शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

सिंचनामुळेच शेतकऱ्यांचा विकास शक्य

By admin | Updated: May 18, 2017 00:53 IST

सिंचनामुळे शेतकऱ्यांचा विकास शक्य असल्याचे प्रतिपादन केंद्रीय मंत्री हंसराज अहीर यांनी केले.

हंसराज अहीर : दाभडी येथे विविध विकास कामांचा शुभारंभ लोकमत न्यूज नेटवर्क आर्णी : सिंचनामुळे शेतकऱ्यांचा विकास शक्य असल्याचे प्रतिपादन केंद्रीय मंत्री हंसराज अहीर यांनी केले. तालुक्यातील दाभडी गावातील विविध विकास कामाचे भूमीपूजन बुधवारी हंसराज अहीर यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी आयोजित कार्यक्रमात ते ग्रामस्थांना संबोधित करीत होते. दाभडी गावात प्रतप्रधान येवून गेल्याने या गावाला विषेश महत्व आले आहे. दाभडी गावाचाच नव्हे तर संपूर्ण यवतमाळ जिल्ह्याचा विकास हा झपाट्याने होत आहे. यात सिंचनाची भूमिका महत्वाची आहे. त्यासाठी अरुणावती प्रकल्पाअंतर्गत लघु पाटसऱ्यांच्या दुरुस्तीचे काम हाती घेतल्याचे हंसराज अहीर म्हणाले. यावेळी त्यांनी शासनाच्या विविध योजना व कामांची माहिती दिली. दाभडीमध्ये कोट्यवधी रुपयांचे काम मुख्यमंत्र्यांनी मंजूर केले आहे. यामध्ये पाणीपुरवठा योजना, रोड, पूल, पाटसऱ्यांची कामे, आवास योजना आदींचा समावेश आहे २०२२ पर्यंत कुणालाही बेरोजगार ठेवणार नसल्याची ग्वाही अहीर यांनी दिली. तत्पूर्वी पालकमंत्री मदन येरावार व आमदार राजू तोडसाम यांनीही उपस्थित लोकांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य प्रकाश राठोड, उपसभापती पपिता भाकरे, भाजपाचे तालुका अध्यक्ष विपीन राठोड, बाजार समितीचे उपसभापती नुनेश्वर आडे, दाभडीच्या सरपंच अनिता पवार, उपसरपंच मिलींद बागेश्वर आदींसह अनेकांची उपस्थिती होती. तहसिलदार सुधीर पवार गटविकास अधिकारी चव्हाण, उपअभियंता भेंडे, जीवन आडे आदींची उपस्थिती होती.