शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
4
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
5
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
6
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
7
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
8
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
9
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
10
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
11
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
12
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
13
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
14
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
15
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
16
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
17
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
18
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
19
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
20
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

तिवसा येथे डायरियाचा उद्रेक

By admin | Updated: May 13, 2014 23:57 IST

यवतमाळ तालुक्यातील तिवसा येथे दूषित पाणी पिण्यात आल्याने डायरियाचा उद्रेक झाला आहे. जवळपास ५0 कुटुंबांमध्ये जुलाब व अतिसाराचे रुग्ण आहेत. सातत्याने रुग्णांची संख्या वाढत असल्याने ग्रामस्थांमध्ये

४0 कुटुंबात लागण : दूषित पाणीपुरवठय़ाचा परिणाम

सुरेंद्र राऊत - यवतमाळ

यवतमाळ तालुक्यातील तिवसा येथे दूषित पाणी पिण्यात आल्याने डायरियाचा उद्रेक झाला आहे. जवळपास ५0 कुटुंबांमध्ये जुलाब व अतिसाराचे रुग्ण आहेत. सातत्याने रुग्णांची संख्या वाढत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गावातील दहा पैकी केवळ एका स्रोताचे पाणी पिण्यायोग्य असल्याचे सर्वेक्षणात आढळून आले. मात्र उपाययोजना करण्यात आल्या नाही.

तिवसा या गावात तीन ठिकाणावरून पाणीपुरवठा केला जातो. नळ योजनेच्या दोन विहिरी आहेत. त्यापैकी एक विहीर नदीच्या काठावर असून या परिसरात प्रचंड हागणदारी पसरली आहे. दुसरी विहीर खासगी शेतात असून हाच एक शुद्ध पाण्याचा स्रोत आहे. मात्र पाण्याच्या टाकीखाली प्रचंड घाण साचली आहे. येथे वितरिकेचे वॉल असून घाण पाणी यामध्ये शिरते. बोअरवेलवर मोटार बसवून काही घरांना पाण्याची व्यवस्था केली आहे. मात्र बोअरवेलचा परिसरही घाणीनेच बरबटलेला आहे. सार्वजनिक नळाच्या आजूबाजूला उकिरडे साचले आहे. याकडे ग्रामपंचायत व स्थानिक नागरिकांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे येथे दिसून येते. गावातील ४0 ते ५0 घरांना नळ योजनेचे पाणीच मिळत नाही. लगतच्या शेतातील विहिरीवरून पाणी भरावे लागते.

या पाण्यामुळेच जीवन उद्धल पवार (१५), पुनम रमेश राठोड (१५), पियूष खटेश्‍वर मडावी (७), आकाश रोहिदास जाधव (५), तन्मय अरुण कुमरे (७), समीक्षा राजेश कुमरे (१0), वसंता कोडापे (४२), संतोष लक्ष्मण नैताम (२६), पांडुरंग तुकाराम घोडाम (६२), अभिजित गजानन चव्हाण (१८), सुरेश रामराव राठोड (२२), मंगेश आत्राम (२६), मिनाक्षी धवणे (१६), नीलेश चरण राठोड, प्रियंका रामराव राठोड, देवराव समक्या राठोड, छाया रामधन चव्हाण, विजय परसराम आडे आदींना जुलाब व अतिसाराचा त्रास सुरू झाला. काहींनी यवतमाळच्या खासगी रुग्णालयात तर काहींनी वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेतला. यातील अनेक जण आजही रुग्णालयात भरती आहे.

गेल्या अनेक वर्षापासून पाण्यासाठी कसरत सुरू आहे. महामार्गाच्या दुसर्‍या बाजूला असलेल्या विहिरीवरून पाणी आणावे लागते. वाहतूक सुरू असताना डोक्यावर गुंड घेऊन रस्ता ओलांडण्याची कसरत महिलांना करावी लागते. या भागात हातपंप असूनही केवळ किरकोळ दुरुस्तीसाठी अनेक वर्षांपासून बंद आहेत. याबाबत वारंवार तक्रारी करूनही कुणीच लक्ष देत नाही, असे वामन पेंदराम यांनी सांगितले. हातपंपाची ग्रामस्थांनीच वर्गणी करून दुरुस्ती करावी, असा सल्ला ग्रामपंचायतीकडून देण्यात येत आहे. शेतातील विहिरीचे पाणी पिण्यासाठी वापरत असल्याने ही लागण झाली आहे. या विहिरीत आजपर्यंत एकदाही ब्लिचिंग पावडर टाकले नाही.

गावातील दहा पाणी स्रोतापैकी नऊ स्रोत जोखीम स्तरावर असल्याचा अहवाल ३0 एप्रिल रोजी ग्रामपंचायतीला दिला, असे येथील मलेरिया कर्मचारी आर.सी.ढबाले यांनी सांगितले. पिवळे कार्ड दिल्यानंतरही कोणत्याच उपाययोजना झालेल्या नाही.बहुतांश पाण्याचे स्रोत घाणीने बरबटलेले दिसून आले.