शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
3
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
4
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
5
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
6
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
7
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
8
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
9
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
10
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
11
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
12
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
13
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
14
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
15
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
16
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
17
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
18
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
19
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
20
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?

राजकीय अस्थिरतेतही साधला विकास

By admin | Updated: September 28, 2016 00:41 IST

वारंवार तक्रारी, सत्ताधाऱ्यांचा विरोध, दिला जाणारा त्रास अशा कात्रीत आणि राजकीय अस्थिरतेतही केवळ पाच संचालकांच्या भरवशावर समतोल राखत संस्थेचा विकास साधला.

अभिषेक ठाकरे : घाटंजी बाजार समितीची सभा, शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय झालेघाटंजी : वारंवार तक्रारी, सत्ताधाऱ्यांचा विरोध, दिला जाणारा त्रास अशा कात्रीत आणि राजकीय अस्थिरतेतही केवळ पाच संचालकांच्या भरवशावर समतोल राखत संस्थेचा विकास साधला. पाच वर्षांच्या कार्यकाळात बाजार समितीने विकासाचे अनेक टप्पे गाठले, असे सभापती अभिषेक ठाकरे यांनी आमसभेत सांगितले. यावेळी त्यांनी बाजार समितीच्या विकासाचा लेखाजोखा मांडला. यावेळी मंचावर बल्लू पाटील लोणकर, जितेंद्र मोघे, शंकरराव ठाकरे, संजय इंगळे, मारोती पवार, प्रकाश डंभारे, आशीष लोणकर, रूपेश कल्यमवार, किशोर चवरडोल, रमेश आंबेपवार, नामदेव आडे, अकबर तंवर, विवेक भोयर, गजानन चौधरी, नागोराव कुमरे, रफिकबाबू, निकडे पाटील, अशोक देठे, चंपत आत्राम, तुरपाबाई पुसनाके, विजय कडू, संजय गोडे, माणिक मेश्राम आदी उपस्थित होते. सभापती ठाकरे पुढे म्हणाले, पाच वर्षांपूर्वी पगाराची सोय नसलेली बाजार समिती आज करोडो रुपयांनी नफ्यात आले आहे. एक रुपयाचेही कर्ज संस्थेवर नाही. व्यापाऱ्यांवर कडक कारवाई करणारी ही एकमेव बाजार समिती आहे. शेतकरी हितासाठी अनेक निर्णय घेण्यात आले. त्यात १०० टक्के कापूस खरेदी लिलावाद्वारे करण्याचा निर्णय घेऊन अंमलबजावणीही केली. कापसाचे दर घसरल्यानंतर सीसीआयद्वारा कापूस खरेदी केली. एसएमएस सेवेद्वारे शेतकऱ्यांना दररोजचा दर कळविला जातो. प्रथमच या पाच वर्षात शेतमाल तारण योजना राबविली. जवळपास तीन कोटी रुपये शेतमाल तारण योजनेसाठी तरतूद केली. सद्यस्थितीत वॉल कंपाऊंड, काँक्रिटीकरणाची कामे सुरू आहे, असे त्यांनी सांगितले. (तालुका प्रतिनिधी)