शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

नेर पालिकेसाठी आज धुमशान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2018 21:14 IST

येथील नगराध्यक्ष व नगरसेवकांच्या १८ जागांसाठी रविवार, ९ डिसेंबरला मतदान होत आहे. नगराध्यक्षपदासाठी पाच, तर नगरसेवक पदांसाठी ९३ उमेदवारांमध्ये तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. नगरपरिषदेच्या नऊ प्रभागातून १८ उमेदवार निवडून दिले जाणार आहे.

ठळक मुद्दे९३ उमेदवार : १८ जागा, २९ बूथ, २० हजार मतदार

लोकमत न्यूज नेटवर्कनेर : येथील नगराध्यक्ष व नगरसेवकांच्या १८ जागांसाठी रविवार, ९ डिसेंबरला मतदान होत आहे. नगराध्यक्षपदासाठी पाच, तर नगरसेवक पदांसाठी ९३ उमेदवारांमध्ये तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.नगरपरिषदेच्या नऊ प्रभागातून १८ उमेदवार निवडून दिले जाणार आहे. त्यासाठी ९३ उमेदवार रिंगणात आहेत. ९ डिसेंबरला सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजतापर्यंत मतदान होणार आहे. त्यासाठी शहरात २९ मतदान केंद्र निर्माण करण्यात आले आहे. या केंद्रांवर दहा हजार ७३ पुरुष, तर दहा हजार ४० महिला मतदानाचा हक्क बजावणार आहे. त्यासाठी २९ मतदान यंत्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. या निवडणुकीत सर्वच पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.नगराध्यक्षपदासाठी पाच उमेदवार रिंगणात आहेत. शिवसेना, काँग्रेससह सर्वच पक्षांच्या उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. याशिवाय १८ नगरसेवक पदांसाठी रणसंग्राम होत आहे. सर्वच पक्षांना बंडखोरांनी ग्रासले आहे. दुखावलेले कार्यकर्ते आपल्याच पक्षाच्या उमेदवाराच्या पराभवासाठी प्रयत्न करत आहे. काँग्रेसच्या एका लोकप्रतिनिधीने तर चॅनलसमोर बंडखोरी व नाराजीचे उघड समर्थन केले. सर्वच पक्षांना अंतर्गत कलहाने ग्रासले आहे. त्यामुळे कोणताही पक्ष एकहाती सत्ता मिळवू शकणार नाही, अशी शक्यता जाणकार वर्तवित आहेत. मतदारही यामुळे संभ्रमात पडले आहे.या निवडणुकीत प्रथमच शिवसेना आणि भाजपाची युती तुटली आहे. दोन्ही पक्षांनी उमेदवार दिले आहे. भाजपाने शिवसेनेला टार्गेट करीत वैयक्तिक आरोपांचा सपाटा लावला होता. मात्र भाजपातील संजय देशमुख गट प्रचाराच्या बाहेर आहे. शिवसेनेतही बंडाळी झाली आहे. काँग्रेसलाही बंडखोरीची लागण झाली आहे. या सर्वच पक्षांचे नाराज कार्यकर्ते आपल्याच पक्षाच्या उमेदवाराला पराभूत करण्यासाठी पुढे सरसावले आहे.सहा केंद्र संवेदनशीलनिवडणुकीसाठी २९ केंद्रांवर प्रत्येकी पाच मतदान कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे. पोलिसांना चोख बंदोबस्त ठेवण्यात आदेश दिले आहे. याशिवाय निवडणूक शांततेत पार पडावी म्हणून अतिरिक्त पोलीस दल मागविण्यात आले आहे. निवडणूक निर्णय अधिकारी जयंत देशपांडे यांनी २९ पैकी सहा मतदान केंद्र संवेदनशील असल्याचे सांगितले. या केंद्रांवर जादा पोलीस बंदोबस्त ठेवणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ठाणेदार अनिल किनगे बंदोबस्तावर नजर ठेऊन आहे.

टॅग्स :Electionनिवडणूक