शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

आजी-आजोबा झाला का अभ्यास?, उद्या होणार परीक्षा

By अविनाश साबापुरे | Updated: March 16, 2024 18:45 IST

नवभारत साक्षरता मोहिमेत गेल्या वर्षभरात आजी-आजोबांनी पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान कितपत मिळविले, याची कसोटी १७ मार्च रोजी लागणार आहे.

यवतमाळ : नातवंडे दहावी-बारावीच्या परीक्षेत गुंतलेले असताना आता प्रौढ निरक्षरांचीही रविवारी परीक्षा घेतली जाणार आहे. नवभारत साक्षरता मोहिमेत गेल्या वर्षभरात आजी-आजोबांनी पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान कितपत मिळविले, याची कसोटी १७ मार्च रोजी लागणार आहे. त्यासाठी तीन तासांची लेखी परीक्षा होणार असून जिल्ह्यातील १६ हजार १९९ प्रौढ निरक्षरांची नोंदणी झाली आहे. सोळा तालुक्यातील १०८९ केंद्रांवर ही परीक्षा घेतली जाणार आहे.जिल्ह्याचे योजना शिक्षणाधिकारी किशोर पागोरे यांच्या अखत्यारित या परीक्षेचे नियोजन करण्यात आले आहे. नव भारत साक्षरता अभियानात शाळा हे एकक मानण्यात आले आहे. त्यामुळे ज्या शाळेतून उल्लास ॲपवर प्रौढ निरक्षराची नाव नोंदणी करण्यात आली होती, ती शाळाच त्यांच्यासाठी परीक्षा केंद्र राहणार आहे. या परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या प्रौढांना केंद्र सरकारतर्फे साक्षरतेचे प्रमाणपत्र आणि गुणपत्रकही दिले जाणार आहे.

ही परीक्षा सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजतापर्यंत घेतली जाणार आहे. निरक्षर व्यक्ती या दरम्यान त्याच्या सोयीच्या वेळेनुसार येऊन तीन तासांचा पेपर देऊ शकणार आहे. दिव्यांग व्यक्तींसाठी ३० मिनिटे जादा वेळ मिळणार आहे. उत्तरे लिहिण्यासाठी फक्त काळ्या किंवा निळ्या शाईचा पेन वापरावा लागणार आहे. 

कोणत्या तालुक्यात किती प्रौढ निरक्षर?आर्णी : ८४६बाभूळगाव : ४२६दारव्हा : ३८२६दिग्रस : ४६घाटंजी : ६०४कळंब : १७७४महागाव : ६२७मारेगाव : ६३९नेर : ६२०पांढरकवडा : ६८७पुसद : २८१राळेगाव : २०७उमरखेड : १३१९वणी : ८९५यवतमाळ : २५९१झरी : ४८३

अशी असेल प्रश्नपत्रिकाप्रश्नपत्रिका एकूण १५० गुणांची असून ती पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान याच्याशी संबंधित तीन भागांमध्ये विभागलेली असेल. भाग-क (वाचन) ५० गुण, भाग-ख (लेखन) ५० गुण, भाग-ग (संख्याज्ञान) ५० गुण अशी गुणविभागणी असेल. परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी प्रत्येक भागासाठी ३३ टक्के म्हणजे १७ गुण मिळविणे आवश्यक आहे. एकूण १५० गुणांपैकी ३३ टक्के म्हणजे ५१ गुण मिळविणे आवश्यक आहे.

सोळाही तालुक्यातील विविध शाळांवर एकंदर १५ हजार ८७१ निरक्षरांची नोंदणी करण्यात आली. तर जिल्ह्यातील ३२८ निरक्षरांनी स्वत: उल्लास ॲपवर नोंदणी केली आहे. परीक्षेचे साहित्य गटशिक्षणाधिकारी, मुख्याध्यापक यांच्या माध्यमातून केंद्रांवर पोहचविण्यात आले आहे. परीक्षेस येताना असाक्षर व्यक्तीने स्वतःचा फोटो, तसेच मतदान ओळखपत्र, आधारकार्ड, पॅनकार्ड, बँक पासबुक यापैकी कोणतेही एक ओळखपत्र आणावे.- किशोर पागोरे, शिक्षणाधिकारी (योजना), यवतमाळ

टॅग्स :Yavatmalयवतमाळ