शहरं
Join us  
Trending Stories
1
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
2
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
3
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
4
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
5
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
6
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
7
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
8
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
9
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
10
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
11
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
12
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
13
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
14
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
15
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
16
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
17
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
18
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
19
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
20
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र

सुकळीतील शेतकऱ्यांचा शेती न पेरण्याचा निर्धार

By admin | Updated: March 28, 2016 02:26 IST

सततची नापिकी व शेतमालाला नसलेला भाव, शासनाचे उदासिन धोरण या सर्व बाबींना कंटाळून आर्णी तालुक्यातील

आर्णी : सततची नापिकी व शेतमालाला नसलेला भाव, शासनाचे उदासिन धोरण या सर्व बाबींना कंटाळून आर्णी तालुक्यातील सुकळी येथील ग्रामस्थांनी एकत्र येऊन शेतीवरच बहिष्कार टाकून पेरणी न करण्याचा निर्णय घेतला. गावातील कुणीही यावर्षी आपल्या शेतात पेरणी करणार नाही, असा सामुहिक निर्णय शेतकरी संघटनेची चळवळ उभारणाऱ्या सुकळी या गावाने घेतला. ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामस्थांनी एकत्र येऊन सर्वसंमत्तीने हा निर्णय घेतला. शेतकरी संटनेचे ‘बळीराज्य’ म्हणून ज्या गावाची ख्याती आहे. ज्या गावामधून जिल्ह्यातील शेतकरी संघटनेला बळ मिळाले होते, आज त्याच गावावर शासनाच्या शेती व शेतकऱ्यांप्रती असलेल्या उदासीन धोरणामुळे पेरणी न करण्याचा निर्णय घेण्याची वेळ आली आहे. सुकळीवासियांनी शासनाकडे काही मागण्याही केल्या आहेत. त्यामध्ये संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी, पूर्ण शेताला तार कंपाऊंड व्हावे, बियाणे कमी दराने मिळावे आदी प्रमुख मागण्या आहेत. या मागण्या पूर्ण न झाल्यास ही चळवळ तालुका व जिल्हाभर राबवून शेती न करण्यासाठी इतरांनाही पे्ररित करू असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. यावेळी सरपंच सुभाष जाधव, देविदास जाधव, वैकुंठराव मुंडे, विलास जाधव, नामदेव वासरवाड, मोतीसिंग राठोड, राजू मिरासे, संतोष ढोले, प्रमोद कुदळे, विवेक दहीफळे आदींसह असंख्य शेतकरी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)शासनाकडे केल्या विविध मागण्या४शासनाचे शेती वरोधी धोरण, निसर्गाचा लहरीपणा, शेतमालाला भाव नसणे या सर्व बाबींना कंटाळून सुकळी येथील शेतकऱ्यांनी आगळा-वेगळा निर्णय घेऊन पेरणी करणार नसल्याचे जाहीर केले. यावेळी त्यांनी शासनाकडे संपूर्ण कर्जमाफीची मागणी केली. सोबतच बियाण्यांचे भाव कमी करावे, कृषीशी सबंधित अवजारांची, फवारणी औषधांचे भाव कमी करण्याची मागणी केली. शेतीला वन्यप्राण्यांपासून संरक्षण मिळावे हीसुद्धा मागणी करण्यात आली आहे.