शहरं
Join us  
Trending Stories
1
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
4
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
5
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
6
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
7
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
8
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
9
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
10
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
11
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
12
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
13
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
14
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
15
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
16
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
17
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
18
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
19
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
20
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...

थेट नगराध्यक्षांची आमदारांना भीती वाटते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 23:47 IST

राज्यात थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडून आले आहेत. त्यामुळे पुढे चालून हे नगराध्यक्ष आमदारकीच्या मैदानात उतरल्यास आपल्याला मोठा फटका बसू शकतो, अशी भीती अनेक विद्यमान आमदारांच्या मनात निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देकांचन चौधरी : म्हणून होतो हस्तक्षेप

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राज्यात थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडून आले आहेत. त्यामुळे पुढे चालून हे नगराध्यक्ष आमदारकीच्या मैदानात उतरल्यास आपल्याला मोठा फटका बसू शकतो, अशी भीती अनेक विद्यमान आमदारांच्या मनात निर्माण झाली आहे. त्यामुळे असे आमदार आपापल्या मतदारसंघातील नगराध्यक्षांच्या कामात सतत हस्तक्षेप करून त्यांची अडवणूक करण्याचे काम करीत आहे. विशेषत: भाजपाचेच सर्वाधिक नगराध्यक्ष आणि आमदार असतानाही हे घडत आहे. ही बाब परिषदेच्या आयोजकांनी मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवावी, अशी मागणीही मी परिषदेत केली, असे चौधरी यांनी सांगितले.खासदार, आमदारांसारखा नगराध्यक्षांनाही हवा फंडथेट जनतेतून निवडून आलेल्या नगराध्यक्षाला खरेतर सभागृहात काही विशेषाधिकार असण्याची गरज आहे. मात्र तसे झालेले नाही. उलट अध्यक्षांचे अधिकार कमी करण्यात आलेले आहे. यवतमाळ पालिकेत तर मी नगराध्यक्ष असले तरी जादा नगरसेवक दुसऱ्या पक्षाचे आहे. त्या बळावर महिला पदाधिकारी म्हणून माझी प्रत्येक विषयात अडवणूक केली जात आहे. जनतेने जर मला निवडून दिले आहे, तर जनतेची कामे पूर्णत्वास नेणे हे माझे कर्तव्य आहे. थेट जनतेतून जाणाऱ्या आमदार, खासदारांना मतदारसंघात खर्च करण्यासाठी निधी दिला जातो. तसेच फंड यापुढे नगराध्यक्षांनाही मिळणे गरजेचे आहे, असा प्रस्ताव परिषदेत मांडल्याची माहिती नगराध्यक्ष चौधरी यांनी दिली.नगराध्यक्षांना द्यावा पीआरओनगराध्यक्ष कांचन चौधरी यांनी महिला पदाधिकाऱ्याच्या सक्षमतेसाठी परिषदेत चार प्रस्ताव ठेवले. पहिला प्रस्ताव होता, नगराध्यक्षांना जनसंपर्क अधिकारी मिळण्याचा. त्यासाठी त्यांनी यवतमाळ पालिकेतील उदाहरणे सर्वांपुढे ठेवली. येथील सभापती परस्पर प्रेसनोट काढून चुकीची माहिती माध्यमांपर्यंत पोहोचवितात. एखादी घोषणा करण्याचा त्यांना अधिकार नसतानाही ते घोषणा करतात. त्यामुळे नगराध्यक्षांचा पीआरओ आवश्यक असल्याचे त्या म्हणाल्या. दुसरा प्रस्ताव त्यांनी विशेषाधिकारासाठी ठेवला. अर्थसंकल्पीय सभा, स्थायी समितीची सभा अशा कोणत्याही सभेत नगराध्यक्षांना विशेषाधिकार मिळण्याची मागणी परिषदेत करण्यात आली. नगराध्यक्षांचे आर्थिक आणि प्रशासनिक अधिकार पूर्वीप्रमाणेच कायम ठेवण्यात यावे, तसेच त्यांना आमदारांप्रमाणे निधी देण्यात यावा, असेही प्रस्ताव चौधरी यांनी आंतरराष्ट्रीय परिषदेत मांडले.

टॅग्स :nagaradhyakshaनगराध्यक्ष