शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
3
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
4
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
5
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
6
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
7
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
8
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
9
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
10
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
11
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
12
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
13
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
14
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
15
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
16
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
17
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
18
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
19
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
20
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

हद्दवाढ क्षेत्रातील विकास आराखडा सदोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 22:42 IST

शहराच्या हद्दवाढीनंतर नगरपरिषदेत नव्याने समाविष्ट भागाचा विकास आराखडा तयार करण्यात आला.

ठळक मुद्देनगरसेवकांचा बैठकीत आक्षेप : सत्ताधाऱ्यांना झुकते माप, वडगाव-लोहाराला दुय्यम दर्जा

यवतमाळ : शहराच्या हद्दवाढीनंतर नगरपरिषदेत नव्याने समाविष्ट भागाचा विकास आराखडा तयार करण्यात आला. यात अनेक चुका असून त्यावर वाढीव क्षेत्रातील नगरसेवकांनी सोमवारी आयोजित बैठकीत आक्षेप नोंदविला. आराखड्यात सत्ताधाºयांच्या परिसरातील विकास कामांवर भर दिला गेला, तर वडगाव, लोहारा सारख्या ग्रामपंचायतींना दुय्यम स्थान दिल्याचा आरोप नगरसेवकांनी केला.नगरपरिषद क्षेत्रात भोसा, उमरसरा, लोहारा, वडगाव, वाघापूर, पिंपळगाव, मोहा या सात ग्रामपंचायतींचा समावेश करण्यात आला. त्याला दोन वर्षे लोटली. मात्र, तेथील विकास आराखडा नसल्याने नगरपरिषदेकडून कोणतेच काम करण्यात आले नाही. आता तब्बल दोन वर्षानंतर विकास आराखडा तयार झाला असून ज्या संस्थेला हे काम सोपविले होते, त्या संस्थेकडून अनेक चुका करण्यात आल्या आहे. काही ठराविक भागात अनाठायी कामे प्रस्तावित केली आहे. यावर भाजप व विरोधी बाकावरील नगरसेवकांनी आक्षेप घेतला.सर्वेक्षणाचे काम करताना स्थानिक नगरसेवकांना विश्वासात घ्यायला हवे होते, अशी अपेक्षा शिवसेना, काँग्रेस, राष्टÑवादीच्या नगरसेवकांनी व्यक्त केली. विकास आराखड्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ढेरे यांनी नगरसेवकांना निमंत्रित केले होते. त्यावेळी विकास आराखडा करणाºया संस्थेकडून प्रेझेंटेशन करण्यात आले. मात्र प्रत्यक्ष सर्वेक्षणाच्यावेळी नगरसेवकांनी सांगितलेले रस्ते, खुले भूखंड, पाण्याचे स्त्रोत याची नोंद आराखड्यात नाही यामुळे पुन्हा सर्वेक्षण करुन नगरसेवकांच्या उपस्थितीत नोंदी घ्यावा, अशी मागणी काँग्रेस, राष्ट्रवादीकडून करण्यात आली.या बैठकीला नगराध्यक्ष कांचन चौधरी यांच्यासह विषय समित्यांचे सभापती, नगरसेवक उपस्थित होते. बैठकीत बरीच गरमागरमी झाली.मुख्याधिकाऱ्यांच्या मुजोरीने सारेच संतप्तविकास आराखड्यावर चर्चा करण्यासाठी सीओंनी नगरसेवकांना निमंत्रित केले. मात्र, मुख्याधिकारीच तब्बल दीड तास उशिराने सभागृहात पोहोचले. याबाबत विचारणा केली असता त्यांनी टोलवाटोलवी करून दिलगिरी व्यक्त करणे टाळले. नंतर काही मिनिटातच मुख्याधिकाऱ्यांनी काम असल्याचे सांगून सभागृहातून काढता पाय घेतला. यावरून मुख्याधिकाऱ्यांची शिरजोरी कायम असल्याचे दिसून येते.मुख्याधिकाऱ्यांची नगरपरिषदेत हुकूमशाही सुरू आहे. त्यांनी विकास आराखडासंदर्भात बैठक बोलावून स्वत: उशिरा आले व निघून गेले. या बैठकीत काहींनी राजकारण आणले. केवळ सूचना करण्यासाठीच ही बैठक होती. तशा सुधारणाही होणार आहे.- विजय खडसेगटनेते भाजपा, नगरपरिषदविकास आराखडा यवतमाळचा नसून केवळ भोसापुरता मर्यादित आहे. यातून दुजाभाव केल्याचे स्पष्ट होते. उर्वरित भाग पालिकेअंतर्गत येत नाही का, असा प्रश्न आहे. पुन्हा सर्वेक्षण करावे.- अनिल देशमुखनगरसेवक, काँग्रेस