शहरं
Join us  
Trending Stories
1
कष्टकऱ्यांचा आधारवड काेसळला: डाॅ. बाबा आढाव यांचे निधन, वयाच्या ९५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
"ठाकरे ब्रँड एकच होता, सध्या राज ठाकरेंचा वापर करून..."; CM देवेंद्र फडणवीसांचे रोखठोक मत
3
IndiGoला मोठा दणका! CEO, COO, बड्या अधिकाऱ्यांना DGCA कडून समन्स, उद्या सकाळी चौकशी
4
“धर्मवीर ३ ची स्क्रिप्ट मलाच लिहावी लागेल, आनंद दिघे...”; एकनाथ शिंदेंनी सांगितले ‘राज’कारण
5
बाबरी मशिदीचे भूमिपूजन करणाऱ्या हुमायूं कबीर यांचा मोठा 'यू-टर्न'; आता काय म्हणाले?
6
1 रुपये 34 पैशांच्या शेअरची कमाल, ₹90 वर गेला भाव, खरेदीसाठी लोकांची झुंबड; आता कंपनीनं केली मोठी घोषणा!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? युतीच्या चर्चांवर जयंत पाटलांकडून मौन; म्हणाले, "याचं उत्तर शोधणार नाही"
8
गोवा अग्निकांडाचे आरोपी इंडिगोच्या फ्लाईटने फुकेतला पसार; पोलीस पोहोचण्याआधीच काढला पळ
9
“...तर २०२९ मध्ये महायुतीच्या हातातून सत्ता जाऊ शकते, मराठे सोपे नाहीत”: मनोज जरांगे पाटील
10
जपानच्या उत्तर किनाऱ्यावर ७.२ रिश्टर स्केलचा तीव्र भूकंप; ३ मीटर उंचीच्या त्सुनामीचा इशारा
11
"कोण बसवणार आहे मला? काय बोलताय"; 'वंदे मातरम्'वर बोलत असताना राजनाथ सिंह प्रचंड भडकले
12
'क्वीन इज बॅक'..! कणखर मानसिकतेची 'रन'रागिणी! स्मृती मानधना पुन्हा मैदानात उतरण्याच्या तयारीत
13
“मंत्री येणार म्हणून फक्त देखावा नको, ३६५ दिवस प्रवाशांना सेवा द्या”: मंत्री प्रताप सरनाईक
14
लग्न करताच 'या' कपलला मिळतात 2.5 लाख रुपये, 90% लोकांना ही योजनाच माहीत नाही!
15
VIDEO: नववधूला सरप्राईज! शेजारी बसलेला नवरदेव अचानक उठला अन् सुरु केला भन्नाट डान्स
16
भाजपाच्या मित्रपक्षातील नेत्याचे बाबरी मशि‍दीला समर्थन; म्हणाले, “मुस्लीम समजाला अधिकार...”
17
"जेवढ्या दिवसांपासून मोदी PM आहेत, जवळपास तेवढे दिवस नेहरू जेलमध्ये होते"; 'वंदे मातरम'वरील चर्चेदरम्यान प्रियांका गांधींचा निशाणा
18
निवृत्तीसाठी कोणता फंड सर्वोत्तम? EPF, PPF की NPS? कोणासाठी कोणती योजना चांगली? वाचा तज्ज्ञांचा सल्ला
19
क्रिकेट चाहत्यांना धक्का! पुढील वर्षीचा टी२० वर्ल्ड कप मोबाईलवर दिसणार नाही? जिओस्टारने घेतली माघार
20
२०२५ च्या शेवटी भारतीय गुगलवर का सर्च करताहेत ५२०१३१४? अर्थ समजल्यावर तुम्हीही व्हाल हैराण
Daily Top 2Weekly Top 5

उकिरड्यावरील घाण वर्दळीच्या रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:45 IST

नवीन वसाहतीत नाल्यांची मागणी पांढरकवडा : शहराचा झपाट्याने विस्तार होत आहे. नवनवीन वस्त्या निर्माण होत आहे. अनेक नवीन वसाहतीमध्ये ...

