शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
2
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
3
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
4
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
5
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
6
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
7
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
8
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
9
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
10
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
11
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
12
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
13
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
14
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
15
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

सिंचनात निकषाचा खोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 23:22 IST

शेती सिंचनात वाढ होण्याच्या उद्देशाने हाती घेण्यात आलेल्या धडक सिंचन विहीर योजनेच्या यशस्वीतेत निकषाचा खोडा निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देअंतराची अट : नेर तालुक्यातील सरकारी विहिरींचे वांदे

किशोर वंजारी ।लोकमत न्यूज नेटवर्कनेर : शेती सिंचनात वाढ होण्याच्या उद्देशाने हाती घेण्यात आलेल्या धडक सिंचन विहीर योजनेच्या यशस्वीतेत निकषाचा खोडा निर्माण झाला आहे. नेर तालुक्यात सदर योजने अंतर्गत मंजूर झालेल्या ९२ विहीरी रद्द होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शेतकऱ्यांच्या गैरहजेरीत झालेले पंचनामे यामुळेही ९२ लाभार्थी योजनेला मुकण्याची भीती आहे.नेर तालुक्यासाठी धडक सिंचन योजने अंतर्गत ३०० विहिरी मंजूर झाल्या आहे. यासाठी लाभार्थ्यांची निवड ईश्वरचिठ्ठीने करण्यात आली. २९२ लाभार्थी निवडले गेले. ही प्रक्रिया पूर्ण करण्यापूर्वी योजनेचे निकष पाळले गेले नाही. परिणामी आता ९२ लाभार्थी या योजनेपासून दूर राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे. एका विहिरीपासून दुसऱ्यां विहिरीचे अंतर ५०० फूट असणे आवश्यक आहे. ही बाब प्रशासनातील अधिकाऱ्यांनी पाळली नाही. शेतकऱ्यांनी दाखविलेल्या जागेचे पंचनामेही करण्यात आले. आतामात्र ५०० फूट अंतराचे निकष पुढे आणले आहे. ज्या गावात पाणीपुरवठा नळ योजनेची विहिर आहे तेथून १६५० फूट अंतरावर धडक सिंचन विहिर नसावी हा ही निकष आहे.लाभार्थी निवडीनंतर निकष पुढे आणले आहे. वास्तविक शेतकºयांनी निश्चित केलेल्या जागेचे पंचनामे करतानाच याबाबीची दक्षता घेणे अपेक्षित होते. निकषाच्या याच बडग्यामुळे उमरठा येथील शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील मीना भुसारे यांना मंजूर झालेली विहीर रद्द करण्यात आली आहे. ५०० फुटाच्या आत जागा निश्चित केल्याच्या कारणावरून ही विहीर रद्द करण्यात आली आहे. फत्तापूर येथील हरिहर जवके यांच्या अनुपस्थितीत विहिरीचा पंचनामा करण्यात आला आहे. असे अनेक प्रकार तालुक्यात घडले आहे.अनेक प्रश्न कायमधडक सिंचन विहिरीचे लाभार्थी निवडण्यासाठी ५०० फूट अंतराची अट शेतकºयांना आधी का सांगितल्या गेली नाही. एकाचवेळी ९२ लाभार्थी नामंजूर कसे होतात, असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केले जात आहे. बसल्या जागेवर पंचनामे केले गेले हे यावरून स्पष्ट होते. यात योजनेची मात्र वाट लागत आहे.