शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
3
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
4
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
5
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
6
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
7
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
8
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
9
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
10
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
11
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
12
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
13
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
14
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
15
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
16
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
17
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
18
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
19
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
20
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा

दिग्रस वीज वितरणचा कारभार चव्हाट्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2019 22:12 IST

येथील वीज वितरण कंपनीचा भोंगळ कारभार दिवसेंदिवस चव्हाट्यावर येत आहे. दिवसाशिवाय ऐन मध्यरात्री वीज पुरवठा खंडित होत असल्याने ग्राहक वैतागले आहे. अधिकाऱ्यांचा वचक नसल्याने कर्मचारी सैरभैर झाले आहे.

ठळक मुद्देरोहित्र उघडे : कर्मचाऱ्यांच्या निष्क्रियेतचा ग्राहकांना फटका

लोकमत न्यूज नेटवर्कदिग्रस : येथील वीज वितरण कंपनीचा भोंगळ कारभार दिवसेंदिवस चव्हाट्यावर येत आहे. दिवसाशिवाय ऐन मध्यरात्री वीज पुरवठा खंडित होत असल्याने ग्राहक वैतागले आहे. अधिकाऱ्यांचा वचक नसल्याने कर्मचारी सैरभैर झाले आहे.शहरातील गवळीपुरा येथील विद्युत रोहित्रामध्ये सोमवारी रात्री अचानक स्पार्किंग झाली. यात रोहीत्र जळून खाक झाले. उन्हाळ्यात रोहीत्र जळण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहे. मात्र वीज वितरण कंपनी याकडे लक्ष देत नाही. कोणतीही दक्षता घेतली जात नाही. अपघात घडण्यापूर्वीच दुरुस्ती केली जात नाही. त्यामुळे शहरासह तालुक्यात रोहीत्र जळण्याचे प्रकार सुरूच आहे.यानंतर गुरुवारी मध्यरात्री २ वाजतानंतर दिनबाई शाळेसमोरील मेन सर्व्हिस लाईनची तार अचानक तुटली. यामुळे शहराच्या काही भागातील वीज पुरवठा खंडित झाला. ही बाब एका नागरिकाच्या निदर्शनास येतात, त्यांनी महावितरणच्या अभियंत्याला माहिती दिली. मात्र त्या अभियंत्याचे मोबाईल उचलण्यास कर्मचाऱ्यांना सवड नव्हती. अखेर अभियंता पटेल व त्या नागरिकाने स्वत: इतर नागरिकांच्या सहकार्याने तुटलेल्या तारा जोडण्यासाठी प्रयत्न सुरू केले. तोपर्यंत पोलिसांनीही घटनास्थळ गाठले होते.वीज वितरणचे बहुतांश अधिकारी बाहेर गावी राहातात. त्यांच्या हाताखालील कर्मचारी आणि कंत्राटदार स्थानिकचे रहिवासी आहे. हे कर्मचारी व कंत्राटदार अधिकाऱ्यांच्या आदेशाला जुमानत नाही. उलट अधिकाऱ्यांवर राजकीय दबाव निर्माण केला जातो, अशी चर्चा आहे. वीज केंद्रातील रात्रपाळीचे कर्मचारी जाणीवपूर्वक वीज पुरवठा बंद करून जनतेला त्रास व्हावा व जनतेत अधिकाऱ्यांविरूद्ध रोष निर्माण व्हावा म्हणून अशी कृत्ये करीत असल्याचा आरोपही आता होत आहे. त्यासाठी जाणीवपूर्वक मोबाईल स्विच आॅफ करून ठेवले जातात. यामुळे नागरिकांमध्ये रोष निर्माण होऊन अधिकाऱ्यांना परिस्थितीला सामोरे जावे लागते. वीज वितरणच्या कर्मचाऱ्यांनी आता ग्राहकांच्या संयमाचा अंत पाहू नये, अशी अपेक्षा नागकि व्यक्त करीत आहे.कर्मचारी, कंत्राटदारांची टगेगिरी वाढलीवीज वितरणचे कर्मचारी, कंत्राटदार अधिकाऱ्यांना जुमानत नाही. स्थानिक कर्मचारी, कंत्राटदार, कामगार यांच्या टगेगिरीमुळे अधिकारी हतबल झाल्याची माहिती आहे. अधिकाऱ्यांविरूद्ध जाणीवपूर्वक रोष वाढवून कंत्राटदार आपली पोळी शेकून घेण्याचा प्रयत्न करीत असल्याची चर्चा आहे. अधिकारी व कर्मचारी आणि कंत्राटदारांमधील या शीतयुद्धाचा परिणाम मात्र जनतेला सोसावा लागतो. त्यांना नाहक दिवसा उकाड्यात, तर रात्री अंधारात राहावे लागत आहे. वीज वितरणच्या अधिकारी, कर्मचारी व कंत्राटदारांनी समन्वय ठेवून ग्राहकांवरील अन्याय दूर करावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संतप्त ग्राहकांनी दिला आहे.