शहरं
Join us  
Trending Stories
1
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
2
Operation Sindoor Live Updates: राज्यांना आपत्कालीन अधिकारांचा वापर करण्याची परवानगी, गृह मंत्रालयाचा निर्णय
3
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर RSSची मोदी सरकारच्या पाठीवर कौतुकाची थाप, भारतीय सैन्याचे केले अभिनंदन
4
भारत-पाक तणावादरम्यान सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर?
5
India Pakistan War: 'आमचे पंतप्रधान भित्रे, ते मोदींचे नाव घ्यायला घाबरतात'; पाकिस्तानी खासदाराने त्यांच्याच सरकारला सुनावले
6
India Pakistan Vidoe: पाकिस्तानने डागलेली उखळी तोफ थेट घरावर, क्षणात दिसेनासं झालं, बघा काय घडलं?
7
यशस्वी जैस्वालचा यू-टर्न ! गोवा नव्हे, मुंबई संघाकडूनच क्रिकेट खेळणार... काय दिलं कारण?
8
हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त! पाकिस्तानच्या गोळीबारात जुळ्या भावंडांचा मृत्यू
9
पाक लष्कर प्रमुखाला मिळाली विशेष 'पॉवर'; पाकिस्तानी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
10
लग्नाच्या अवघ्या १५व्या दिवशीच नवरीनं उडवली सासरची झोप; नवरदेवालाही लावला चुना अन्...  
11
Mumbai: टाटा मेमोरियल हॉस्पिटलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; भारत- पाकिस्तान तणावादरम्यान मेल
12
उद्यापासून महाराष्ट्रातील या ठिकाणी पेट्रोल पंपावर UPI पेमेंट बंद; कारण काय? जाणून घ्या...
13
तुमच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी आर्थिक नियोजन कसे करावे? महागाई लक्षात घेऊन 'या' टिप्स फॉलो करा
14
India Pakistan: 'ये कोई तरीका है भीख मांगने का'; भारताच्या 'पीआयबी'ने पाकिस्तानची उडवली खिल्ली 
15
मागे कोण उभं आहे बघा, शवपेट्यांना लपटलेले झेंडे बघा; भारताने जगाला दाखवला पाकचा खरा चेहरा
16
Operation Sindoor वर मुकेश अंबानींचं वक्तव्य, पंतप्रधानांचा उल्लेख करत केलं 'हे' वक्तव्य 
17
"घाबरण्याची गरज नाही..," भारत-पाक तणावादरम्यान इंडियन ऑईलनं पेट्रोल-डिझेलवर केलं मोठं वक्तव्य
18
"पुढचं आईस्क्रीम आता लाहोरमध्येच खाईन"; कर्तव्यावर परतलेल्या जवानाचा व्हिडीओ पाहून वाटेल अभिमान!
19
India Pakistan: पाकिस्तानच्या मिसाईल्स फटाक्यासारख्या फुस्स; पंजाबमध्ये सापडली पाडलेली क्षेपणास्त्रे, बघा व्हिडीओ
20
सलमान खान आर्मी ऑफिसरच्या भूमिकेत, गलवान व्हॅलीतील भारत-चीन युद्धावर येणार सिनेमा

राजकीय अस्थिरतेतही साधला विकास

By admin | Updated: September 28, 2016 00:41 IST

वारंवार तक्रारी, सत्ताधाऱ्यांचा विरोध, दिला जाणारा त्रास अशा कात्रीत आणि राजकीय अस्थिरतेतही केवळ पाच संचालकांच्या भरवशावर समतोल राखत संस्थेचा विकास साधला.

अभिषेक ठाकरे : घाटंजी बाजार समितीची सभा, शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय झालेघाटंजी : वारंवार तक्रारी, सत्ताधाऱ्यांचा विरोध, दिला जाणारा त्रास अशा कात्रीत आणि राजकीय अस्थिरतेतही केवळ पाच संचालकांच्या भरवशावर समतोल राखत संस्थेचा विकास साधला. पाच वर्षांच्या कार्यकाळात बाजार समितीने विकासाचे अनेक टप्पे गाठले, असे सभापती अभिषेक ठाकरे यांनी आमसभेत सांगितले. यावेळी त्यांनी बाजार समितीच्या विकासाचा लेखाजोखा मांडला. यावेळी मंचावर बल्लू पाटील लोणकर, जितेंद्र मोघे, शंकरराव ठाकरे, संजय इंगळे, मारोती पवार, प्रकाश डंभारे, आशीष लोणकर, रूपेश कल्यमवार, किशोर चवरडोल, रमेश आंबेपवार, नामदेव आडे, अकबर तंवर, विवेक भोयर, गजानन चौधरी, नागोराव कुमरे, रफिकबाबू, निकडे पाटील, अशोक देठे, चंपत आत्राम, तुरपाबाई पुसनाके, विजय कडू, संजय गोडे, माणिक मेश्राम आदी उपस्थित होते. सभापती ठाकरे पुढे म्हणाले, पाच वर्षांपूर्वी पगाराची सोय नसलेली बाजार समिती आज करोडो रुपयांनी नफ्यात आले आहे. एक रुपयाचेही कर्ज संस्थेवर नाही. व्यापाऱ्यांवर कडक कारवाई करणारी ही एकमेव बाजार समिती आहे. शेतकरी हितासाठी अनेक निर्णय घेण्यात आले. त्यात १०० टक्के कापूस खरेदी लिलावाद्वारे करण्याचा निर्णय घेऊन अंमलबजावणीही केली. कापसाचे दर घसरल्यानंतर सीसीआयद्वारा कापूस खरेदी केली. एसएमएस सेवेद्वारे शेतकऱ्यांना दररोजचा दर कळविला जातो. प्रथमच या पाच वर्षात शेतमाल तारण योजना राबविली. जवळपास तीन कोटी रुपये शेतमाल तारण योजनेसाठी तरतूद केली. सद्यस्थितीत वॉल कंपाऊंड, काँक्रिटीकरणाची कामे सुरू आहे, असे त्यांनी सांगितले. (तालुका प्रतिनिधी)