शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
3
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
4
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
5
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
6
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
7
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
8
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
9
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
10
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
11
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
12
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
13
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
14
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
15
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
16
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
17
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
18
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
19
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
20
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा

आजी-आजोबा झाला का अभ्यास?, उद्या होणार परीक्षा

By अविनाश साबापुरे | Updated: March 16, 2024 18:45 IST

नवभारत साक्षरता मोहिमेत गेल्या वर्षभरात आजी-आजोबांनी पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान कितपत मिळविले, याची कसोटी १७ मार्च रोजी लागणार आहे.

यवतमाळ : नातवंडे दहावी-बारावीच्या परीक्षेत गुंतलेले असताना आता प्रौढ निरक्षरांचीही रविवारी परीक्षा घेतली जाणार आहे. नवभारत साक्षरता मोहिमेत गेल्या वर्षभरात आजी-आजोबांनी पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान कितपत मिळविले, याची कसोटी १७ मार्च रोजी लागणार आहे. त्यासाठी तीन तासांची लेखी परीक्षा होणार असून जिल्ह्यातील १६ हजार १९९ प्रौढ निरक्षरांची नोंदणी झाली आहे. सोळा तालुक्यातील १०८९ केंद्रांवर ही परीक्षा घेतली जाणार आहे.जिल्ह्याचे योजना शिक्षणाधिकारी किशोर पागोरे यांच्या अखत्यारित या परीक्षेचे नियोजन करण्यात आले आहे. नव भारत साक्षरता अभियानात शाळा हे एकक मानण्यात आले आहे. त्यामुळे ज्या शाळेतून उल्लास ॲपवर प्रौढ निरक्षराची नाव नोंदणी करण्यात आली होती, ती शाळाच त्यांच्यासाठी परीक्षा केंद्र राहणार आहे. या परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या प्रौढांना केंद्र सरकारतर्फे साक्षरतेचे प्रमाणपत्र आणि गुणपत्रकही दिले जाणार आहे.

ही परीक्षा सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजतापर्यंत घेतली जाणार आहे. निरक्षर व्यक्ती या दरम्यान त्याच्या सोयीच्या वेळेनुसार येऊन तीन तासांचा पेपर देऊ शकणार आहे. दिव्यांग व्यक्तींसाठी ३० मिनिटे जादा वेळ मिळणार आहे. उत्तरे लिहिण्यासाठी फक्त काळ्या किंवा निळ्या शाईचा पेन वापरावा लागणार आहे. 

कोणत्या तालुक्यात किती प्रौढ निरक्षर?आर्णी : ८४६बाभूळगाव : ४२६दारव्हा : ३८२६दिग्रस : ४६घाटंजी : ६०४कळंब : १७७४महागाव : ६२७मारेगाव : ६३९नेर : ६२०पांढरकवडा : ६८७पुसद : २८१राळेगाव : २०७उमरखेड : १३१९वणी : ८९५यवतमाळ : २५९१झरी : ४८३

अशी असेल प्रश्नपत्रिकाप्रश्नपत्रिका एकूण १५० गुणांची असून ती पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान याच्याशी संबंधित तीन भागांमध्ये विभागलेली असेल. भाग-क (वाचन) ५० गुण, भाग-ख (लेखन) ५० गुण, भाग-ग (संख्याज्ञान) ५० गुण अशी गुणविभागणी असेल. परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी प्रत्येक भागासाठी ३३ टक्के म्हणजे १७ गुण मिळविणे आवश्यक आहे. एकूण १५० गुणांपैकी ३३ टक्के म्हणजे ५१ गुण मिळविणे आवश्यक आहे.

सोळाही तालुक्यातील विविध शाळांवर एकंदर १५ हजार ८७१ निरक्षरांची नोंदणी करण्यात आली. तर जिल्ह्यातील ३२८ निरक्षरांनी स्वत: उल्लास ॲपवर नोंदणी केली आहे. परीक्षेचे साहित्य गटशिक्षणाधिकारी, मुख्याध्यापक यांच्या माध्यमातून केंद्रांवर पोहचविण्यात आले आहे. परीक्षेस येताना असाक्षर व्यक्तीने स्वतःचा फोटो, तसेच मतदान ओळखपत्र, आधारकार्ड, पॅनकार्ड, बँक पासबुक यापैकी कोणतेही एक ओळखपत्र आणावे.- किशोर पागोरे, शिक्षणाधिकारी (योजना), यवतमाळ

टॅग्स :Yavatmalयवतमाळ