शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रँड चितपट-महायुतीला टक्कर; करून दाखवणारे शशांक राव कोण? बेस्ट निवडणुकीत ठरले बाजीगर
2
रेशन कार्ड धारकांसाठी महत्वाची अपडेट! कार्डवरुन नाव काढणार? केंद्राने १.१७ कोटी लोकांची यादी पाठवली
3
पत्नीची गोळ्या, कीटकनाशक देऊन हत्या, मृतदेह पुरला; बॉयफ्रेंडसोबत पळून गेल्याचा केला बनाव, पण एका चुकीमुळे अडकला
4
रेखा गुप्ता यांच्यावरील हल्ला पूर्व नियोजित कट; आरोपीचे २४ तास पूर्वीचे सीसीटीव्ही फुटेज समोर
5
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
6
आधी ट्रम्प यांची भेट, नंतर भारतात मोठी कर्मचारी कपात; एकाच दिवसात मालकाला बसला १.३१ लाख कोटींचा फटका
7
या देशात शुक्रवारचे नमाजपठण केले नाही तर 2 वर्षांचा तुरुंगवास; भरावा लागेल ₹ 61 हजारचा दंड! का करण्यात आला असा कायदा?
8
आता खरी बायको कोण? एकाच वेळी ६ पत्नींचा पतीच्या नुकसानभरपाईवर दावा, वन विभाग संभ्रमात
9
"करीना कपूरला नवाब असल्याचा गर्व...", पत्रकार अनिता पाध्ये स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या...
10
सरकारच्या एका निर्णयामुळे २ लाख नोकऱ्या धोक्यात? ४०० कंपन्या बंद होण्याची भीती, कोणी दिला इशारा?
11
'ते व्हिडीओ पाहून तो अस्वस्थ होता म्हणूनच...'; CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या राजेशच्या आईची धक्कादायक माहिती
12
अमेरिकेच्या टॅरिफविरोधात लढण्यासाठी रशिया भारतासोबत! म्हणाले, भारतीय वस्तूंचे स्वागत, तेलही देणार
13
टीम इंडियातील माजी सहकाऱ्यांपैकी कुणी कॉल केला का? पृथ्वी म्हणाला, मला सहानुभूती नकोय!
14
CM-PM आणि मंत्र्यांना पदावरुन हटवण्याचे विधेयक योग्य; शशी थरुर यांचा पाठिंबा
15
वाईफ स्वॅपिंग, पोलिसही चक्रावले! पत्नीला मित्राकडे पाठवले, मित्राच्या पत्नीला आपल्याकडे ठेवले
16
हृदयद्रावक तेवढीच धक्कादायक...! कुत्र्याने चावलेही नाही, तरी २ वर्षांच्या चिमुकल्याचा रेबीजने मृत्यू
17
सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण! १ तोळा सोन्याचा भाव काय? अचानक का घसरले दर?
18
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या दारुण पराभवावर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
19
गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर जमावाकडून शाळेची तोडफोड
20
₹७.५८ ची SUV रोज खरेदी करताहेत ६०० लोक; २ लाखांच्या DP सह विकत घेऊ शकता, किती असेल मंथली EMI?

सुकळीतील शेतकऱ्यांचा शेती न पेरण्याचा निर्धार

By admin | Updated: March 28, 2016 02:26 IST

सततची नापिकी व शेतमालाला नसलेला भाव, शासनाचे उदासिन धोरण या सर्व बाबींना कंटाळून आर्णी तालुक्यातील

आर्णी : सततची नापिकी व शेतमालाला नसलेला भाव, शासनाचे उदासिन धोरण या सर्व बाबींना कंटाळून आर्णी तालुक्यातील सुकळी येथील ग्रामस्थांनी एकत्र येऊन शेतीवरच बहिष्कार टाकून पेरणी न करण्याचा निर्णय घेतला. गावातील कुणीही यावर्षी आपल्या शेतात पेरणी करणार नाही, असा सामुहिक निर्णय शेतकरी संघटनेची चळवळ उभारणाऱ्या सुकळी या गावाने घेतला. ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामस्थांनी एकत्र येऊन सर्वसंमत्तीने हा निर्णय घेतला. शेतकरी संटनेचे ‘बळीराज्य’ म्हणून ज्या गावाची ख्याती आहे. ज्या गावामधून जिल्ह्यातील शेतकरी संघटनेला बळ मिळाले होते, आज त्याच गावावर शासनाच्या शेती व शेतकऱ्यांप्रती असलेल्या उदासीन धोरणामुळे पेरणी न करण्याचा निर्णय घेण्याची वेळ आली आहे. सुकळीवासियांनी शासनाकडे काही मागण्याही केल्या आहेत. त्यामध्ये संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी, पूर्ण शेताला तार कंपाऊंड व्हावे, बियाणे कमी दराने मिळावे आदी प्रमुख मागण्या आहेत. या मागण्या पूर्ण न झाल्यास ही चळवळ तालुका व जिल्हाभर राबवून शेती न करण्यासाठी इतरांनाही पे्ररित करू असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. यावेळी सरपंच सुभाष जाधव, देविदास जाधव, वैकुंठराव मुंडे, विलास जाधव, नामदेव वासरवाड, मोतीसिंग राठोड, राजू मिरासे, संतोष ढोले, प्रमोद कुदळे, विवेक दहीफळे आदींसह असंख्य शेतकरी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)शासनाकडे केल्या विविध मागण्या४शासनाचे शेती वरोधी धोरण, निसर्गाचा लहरीपणा, शेतमालाला भाव नसणे या सर्व बाबींना कंटाळून सुकळी येथील शेतकऱ्यांनी आगळा-वेगळा निर्णय घेऊन पेरणी करणार नसल्याचे जाहीर केले. यावेळी त्यांनी शासनाकडे संपूर्ण कर्जमाफीची मागणी केली. सोबतच बियाण्यांचे भाव कमी करावे, कृषीशी सबंधित अवजारांची, फवारणी औषधांचे भाव कमी करण्याची मागणी केली. शेतीला वन्यप्राण्यांपासून संरक्षण मिळावे हीसुद्धा मागणी करण्यात आली आहे.