शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
2
“काँग्रेसचे पाक प्रेम उतू चाललेय, ऑपरेशन सिंदूरचा हिशोब विचारणारे देशद्रोही”: एकनाथ शिंदे
3
ढाका येथील भारतीय उच्चायुक्तालयाला धमकी, सरकारने बांगलादेशी अधिकाऱ्याला समन्स बजावले
4
भारतीय बाजारात उद्याच स्वस्तातली सात सीटर कार लाँच होणार; अर्टिगा, ट्रायबरला मिळणार टक्कर...
5
स्वस्त 'पर्सनल लोन'च्या शोधात आहात? 'या' ५ बँकांमध्ये मिळतोय सर्वात कमी व्याजदर; १२ लाखांचा EMI किती?
6
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
7
खुशखबर! थिएटरनंतर आता OTTवर दाखल होतोय 'धुरंधर', जाणून घ्या कुठे आणि कधी पाहता येणार?
8
PM मोदी जॉर्डन-ओमान दौऱ्यावर, तर जयशंकर इजराइलमध्ये; भारताचा जगाला स्पष्ट संदेश..!
9
मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बुरखा हटवल्याने महिला डॉक्टर धक्क्यात; सरकारी नोकरी नाकारून सोडले राज्य
10
काव्या मारननं पारखलं सोनं! अनसोल्ड खेळाडूवर लावली बोली, त्यानं ४८ चेंडूत कुटल्या ७६ धावा
11
Post Office ची जबरदस्त स्कीम... घरबसल्या दर महिन्याला होईल २० हजार रुपयांची कमाई, कोणती आहे योजना, पाहा डिटेल्स
12
बुकिंग सुरू होताच 'या' कारवर तुटून पडले लोक, 24 तासांत 70000 यूनिट बूक; खिशात हवेत फक्त ₹21000
13
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दागिने घेताना १०० वेळा विचार करावा लागणार; चांदी २ लाखांच्या पार, सोन्याच्या दरातही मोठी तेजी
14
राजकीय सूडबुद्धीतून रचलेले प्रकरण, ईडी-सीबीआयचा गैरवापर; 'नॅशनल हेराल्ड'वरुन खरगेंची मोदी-शाहांवर टीका
15
...अन् त्यावेळी राष्ट्रपती बनण्याचा प्रस्ताव वाजपेयींनी नाकारला; 'अटल संस्मरण' पुस्तकात दावा
16
“मातोश्रीबाबत मनात आदर कायम, पण...”; शिंदे गटात प्रवेश करताच बड्या नेत्याने सगळेच सांगितले
17
Video - हार्ट अटॅकमुळे वेदनेने तडफडत होता पती; पत्नीने जोडले हात, पण कोणीच केली नाही मदत
18
शेतकऱ्यांसाठी मोठा अलर्ट! फार्मर आयडीशिवाय पीएम किसानचे पैसे येणार नाहीत; अशी तयार करा ID
19
‘मी काही चुकीचं बोललो नाही, माफी मागण्याचा प्रश्नच नाही..’, पृथ्वीराज चव्हाण ऑपरेशन सिंदूरबाबतच्या वक्तव्यावर ठाम  
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायतीविना गावांचा विकास गोलमाल

By admin | Updated: February 9, 2015 23:20 IST

राज्याच्या निर्मितीनंतरही जिल्ह्यातील अनेक गावांना अद्यापही ग्रामपंचायतीचा दर्जाच मिळाला नाही. दुर्दैवाची बाब म्हणजे अशा ग्रामपंचायतींची संख्या जिल्हा मुख्यालयी असलेल्या यवतमाळ

यवतमाळ : राज्याच्या निर्मितीनंतरही जिल्ह्यातील अनेक गावांना अद्यापही ग्रामपंचायतीचा दर्जाच मिळाला नाही. दुर्दैवाची बाब म्हणजे अशा ग्रामपंचायतींची संख्या जिल्हा मुख्यालयी असलेल्या यवतमाळ तालुक्यात सर्वाधिक आहे. त्यानंतर झरीजामणी, मारेगाव या मागास तालुक्यांचा क्रमांक लागतो. विकासाच्या नावाने राजकारण करणाऱ्या मंत्र्यांना व दक्ष असल्याचे शेखी लावणाऱ्या अधिकाऱ्यांना ही अडचण कधीच सोडवाविशी वाटली नाही. यामुळेच आज ग्रामपंचायत नसलेल्या या गावांची पुरती वाट लागलेली आहे. यवतमाळ तालुक्यातील नारकुंड, दिघोरी, उमरठा, भोयर या गावांमध्येच ग्रामपंचायती स्थापन झाली नाही. येथील कामकाज केवळ प्रशासकाच्या भरवशावर सुरू आहे. स्वतंत्र राज्य अस्तित्वात आले. त्यानंतरही या गावांमधील सत्ता विकेंद्रीकरण आणि घटना दुरुस्तीने अस्तित्वात आलेला पंचायतराज पोहोचलेच नाही. या गावांना हक्काची ग्रामसभा मिळालीच नाही. त्यामुळे तेथील स्थितीही अतिशय बिकट आहे. टप्प्या टप्प्याने मिळालेला विकास त्यांना अजूनही मुख्य प्रवाहात आणू शकला नाही. बाभूळगाव तालुक्यातील कोठा (फत्तेपूर), कोल्ही, दिघी, भटमार्ग या पुनर्वसित गावांची स्थिती आहे. मारेगाव तालुक्यातील इंदिरा ग्राम, उमरखेडमधील नागापूर (रूपाळा), आर्णी तालुक्यातील सुभाषनगर (बारभाई) या नव्याने अस्तित्वात आलेल्या गावांनासुद्धा ग्रामपंचायतीचा दर्जा मिळाला नाही. (कार्यालय प्रतिनिधी)