शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

ओबीसी घटकांचा विकास म्हणजे देशाचा विकास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:46 IST

फोटो दारव्हा : भारतावर प्रेम असेल, तर ओबीसींसाठी तुम्ही असाल त्या क्षेत्रात जागृतीचे काम करा. कारण भारतातील प्रत्येक दोन ...

फोटो

दारव्हा : भारतावर प्रेम असेल, तर ओबीसींसाठी तुम्ही असाल त्या क्षेत्रात जागृतीचे काम करा. कारण भारतातील प्रत्येक दोन माणसातला एक जण ओबीसी आहे. त्याला वगळून भारताचा विकास शक्य नाही. त्यामुळे ओबीसींची जनगणना झालीच पाहिजे, असे मत ज्येष्ठ विचावंत तथा साहित्यिक प्रा. हरि नरके यांनी व्यक्त केले.

दारव्हा येथे समता परिषदेच्या वतीने आयोजित प्रबोधन शिबिरात ते बोलत होते. ते म्हणाले, ओबीसींना हक्क मिळण्यासाठी जनगणना आवश्यक आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल राज्यघटनेच्या कलम १४२ खाली दिलेला असल्याने तो सर्व देशाला लागू झाला आहे. त्यानुसार सर्व देशांतील ओबीसी राजकीय आरक्षण रद्द झाले आहे. (निकालपत्र, परि.२६ व भारतीय संविधान, कलम १४२) ही वस्तुस्थिती दडवून निकालाबाबत वारंवार खोटे बोलून जनतेची दिशाभूल केली जात आहे. फक्त महाराष्ट्रातले आरक्षण गेले असून, बाकी सर्व राज्यांतील आरक्षण कायम असल्याचे ते सांगतात. हे धादांत खोटे आहे असून, देवेंद्र फडणवीस आणि भाजपमुळे ओबीसी आरक्षण संपले आहे, असे सरकारी पत्राचा दाखला देत त्यांनी सांगितले.

कार्यकर्ता प्रबोधन शिबिराच्या अध्यक्षस्थानी समता परिषदेचे प्रदेश कार्याध्यक्ष बापूसाहेब भुजबळ होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रदेश सरचिटणीस रवी सोनवणे, विदर्भ विभागीय अध्यक्ष प्रा. अरविंद गाभणे, गजानन इंगळे, दत्ता खरात, संजय ठाकरे, डॉ. वसंत उमाळे, ॲड. राजेश चौधरी, रवी तरटे उपस्थित होते. प्रास्ताविक आत्माराम जाधव, संचालन गणेश राऊत, तर आभार राजेंद्र घाटे यांनी मानले. विनोद इंगळे, उत्तम गुल्हाने, प्रा. कल्पना लंगडे, भाविक ठक, गणेश जवके, अमोल दुर्गे, पंकज शेंदूरकर, प्रमोद राऊत, मनोज नाल्हे, विनोद शेंदूरकर आदींनी परिश्रम घेतले.

बॉक्स

आरक्षणाची भिक नको, हक्क हवा

ज्येष्ठ संपादक तथा साहित्यिक उत्तम कांबळे यांनी इतिहासातील दाखले देत बहुजनांची परिस्थिती समजून सांगताना जातीनिहाय जनगणना आवश्यक असल्याचे सांगितले. त्यांनी विविध दाखले देत ओबीसींची वर्षानुवर्षांपासून कशी पिळवणूक होत आहे, हे निदर्शनास आणून दिले. सर्वांना सामाजिक न्याय मिळाला पाहिजे, अशी आग्रही भूमिका त्यांनी मांडली.