक महत्त्वपूर्ण कामे आणि आरोग्यासंबंधीच्या राष्ट्रीय योजनांच्या अंमलबजावणीमध्ये ‘आशां’चा महत्त्वपूर्ण सहभाग असतो. शून्य ते सहा वर्ष वयोगटातील बालकांची तपासणी आदींमध्येदेखील आशा स्वयंसेविकांचा सक्रिय सहभाग असतो. आशा स्वयंसेविकांमुळे ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा आधार मिळाला आहे. पूर्वी मोलमजूरी करून आशा स्वयंसेविका आपला संसार चालवायच्या. आता स्त्री आरोग्यदूत म्हणून कार्य करीत असताना तिला अंगणवाडी सेविकांप्रमाणे सात हजार रुपये मासिक वेतन मिळावे, अशी त्यांची अपेक्षा आहे. (वार्ताहर)