शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
5
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
6
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
7
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
8
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
9
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
10
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
11
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
12
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
13
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
14
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
15
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
16
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
17
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
18
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
19
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज

शिष्यवृत्तीपासून विद्यार्थी वंचित

By admin | Updated: September 7, 2014 00:11 IST

आम आदमी विमा योजनेचे लाभार्थी विमा प्रमाणपत्राअभावी (एलआयसी-आयडी) योजनेपासून वंचित आहेत. ग्रामीण शाळांतील शेकडो विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे न मिळाल्याने आम आदमी योजनेअंतर्गत मिळणाऱ्या

आम आदमी : अनेकांना अद्याप प्रमाणपत्रच मिळाले नाहीअण्णाभाऊ कचाटे - मारेगावआम आदमी विमा योजनेचे लाभार्थी विमा प्रमाणपत्राअभावी (एलआयसी-आयडी) योजनेपासून वंचित आहेत. ग्रामीण शाळांतील शेकडो विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे न मिळाल्याने आम आदमी योजनेअंतर्गत मिळणाऱ्या शिष्यवृत्तीपासून ते वंचित आहेत़राज्यात शासनाने सन २००७ पासून ग्रामीण भागातील १८ ते ५९ वयोगटातील लाभार्थ्यांसाठी आकस्मिक मृत्यू, अपंगत्व आल्यास गरीब कुटुंबांना काही आर्थिक लाभ, आधार व्हावा, म्हणून आम आदमी विमा योजना सुरू केली़ त्यावेळी ही योजना केवळ केंद्र शासनाच्या निकषाप्रमाणे केवळ ग्रामीण भूमिहीन शेतमजुरांपुरती मर्यादित होती़ महाराष्ट्र शासनाने सन २००८ मध्ये त्यात सुधारणा करून शेतमजुरांशिवाय एक हेक्टर बागायती व दोन हेक्टर कोरडवाहू भूधारकांना त्यात समाविष्ट केले़ याशिवाय सदर विमा प्रमाणपत्रधारकाच्या नववी ते बारावीत शिकणाऱ्या दोन अपत्यांना दरमहा १०० रूपये शिष्यवृत्ती लागू केली़ लाभार्थ्यांना या योजनेसाठी कोणताच विमा हप्ता भरावा लागत नाही़शासन दरवर्षी या योजनेसाठी कोट्यवधी रुपये विमा कंपनीकडे हप्ता म्हणून भरते. असे असले तरी, या योजनेचा प्रचार व प्रसाराअभावी आणि विमा प्रमाणपत्रांअभावी शेकडो लाभार्थी वंचित आहेत. तसेच ते योजनेबाबत अनभिज्ञ आहे. प्रशासन मात्र सुस्त आहे़ तालुक्यात महसूल रेकॉर्डनुसार या योजनेचे सात हजार १४ लाभार्थी आहे. त्यातील पाच हजार ७१२ लाभार्थ्यांना (एलआयसी-आयडी) विमा प्रमाणपत्रे मिळाली आहेत. एक हजार ३०२ लाभार्थी अद्याप या प्रमाणपत्रांपासून अद्याप वंचितच आहे़ विमा प्रमाणपत्र व (एलआयसी-आयडी) क्रमांकाशिवाय लाभार्थ्यांना मृत्यू दावा, अपघाती दावा तसेच त्यांच्या पाल्यांचे शिष्यवृत्तीचे अर्ज भरता येत नाही़ तालुक्यात २० माध्यमिक व १० कनिष्ठ माध्यमिक महाविद्यालयात सन २०१४-१५ या वर्षात नववी ते बारावीमध्ये पटावर असणाऱ्या तीन हजार ४१५ विद्यार्थ्यांपैकी केवळ एक हजार ३९० विद्यार्थी आम आदमी शिष्यवृत्तीस पात्र आहेत़ त्यातील केवळ २९५ विद्यार्थ्यांकडे पालकांचे विमा प्रमाणपत्रे आहेत़ तेच शिष्यवृत्तीसाठी अर्ज करीत आहे. उर्वरित ५१९ विद्यार्थ्यांकडे विमा प्रमाणपत्रे नसल्याने ते योजनेच्या शिष्यवृत्तीपासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे़आम आदमी शिष्यवृत्तीपासून कुणीही वंचित राहू नये म्हणून ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांकडे विमा प्रमाणपत्र आहे, किंवा ज्यांनी इंटरनेटवरून विमा क्रमांक मिळविला, त्यांचे शिष्यवृत्तीचे अर्ज शाळांकडून भरले जात आहे. तथापि ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांकडे विमा प्रमाणपत्र नाहीत किंवा ज्यांच्याकडे विमा क्रमांक नाही, अशा विद्यार्थ्यांनी सुध्दा त्यांच्या वडिलांचा विमा लाभाचा अर्ज व शिष्यवृत्तीचा अर्ज भरून द्यावा़ त्यासाठी वर्ग शिक्षक, मुख्याध्यापकांनी तलाठ्यांच्या सहकार्याने वेळ देऊन विद्यार्थी पालकांचे अर्ज अपलोड करावे, सर्व अर्ज तपासून तलाठी व मुख्याध्यापक प्रमाणीत करतील व तहसील कार्यालय सेतू केंद्रात सादर करतील़ तहसीलदार हे सर्व अर्ज आॅनलाईन तपासतील व परिपूर्ण अर्ज महा ई-मेलने विमा कार्यालयास पाठवतील, अशा लाभार्थ्यांना विमा प्रमाणपत्र व विमा क्रमांक प्राप्त होऊन विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरेणार आहे. मात्र ही प्रक्रिया जटील असल्याने व सर्वत्र आॅनलाईन सुविधा नसल्याने सदर योजनेसाठी अर्ज दाखल करण्यास विलंब होत असल्याचे दिसून येत आहे. तहसील प्रशासनाने या योजनेचे फलक व कारवाईची माहिती कार्यालयातील दर्शनी भागात नागरिकांच्या माहितीसाठी लावावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. त्यामुळे तालुक्यातील ग्रामस्थांना योजनेची माहिती मिळणे सुलभ होणार आहे.