शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

उकिरड्यावरील घाण वर्दळीच्या रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:45 IST

नवीन वसाहतीत नाल्यांची मागणी पांढरकवडा : शहराचा झपाट्याने विस्तार होत आहे. नवनवीन वस्त्या निर्माण होत आहे. अनेक नवीन वसाहतीमध्ये ...

नवीन वसाहतीत नाल्यांची मागणी

पांढरकवडा : शहराचा झपाट्याने विस्तार होत आहे. नवनवीन वस्त्या निर्माण होत आहे. अनेक नवीन वसाहतीमध्ये नाल्या नसल्याने सांडपाणी रस्त्यावर येत आहे. सांडपाणी रस्त्यावर येत असल्याने नागरिकांच्या आरोग्यालाही धोका निर्माण झाला असून, डासांची पैदास मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे या ठिकाणी नाल्या निर्माण करण्याची मागणी आहे.

पांढरकवडा शहरात अस्ताव्यस्त पार्किंग

पांढरकवडा : शहरात अनेक ठिकाणी वाहन चालक आपली वाहने अस्ताव्यस्त उभी करत असल्याने, अनेकांना रस्त्याने जाताना अडचण निर्माण होत आहे. काही वाहन चालक तर रस्त्यावर दुचाकी व चारचाकी वाहन उभे करून दुकानात जातात. त्यामुळे बरेचदा वाहतुकीचीही कोंडी होते. त्यामुळे अस्ताव्यस्त पार्किंग करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याची गरज आहे.

जनावरांचे लसीकरण करण्याची मागणी

मारेगाव : तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांजवळ पाळीव जनावरे आहेत. या जनावरांवर पावसाळ्यात साथीच्या आजाराची लागण होऊन जनावरे दगावतात. त्यामुळे पशुपालकांचे मोठे आर्थिक नुकसान होते. ही परिस्थिती पाहता, पाळीव जनावरांना आजार होणार नाही, यासाठी लसीकरण करण्याची मागणी आता पशुपालकांकडून केली जात आहे.

भटक्या श्वानांच्या बंदोबस्ताची मागणी

मारेगाव : शहरातील गल्लोगल्ली भटक्या श्वानांची संख्या गेल्या काही दिवसांपासून चांगलीच वाढत चालली आहे. या भटक्या श्वानांपासून बालकासह नागरिकांना धोका निर्माण झाला आहे, तर रात्रीच्या वेळेस घराबाहेर पडणेही जिकिरीचे झाले आहे. शहरातील नागरिकांना निर्माण होणाऱ्या अडचणी लक्षात घेता, नगरपंचायत प्रशासनाने यावर उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.

मारेगावात बेरोजगारांच्या संख्येत झाली वाढ

मारेगाव : तालुक्यातील शेतकऱ्यांच्या तरुण मुलांना कृषी सलग्न व्यवसायाची माहिती व प्रशिक्षणाची तालुक्याच्या ठिकाणी कोणतीही सुविधा मिळत नसल्याने शेतकरी शेतमजूर पुत्रांच्या हाताला काम नाही. त्यामुळे शहरासह तालुक्यात आता बेरोजगारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या बेरोजगार तरुणांना शेतीबरोबर जोडधंदा करण्याचे मार्गदर्शन व शिबिराचे आयोजन जिल्हा परिषदमार्फत करण्यात यावे, अशी मागणी होत आहे.

बस स्थानक बांधकाम करण्याची मागणी

मारेगाव : मारेगाव येथील बस स्थानकाकरिता महसूल विभागाला जागेचा मोबदला तथा परिवहन विभागाला जागेचे ताबापत्र झाले असले, तरी अजूनही बस स्थानक बांधकाम सुरू झाले नाही. त्यामुळे तालुकावासीयांचा हिरमोड झाला आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देऊन नागरिकांची होणारी हेळसांड बघता, आता तरी या बस स्थानकाच्या बांधकाम सुरुवात करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

१० रुपयांचे नाणे व्यवहारातून बाद

नांदेपेरा : रिझर्व्ह बँकेनी चिल्लर व्यवहार करण्यासाठी पाच, दहा रुपयांच्या नाण्या(कलदार)ची निर्मिती केली, परंतु सध्या १० रुपयांचे नाणे चलनात असूनही दुकानदार घेत नसल्याने, दहा रुपयांचे नाणे व्यवहारातून बाद झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या १० रुपयांच्या नाण्याबाबत शासन स्तरावरून जनजागृती करण्याची गरज निर्माण झाली आहे.