शहरं
Join us  
Trending Stories
1
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
2
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
3
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
4
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
5
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
6
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
7
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
8
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
9
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
10
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
11
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
12
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
13
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
14
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
15
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
16
शिंदेसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गोविंदासह 'या' ४० नेत्यांकडे प्रचाराची धुरा!
17
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
18
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
19
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
20
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
Daily Top 2Weekly Top 5

सिंचनामुळेच शेतकऱ्यांचा विकास शक्य

By admin | Updated: May 18, 2017 00:53 IST

सिंचनामुळे शेतकऱ्यांचा विकास शक्य असल्याचे प्रतिपादन केंद्रीय मंत्री हंसराज अहीर यांनी केले.

हंसराज अहीर : दाभडी येथे विविध विकास कामांचा शुभारंभ लोकमत न्यूज नेटवर्क आर्णी : सिंचनामुळे शेतकऱ्यांचा विकास शक्य असल्याचे प्रतिपादन केंद्रीय मंत्री हंसराज अहीर यांनी केले. तालुक्यातील दाभडी गावातील विविध विकास कामाचे भूमीपूजन बुधवारी हंसराज अहीर यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी आयोजित कार्यक्रमात ते ग्रामस्थांना संबोधित करीत होते. दाभडी गावात प्रतप्रधान येवून गेल्याने या गावाला विषेश महत्व आले आहे. दाभडी गावाचाच नव्हे तर संपूर्ण यवतमाळ जिल्ह्याचा विकास हा झपाट्याने होत आहे. यात सिंचनाची भूमिका महत्वाची आहे. त्यासाठी अरुणावती प्रकल्पाअंतर्गत लघु पाटसऱ्यांच्या दुरुस्तीचे काम हाती घेतल्याचे हंसराज अहीर म्हणाले. यावेळी त्यांनी शासनाच्या विविध योजना व कामांची माहिती दिली. दाभडीमध्ये कोट्यवधी रुपयांचे काम मुख्यमंत्र्यांनी मंजूर केले आहे. यामध्ये पाणीपुरवठा योजना, रोड, पूल, पाटसऱ्यांची कामे, आवास योजना आदींचा समावेश आहे २०२२ पर्यंत कुणालाही बेरोजगार ठेवणार नसल्याची ग्वाही अहीर यांनी दिली. तत्पूर्वी पालकमंत्री मदन येरावार व आमदार राजू तोडसाम यांनीही उपस्थित लोकांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य प्रकाश राठोड, उपसभापती पपिता भाकरे, भाजपाचे तालुका अध्यक्ष विपीन राठोड, बाजार समितीचे उपसभापती नुनेश्वर आडे, दाभडीच्या सरपंच अनिता पवार, उपसरपंच मिलींद बागेश्वर आदींसह अनेकांची उपस्थिती होती. तहसिलदार सुधीर पवार गटविकास अधिकारी चव्हाण, उपअभियंता भेंडे, जीवन आडे आदींची उपस्थिती होती.