शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
3
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
4
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
5
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून विहिरीत फेकलं
6
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
7
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
8
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
9
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
10
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
11
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
12
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
13
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
14
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
15
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
16
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
17
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
18
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
19
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
20
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!

राजकीय अस्थिरतेतही साधला विकास

By admin | Updated: September 28, 2016 00:41 IST

वारंवार तक्रारी, सत्ताधाऱ्यांचा विरोध, दिला जाणारा त्रास अशा कात्रीत आणि राजकीय अस्थिरतेतही केवळ पाच संचालकांच्या भरवशावर समतोल राखत संस्थेचा विकास साधला.

अभिषेक ठाकरे : घाटंजी बाजार समितीची सभा, शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय झालेघाटंजी : वारंवार तक्रारी, सत्ताधाऱ्यांचा विरोध, दिला जाणारा त्रास अशा कात्रीत आणि राजकीय अस्थिरतेतही केवळ पाच संचालकांच्या भरवशावर समतोल राखत संस्थेचा विकास साधला. पाच वर्षांच्या कार्यकाळात बाजार समितीने विकासाचे अनेक टप्पे गाठले, असे सभापती अभिषेक ठाकरे यांनी आमसभेत सांगितले. यावेळी त्यांनी बाजार समितीच्या विकासाचा लेखाजोखा मांडला. यावेळी मंचावर बल्लू पाटील लोणकर, जितेंद्र मोघे, शंकरराव ठाकरे, संजय इंगळे, मारोती पवार, प्रकाश डंभारे, आशीष लोणकर, रूपेश कल्यमवार, किशोर चवरडोल, रमेश आंबेपवार, नामदेव आडे, अकबर तंवर, विवेक भोयर, गजानन चौधरी, नागोराव कुमरे, रफिकबाबू, निकडे पाटील, अशोक देठे, चंपत आत्राम, तुरपाबाई पुसनाके, विजय कडू, संजय गोडे, माणिक मेश्राम आदी उपस्थित होते. सभापती ठाकरे पुढे म्हणाले, पाच वर्षांपूर्वी पगाराची सोय नसलेली बाजार समिती आज करोडो रुपयांनी नफ्यात आले आहे. एक रुपयाचेही कर्ज संस्थेवर नाही. व्यापाऱ्यांवर कडक कारवाई करणारी ही एकमेव बाजार समिती आहे. शेतकरी हितासाठी अनेक निर्णय घेण्यात आले. त्यात १०० टक्के कापूस खरेदी लिलावाद्वारे करण्याचा निर्णय घेऊन अंमलबजावणीही केली. कापसाचे दर घसरल्यानंतर सीसीआयद्वारा कापूस खरेदी केली. एसएमएस सेवेद्वारे शेतकऱ्यांना दररोजचा दर कळविला जातो. प्रथमच या पाच वर्षात शेतमाल तारण योजना राबविली. जवळपास तीन कोटी रुपये शेतमाल तारण योजनेसाठी तरतूद केली. सद्यस्थितीत वॉल कंपाऊंड, काँक्रिटीकरणाची कामे सुरू आहे, असे त्यांनी सांगितले. (तालुका प्रतिनिधी)