शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

आजी-आजोबा झाला का अभ्यास?, उद्या होणार परीक्षा

By अविनाश साबापुरे | Updated: March 16, 2024 18:45 IST

नवभारत साक्षरता मोहिमेत गेल्या वर्षभरात आजी-आजोबांनी पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान कितपत मिळविले, याची कसोटी १७ मार्च रोजी लागणार आहे.

यवतमाळ : नातवंडे दहावी-बारावीच्या परीक्षेत गुंतलेले असताना आता प्रौढ निरक्षरांचीही रविवारी परीक्षा घेतली जाणार आहे. नवभारत साक्षरता मोहिमेत गेल्या वर्षभरात आजी-आजोबांनी पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान कितपत मिळविले, याची कसोटी १७ मार्च रोजी लागणार आहे. त्यासाठी तीन तासांची लेखी परीक्षा होणार असून जिल्ह्यातील १६ हजार १९९ प्रौढ निरक्षरांची नोंदणी झाली आहे. सोळा तालुक्यातील १०८९ केंद्रांवर ही परीक्षा घेतली जाणार आहे.जिल्ह्याचे योजना शिक्षणाधिकारी किशोर पागोरे यांच्या अखत्यारित या परीक्षेचे नियोजन करण्यात आले आहे. नव भारत साक्षरता अभियानात शाळा हे एकक मानण्यात आले आहे. त्यामुळे ज्या शाळेतून उल्लास ॲपवर प्रौढ निरक्षराची नाव नोंदणी करण्यात आली होती, ती शाळाच त्यांच्यासाठी परीक्षा केंद्र राहणार आहे. या परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या प्रौढांना केंद्र सरकारतर्फे साक्षरतेचे प्रमाणपत्र आणि गुणपत्रकही दिले जाणार आहे.

ही परीक्षा सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजतापर्यंत घेतली जाणार आहे. निरक्षर व्यक्ती या दरम्यान त्याच्या सोयीच्या वेळेनुसार येऊन तीन तासांचा पेपर देऊ शकणार आहे. दिव्यांग व्यक्तींसाठी ३० मिनिटे जादा वेळ मिळणार आहे. उत्तरे लिहिण्यासाठी फक्त काळ्या किंवा निळ्या शाईचा पेन वापरावा लागणार आहे. 

कोणत्या तालुक्यात किती प्रौढ निरक्षर?आर्णी : ८४६बाभूळगाव : ४२६दारव्हा : ३८२६दिग्रस : ४६घाटंजी : ६०४कळंब : १७७४महागाव : ६२७मारेगाव : ६३९नेर : ६२०पांढरकवडा : ६८७पुसद : २८१राळेगाव : २०७उमरखेड : १३१९वणी : ८९५यवतमाळ : २५९१झरी : ४८३

अशी असेल प्रश्नपत्रिकाप्रश्नपत्रिका एकूण १५० गुणांची असून ती पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान याच्याशी संबंधित तीन भागांमध्ये विभागलेली असेल. भाग-क (वाचन) ५० गुण, भाग-ख (लेखन) ५० गुण, भाग-ग (संख्याज्ञान) ५० गुण अशी गुणविभागणी असेल. परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी प्रत्येक भागासाठी ३३ टक्के म्हणजे १७ गुण मिळविणे आवश्यक आहे. एकूण १५० गुणांपैकी ३३ टक्के म्हणजे ५१ गुण मिळविणे आवश्यक आहे.

सोळाही तालुक्यातील विविध शाळांवर एकंदर १५ हजार ८७१ निरक्षरांची नोंदणी करण्यात आली. तर जिल्ह्यातील ३२८ निरक्षरांनी स्वत: उल्लास ॲपवर नोंदणी केली आहे. परीक्षेचे साहित्य गटशिक्षणाधिकारी, मुख्याध्यापक यांच्या माध्यमातून केंद्रांवर पोहचविण्यात आले आहे. परीक्षेस येताना असाक्षर व्यक्तीने स्वतःचा फोटो, तसेच मतदान ओळखपत्र, आधारकार्ड, पॅनकार्ड, बँक पासबुक यापैकी कोणतेही एक ओळखपत्र आणावे.- किशोर पागोरे, शिक्षणाधिकारी (योजना), यवतमाळ

टॅग्स :Yavatmalयवतमाळ