शहरं
Join us  
Trending Stories
1
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
2
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
4
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
5
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
6
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
7
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
8
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
9
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
10
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
11
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
12
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
13
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
14
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
15
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
16
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
17
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
18
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
19
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
20
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?

नेर पालिकेसाठी आज धुमशान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2018 21:14 IST

येथील नगराध्यक्ष व नगरसेवकांच्या १८ जागांसाठी रविवार, ९ डिसेंबरला मतदान होत आहे. नगराध्यक्षपदासाठी पाच, तर नगरसेवक पदांसाठी ९३ उमेदवारांमध्ये तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. नगरपरिषदेच्या नऊ प्रभागातून १८ उमेदवार निवडून दिले जाणार आहे.

ठळक मुद्दे९३ उमेदवार : १८ जागा, २९ बूथ, २० हजार मतदार

लोकमत न्यूज नेटवर्कनेर : येथील नगराध्यक्ष व नगरसेवकांच्या १८ जागांसाठी रविवार, ९ डिसेंबरला मतदान होत आहे. नगराध्यक्षपदासाठी पाच, तर नगरसेवक पदांसाठी ९३ उमेदवारांमध्ये तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.नगरपरिषदेच्या नऊ प्रभागातून १८ उमेदवार निवडून दिले जाणार आहे. त्यासाठी ९३ उमेदवार रिंगणात आहेत. ९ डिसेंबरला सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजतापर्यंत मतदान होणार आहे. त्यासाठी शहरात २९ मतदान केंद्र निर्माण करण्यात आले आहे. या केंद्रांवर दहा हजार ७३ पुरुष, तर दहा हजार ४० महिला मतदानाचा हक्क बजावणार आहे. त्यासाठी २९ मतदान यंत्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. या निवडणुकीत सर्वच पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.नगराध्यक्षपदासाठी पाच उमेदवार रिंगणात आहेत. शिवसेना, काँग्रेससह सर्वच पक्षांच्या उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. याशिवाय १८ नगरसेवक पदांसाठी रणसंग्राम होत आहे. सर्वच पक्षांना बंडखोरांनी ग्रासले आहे. दुखावलेले कार्यकर्ते आपल्याच पक्षाच्या उमेदवाराच्या पराभवासाठी प्रयत्न करत आहे. काँग्रेसच्या एका लोकप्रतिनिधीने तर चॅनलसमोर बंडखोरी व नाराजीचे उघड समर्थन केले. सर्वच पक्षांना अंतर्गत कलहाने ग्रासले आहे. त्यामुळे कोणताही पक्ष एकहाती सत्ता मिळवू शकणार नाही, अशी शक्यता जाणकार वर्तवित आहेत. मतदारही यामुळे संभ्रमात पडले आहे.या निवडणुकीत प्रथमच शिवसेना आणि भाजपाची युती तुटली आहे. दोन्ही पक्षांनी उमेदवार दिले आहे. भाजपाने शिवसेनेला टार्गेट करीत वैयक्तिक आरोपांचा सपाटा लावला होता. मात्र भाजपातील संजय देशमुख गट प्रचाराच्या बाहेर आहे. शिवसेनेतही बंडाळी झाली आहे. काँग्रेसलाही बंडखोरीची लागण झाली आहे. या सर्वच पक्षांचे नाराज कार्यकर्ते आपल्याच पक्षाच्या उमेदवाराला पराभूत करण्यासाठी पुढे सरसावले आहे.सहा केंद्र संवेदनशीलनिवडणुकीसाठी २९ केंद्रांवर प्रत्येकी पाच मतदान कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे. पोलिसांना चोख बंदोबस्त ठेवण्यात आदेश दिले आहे. याशिवाय निवडणूक शांततेत पार पडावी म्हणून अतिरिक्त पोलीस दल मागविण्यात आले आहे. निवडणूक निर्णय अधिकारी जयंत देशपांडे यांनी २९ पैकी सहा मतदान केंद्र संवेदनशील असल्याचे सांगितले. या केंद्रांवर जादा पोलीस बंदोबस्त ठेवणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ठाणेदार अनिल किनगे बंदोबस्तावर नजर ठेऊन आहे.

टॅग्स :Electionनिवडणूक