शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

नेर पालिकेसाठी आज धुमशान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2018 21:14 IST

येथील नगराध्यक्ष व नगरसेवकांच्या १८ जागांसाठी रविवार, ९ डिसेंबरला मतदान होत आहे. नगराध्यक्षपदासाठी पाच, तर नगरसेवक पदांसाठी ९३ उमेदवारांमध्ये तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. नगरपरिषदेच्या नऊ प्रभागातून १८ उमेदवार निवडून दिले जाणार आहे.

ठळक मुद्दे९३ उमेदवार : १८ जागा, २९ बूथ, २० हजार मतदार

लोकमत न्यूज नेटवर्कनेर : येथील नगराध्यक्ष व नगरसेवकांच्या १८ जागांसाठी रविवार, ९ डिसेंबरला मतदान होत आहे. नगराध्यक्षपदासाठी पाच, तर नगरसेवक पदांसाठी ९३ उमेदवारांमध्ये तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.नगरपरिषदेच्या नऊ प्रभागातून १८ उमेदवार निवडून दिले जाणार आहे. त्यासाठी ९३ उमेदवार रिंगणात आहेत. ९ डिसेंबरला सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजतापर्यंत मतदान होणार आहे. त्यासाठी शहरात २९ मतदान केंद्र निर्माण करण्यात आले आहे. या केंद्रांवर दहा हजार ७३ पुरुष, तर दहा हजार ४० महिला मतदानाचा हक्क बजावणार आहे. त्यासाठी २९ मतदान यंत्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. या निवडणुकीत सर्वच पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.नगराध्यक्षपदासाठी पाच उमेदवार रिंगणात आहेत. शिवसेना, काँग्रेससह सर्वच पक्षांच्या उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. याशिवाय १८ नगरसेवक पदांसाठी रणसंग्राम होत आहे. सर्वच पक्षांना बंडखोरांनी ग्रासले आहे. दुखावलेले कार्यकर्ते आपल्याच पक्षाच्या उमेदवाराच्या पराभवासाठी प्रयत्न करत आहे. काँग्रेसच्या एका लोकप्रतिनिधीने तर चॅनलसमोर बंडखोरी व नाराजीचे उघड समर्थन केले. सर्वच पक्षांना अंतर्गत कलहाने ग्रासले आहे. त्यामुळे कोणताही पक्ष एकहाती सत्ता मिळवू शकणार नाही, अशी शक्यता जाणकार वर्तवित आहेत. मतदारही यामुळे संभ्रमात पडले आहे.या निवडणुकीत प्रथमच शिवसेना आणि भाजपाची युती तुटली आहे. दोन्ही पक्षांनी उमेदवार दिले आहे. भाजपाने शिवसेनेला टार्गेट करीत वैयक्तिक आरोपांचा सपाटा लावला होता. मात्र भाजपातील संजय देशमुख गट प्रचाराच्या बाहेर आहे. शिवसेनेतही बंडाळी झाली आहे. काँग्रेसलाही बंडखोरीची लागण झाली आहे. या सर्वच पक्षांचे नाराज कार्यकर्ते आपल्याच पक्षाच्या उमेदवाराला पराभूत करण्यासाठी पुढे सरसावले आहे.सहा केंद्र संवेदनशीलनिवडणुकीसाठी २९ केंद्रांवर प्रत्येकी पाच मतदान कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे. पोलिसांना चोख बंदोबस्त ठेवण्यात आदेश दिले आहे. याशिवाय निवडणूक शांततेत पार पडावी म्हणून अतिरिक्त पोलीस दल मागविण्यात आले आहे. निवडणूक निर्णय अधिकारी जयंत देशपांडे यांनी २९ पैकी सहा मतदान केंद्र संवेदनशील असल्याचे सांगितले. या केंद्रांवर जादा पोलीस बंदोबस्त ठेवणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ठाणेदार अनिल किनगे बंदोबस्तावर नजर ठेऊन आहे.

टॅग्स :Electionनिवडणूक