शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
2
पतीने 'ती' गोष्ट लपवली; पत्नीला कळताच सरळ पोलीस स्टेशनला गेली! तक्रार करत म्हणाली... 
3
६००० कर्मचाऱ्यांना काढूनही 'या' कंपनीचं मन भरलं नाही, आता पुन्हा एकदा कपातीची टांगती तलवार
4
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
5
"मला विश्वास बसत नाहीये...", शेफाली जरीवालाच्या निधनाने श्रेयस तळपदेला बसला मोठा धक्का
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
8
Ashadhi Ekadashi 2025: तुकाराम महाराजांना बाप्पाच्या मूर्तीत दिसले पांडुरंगाचे रूप; तेव्हा...
9
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
10
रिक्षाचालकाने शेअर केला असा व्हिडीओ, थेट अमेरिकेतून भारतात पोलिसांकडे आली तक्रार, त्यानंतर...  
11
ENG W vs IND W : स्मृती मानधना सगळ्यात भारी! जाणून घ्या भारत-इंग्लंड यांच्यातील खास रेकॉर्ड
12
कोल्हापुरी चप्पलेतून कर्रकर्र आवाज का येतो, तुम्हाला माहितेय का? ९९ टक्के लोक फेल!
13
९४ वर्षीय अब्जाधीश वॉरेन बफेंचा मोठा निर्णय, दान केले ६ बिलियन डॉलर्सचे शेअर्स
14
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
15
शेतीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष, पुतण्यानं माय-लेकाची केली हत्या; आरोपीनेही आयुष्य संपवलं
16
"ठेच लागल्यावर 'आई गं' म्हणायचं की 'ओ मेरी माँ'...", पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीला केदार शिंदेंचा तीव्र विरोध
17
डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळेल का, काय वाटतं? यापूर्वी कोणत्या राष्ट्राध्यक्षांना मिळाले नोबेल?
18
मुंबई: मृत मुलाच्या वीर्यासाठी आईची धडपड, सेंटरने वीर्य देण्यास नकार दिल्यानंतर न्यायालयात धाव
19
SL vs BAN : मॅचसह मालिका गमावली अन् लगेच कॅप्टन्सी सोडली! पहिल्या टेस्टमध्ये बेस्ट खेळीसह रचला होता इतिहास
20
भांडूपमधील जादूटोणा प्रकरण: अटकेनंतर पोलीस ठाण्यातच दाम्पत्याकडून मंत्रोच्चार, वैभव आणि हर्षदाला पोलिसांनी घडवली अद्दल

बाराशे गावांचा विकास आराखडा

By admin | Updated: January 11, 2015 22:58 IST

जिल्हा परिषद यवतमाळ अंतर्गत ग्रामविकास सप्ताह जिल्ह्यातील संपूर्ण १२०८ ग्रामपंचायतींमध्ये राबविण्यात येणार आहे. या ग्रामविकास सप्ताहामध्ये गावाचा संपूर्ण विकास आराखडा ग्रामस्थांच्या

ग्रामसभेला सीईओंची हजेरी : लोकसहभागातून विकास साधण्याची संकल्पना यवतमाळ : जिल्हा परिषद यवतमाळ अंतर्गत ग्रामविकास सप्ताह जिल्ह्यातील संपूर्ण १२०८ ग्रामपंचायतींमध्ये राबविण्यात येणार आहे. या ग्रामविकास सप्ताहामध्ये गावाचा संपूर्ण विकास आराखडा ग्रामस्थांच्या सहभागातून तयार करण्यात येणार आहे व त्या आराखड्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारीसुद्धा गावातील लोकांना देण्यात येणार आहे. ग्रामपंचायतींच्या आराखड्यातून पंचायत समितीचा आराखडा व सर्व १६ पंचायत समित्यांचा मिळून जिल्ह्याचा एक विकास आराखडा तयार करण्यात येणार आहे. त्या सप्ताहाचा पथदर्शी प्रकल्प (पायलट प्रोजेक्ट) बाभूळगाव तालुक्यातील १८ ग्रामपंचायतींमध्ये ३ ते ९ जानेवारी १५ दरम्यान गृहभेटी, सामाजिक नकाशा, शिवार फेरी, संस्था भेटी या माध्यमातून राबविण्यात आला. गिमोणा या ग्रामपंचायतीमध्ये तयार झालेल्या आराखड्याला मंजुरी घेण्यासाठी ग्रामसभेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी हे स्वत: ९ जानेवारी रोजी रात्री ९ वाजता उपस्थित झाले. बाभूळगाव तालुक्यातील गिमोणा ग्रामपंचायतीमध्ये ३१२ कुटुंब असून गावाची लोकसंख्या १३५० आहे. शेती व शेतमजुरी हा गावचा मुख्य व्यवसाय आहे. गावातील १४३ कुटुंबाकडे वैयक्तिक शौचालय आहे. गावात एकूण २००० वृक्षलागवडीनंतर १६५१ वृक्ष जिवंत आहे. गावाची डिसेंबर १४ अखेर गृहकर वसुली ३६ टक्के तर पाणीकर वसुली २७ टक्के झाली आहे. गिमोणा ही ग्रामपंचायत अंतरगाव (जुने), अंतरगाव व गिमोणा या तीन गावांमध्ये वसलेले आहे. या ग्रामपंचायतींमध्ये ग्रामविकास सप्ताहाचे आयोजन करण्यात येऊन विकास आराखडा तयार करण्यात आला. आराखड्यामध्ये प्रामुख्याने पाणी पुरवठ्याची योजना, गावातील अंतर्गत रस्ते, विजेचे पोल, समाज मंदिर, स्मशानभूमी सौंदर्यीकरण, व्यायामशाळा, शाखा खोली बांधकाम, पूरसंरक्षक बांध व भिंत इत्यादी मुद्दे विकास आराखड्यातून पुढे आले. त्याला ग्रामसभेने मंजुरी दिली. ग्रामसभेमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी शिक्षण, आरोग्य, पोषण, स्वच्छता, घरकूल, शौचालय, बचत गट आदी बाबींवर ग्रामस्थांशी प्रश्न उत्तरांच्या माध्यमातून चर्चा केली. यातून ग्रामस्थांच्या अनेक समस्यांचे निराकरण करण्यात आले. सभेत ग्रामस्थांनी पांदण रस्ता, सांडपाणी व्यवस्थापन, स्मशानभूमी, व्यायामशाळा साहित्य इत्यादीची मागणी केली. ग्रामसभेनंतर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना ग्रामपंचायतीमध्येच मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी सकाळी ६.३० वाजता तीन किलोमीटर अंतरावरील अंतरगाव या गट गावाची पाहणी करण्याकरिता सीईओ पायीच गेले. गावात फिरून घरकूल बांधकाम, रस्ते, नाला, शौचालय बांधकाम, समाज मंदिर, गुरूदेव सेवा भवन आदीची प्रत्यक्ष पाहणी केली व ग्रामस्थांची सभा घेवून त्यांच्याही समस्या जाणून घेतल्या. (प्रतिनिधी)