शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

अन्नसुरक्षा योजनेत कृषी अवजारांची थेट खरेदी

By admin | Updated: August 28, 2015 02:33 IST

राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेच्या माध्यमातून कृषी क्षेत्रात नवी क्रांती घडविण्यासाठी उत्पादन वाढीवर भर दिला जात आहे.

यवतमाळ : राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेच्या माध्यमातून कृषी क्षेत्रात नवी क्रांती घडविण्यासाठी उत्पादन वाढीवर भर दिला जात आहे. यासाठी यांत्रिकीकरणाची मदत घेतली जाणार आहे. योजनेच्या अंमलबजावणीसाठी केंद्र सरकारने अनुदानावर अवजारे देण्याचा निर्णय घेतला आहे. पूर्वी अवजारे कृषी विभागातून खरेदी करावी लागत होती. आता ही अवजारे शेतकऱ्यांना थेट बाजारपेठेतून खरेदी करता येणार असल्याने गैरप्रकाराला आळा बसणार आहे. राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेच्या माध्यमातून कृषी उत्पादनात वाढ करण्यासाठी विविध उपाय केले जात आहे. यासाठी शेतकऱ्यांच्या हातात आधुनिक कृषी अवजारे सोपविली जाणार आहेत. ही कृषी अवजारे महाग आहेत. शेतकऱ्यांच्या आर्थिक आवाक्या बाहेर आहेत. त्यामुळे कृषी अवजारे अनुदानावर वितरीत होणार आहे. पूर्वी ही अवजारे निकृष्ट असल्याचा आरोपही झाला आहे. यावर मात करण्यासोबत दर्जेदार वस्तूंची खरेदी करता यावी म्हणून केंद्र सरकारने नवा आदेश काढला आहे. यामध्ये यांत्रिकीकरणातील साहित्याची खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना मुभा राहणार आहे. त्यामुळे दर्जेदार वस्तू शेतकऱ्यांच्या हातात पडतील. कृषी विभागाकडून झालेल्या तपासणी नंतर अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. याबाबतचे आदेश कृषी संचालक के.व्ही. देशमुख यांनी काढले आहे. राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतून कोणते साहित्य खरेदी करायचे, किमत काय असेल याबाबतच्या सूचना मिळायच्या आहेत. मात्र अदेशानुसार साहित्याची खरेदी करण्याचा मार्ग खूला झाला आहे. योजनेतील गैरप्रकार टळण्यास मदत होणार आहे. (शहर वार्ताहर)