शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

जिल्ह्यात डिजिटल इंडिया सप्ताहाला प्रारंभ

By admin | Updated: July 3, 2015 00:22 IST

केंद्र शासनाने संपूर्ण भारतात १ ते ७ जुलै हा डिजिटल इंडिया सप्ताह पाळल्याचे जाहीर केले. त्यानुसार गुरुवारपासून भारत संचार निगम लिमिटेड यवतमाळ..

यवतमाळ : केंद्र शासनाने संपूर्ण भारतात १ ते ७ जुलै हा डिजिटल इंडिया सप्ताह पाळल्याचे जाहीर केले. त्यानुसार गुरुवारपासून भारत संचार निगम लिमिटेड यवतमाळ जिल्ह्यातही डिजिटल इंडिया सप्ताह राबवित असल्याची माहिती पत्रकार परिषदेत वरिष्ठ व्यवस्थापक अजय सावतकर यांनी दिली.भारत जगातील सध्या मोठे मार्केट असून सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय कंपन्या भारतात आपल्या कंपनीचे उत्पादन करीत असून भारतातील तज्ज्ञ वेगवेगळ्या देशात या क्षेत्रात काम करीत असल्याचेही त्यांनी सांगितले. परंतु अद्यापही भारतातील तळागाळातील जनतेपर्यंत डिजिटलायझेशन पोहोचल्याचे दिसत नाही. त्यामुळे त्या लोकांनाही या प्रवाहात आणण्यासाठी या सप्ताहात प्रयत्न केले जाणार असल्याचे ते म्हणाले. बीएसएनएलकडून भारतातील प्रत्येक कोपऱ्यात आज कनेक्टीव्हीटी उपलब्ध करून देण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. पहिल्या टप्प्यात देशातील एक लाख २० हजार ग्रामपंचायतींमध्ये येत्या काळात डिजिटायलेझेशनने जोडायचे असून यवतमाळ जिल्ह्यातही कळंब, बाभूळगाव, नेर, झरीजामणी या चार तालुक्यांमध्ये पहिल्या टप्प्यात २३३ ग्रामपंचायती जोडण्याचे काम सुरू झाल्याचे त्यांनी सांगितले. आॅप्टीकल फायबर कनेक्टीव्हीटीने या जोडण्यात येवून त्यानंतर त्या मुंबईला असलेल्या शासनाच्या सर्व्हरला कनेक्ट होतील आणि सर्व शासकीय कार्यालयांशी त्या कनेक्ट राहतील. यासह विविध योजनांची माहिती त्यांनी दिली. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात जनतेसाठी १०७७ हा क्रमांक आकस्मिक सेवेसाठी उपलब्ध करून दिला असून तो २४ तास सुरू असतो, असेही त्यांनी आवर्जून सांगितले. पत्रपरिषदेला बीएसएनएलचे सहाय्यक व्यवस्थापक विजय धामणीकर, अशोक बंडे, माणिक पुरचुले, संतोष गादिया, शंतनू शेटे आदींची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)