नवीन वसाहतीत नाल्यांची मागणी

पांढरकवडा : शहराचा झपाट्याने विस्तार होत आहे. नवनवीन वस्त्या निर्माण होत आहे. अनेक नवीन वसाहतीमध्ये नाल्या नसल्याने सांडपाणी रस्त्यावर येत आहे. सांडपाणी रस्त्यावर येत असल्याने नागरिकांच्या आरोग्यालाही धोका निर्माण झाला असून, डासांची पैदास मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे या ठिकाणी नाल्या निर्माण करण्याची मागणी आहे.

पांढरकवडा शहरात अस्ताव्यस्त पार्किंग

पांढरकवडा : शहरात अनेक ठिकाणी वाहन चालक आपली वाहने अस्ताव्यस्त उभी करत असल्याने, अनेकांना रस्त्याने जाताना अडचण निर्माण होत आहे. काही वाहन चालक तर रस्त्यावर दुचाकी व चारचाकी वाहन उभे करून दुकानात जातात. त्यामुळे बरेचदा वाहतुकीचीही कोंडी होते. त्यामुळे अस्ताव्यस्त पार्किंग करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याची गरज आहे.

जनावरांचे लसीकरण करण्याची मागणी

मारेगाव : तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांजवळ पाळीव जनावरे आहेत. या जनावरांवर पावसाळ्यात साथीच्या आजाराची लागण होऊन जनावरे दगावतात. त्यामुळे पशुपालकांचे मोठे आर्थिक नुकसान होते. ही परिस्थिती पाहता, पाळीव जनावरांना आजार होणार नाही, यासाठी लसीकरण करण्याची मागणी आता पशुपालकांकडून केली जात आहे.

भटक्या श्वानांच्या बंदोबस्ताची मागणी

मारेगाव : शहरातील गल्लोगल्ली भटक्या श्वानांची संख्या गेल्या काही दिवसांपासून चांगलीच वाढत चालली आहे. या भटक्या श्वानांपासून बालकासह नागरिकांना धोका निर्माण झाला आहे, तर रात्रीच्या वेळेस घराबाहेर पडणेही जिकिरीचे झाले आहे. शहरातील नागरिकांना निर्माण होणाऱ्या अडचणी लक्षात घेता, नगरपंचायत प्रशासनाने यावर उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.

मारेगावात बेरोजगारांच्या संख्येत झाली वाढ

मारेगाव : तालुक्यातील शेतकऱ्यांच्या तरुण मुलांना कृषी सलग्न व्यवसायाची माहिती व प्रशिक्षणाची तालुक्याच्या ठिकाणी कोणतीही सुविधा मिळत नसल्याने शेतकरी शेतमजूर पुत्रांच्या हाताला काम नाही. त्यामुळे शहरासह तालुक्यात आता बेरोजगारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या बेरोजगार तरुणांना शेतीबरोबर जोडधंदा करण्याचे मार्गदर्शन व शिबिराचे आयोजन जिल्हा परिषदमार्फत करण्यात यावे, अशी मागणी होत आहे.

बस स्थानक बांधकाम करण्याची मागणी

मारेगाव : मारेगाव येथील बस स्थानकाकरिता महसूल विभागाला जागेचा मोबदला तथा परिवहन विभागाला जागेचे ताबापत्र झाले असले, तरी अजूनही बस स्थानक बांधकाम सुरू झाले नाही. त्यामुळे तालुकावासीयांचा हिरमोड झाला आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देऊन नागरिकांची होणारी हेळसांड बघता, आता तरी या बस स्थानकाच्या बांधकाम सुरुवात करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

१० रुपयांचे नाणे व्यवहारातून बाद

नांदेपेरा : रिझर्व्ह बँकेनी चिल्लर व्यवहार करण्यासाठी पाच, दहा रुपयांच्या नाण्या(कलदार)ची निर्मिती केली, परंतु सध्या १० रुपयांचे नाणे चलनात असूनही दुकानदार घेत नसल्याने, दहा रुपयांचे नाणे व्यवहारातून बाद झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या १० रुपयांच्या नाण्याबाबत शासन स्तरावरून जनजागृती करण्याची गरज निर्माण झाली आहे.