शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
2
महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा सामुहिक राजीनामा
3
दिल्लीचे प्रदूषण रोखण्यासाठी चीनचा 'धक्कादायक' सल्ला! ३००० मोठे उद्योग बंद करण्याची सूचना; बीजिंगच्या धर्तीवर प्लॅन तयार?
4
"...म्हणून आम्ही सांगत होतो करा सदैव हिंदुत्वाची कदर"; पवारांचा उल्लेख, आशिष शेलारांनी उद्धव ठाकरेंवर डागली तोफ
5
Investment Plan : केवळ एका वर्षासाठी गुंतवणूक करायचीये? 'हे' ५ पर्याय देऊ शकतात तुम्हाला जबरदस्त रिटर्न, जाणून घ्या
6
गृहकर्जावर होईल १८ लाख रुपयांपर्यंतची बचत! EMI कमी करण्यापेक्षा वापरावा लागेल 'हा' पर्याय
7
कोल्हापूर हादरलं! मुलानेच केली आई-वडिलांची हत्या; धक्कादायक कारण आले समोर
8
ICICI Prudential AMC IPO Listing: आयसीआयसीआय प्रूडेंशियल एएमसीच्या आयपीओनं केलं मालामाल; प्रत्येक शेअरवर मिळाला 'इतका' नफा
9
बांगलादेशात ISI सक्रीय, कंटरपंथींकडून जाळपोळ, हिंसाचार सुरू; भारताविरोधात पाकिस्तानचं षडयंत्र?
10
नोकरी बदलणाऱ्यांना EPFO चा मोठा दिलासा! 'ब्रेक'बाबतचे नियम बदलले; आता शनिवार-रविवारची सुट्टी अडथळा ठरणार नाही
11
Dolphin in Mumbai: मुंबईकरांना सुखद धक्का! वरळी सी फेसच्या समुद्रकिनाऱ्यावर डॉल्फिनची मस्ती, व्हिडीओ व्हायरल
12
मुंबईत ठाकरे बंधू युतीत शरद पवारांची राष्ट्रवादी सहभागी होणार?; २२ जागांचा देणार प्रस्ताव
13
VIDEO: दादरमध्ये अजब प्रकार, एक तरुण या इमारतीवरुन त्या इमारतीवर मारतोय उड्या; पोलिसांची दमछाक
14
Stock Market Today: शेअर बाजाराची जबरदस्त सुरुवात; Sensex ची ३३० अंकांनी उसळी; IT Stocks सुस्साट
15
अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनामध्ये जेट विमानाचा अपघात; संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त
16
'...तर त्यांचा एक हात तोडून दुसऱ्या हातात दिला असता'; इम्तियाज जलील मंत्री संजय निषाद यांच्यावर संतापले
17
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
18
मुंबई विमानतळाची गोपनीय माहिती चोरट्यांच्या हाती; ऐरोलीतील घटना : अदानी ग्रुपच्या मॅनेजरचा लॅपटॉप चोरीला
19
मी सर्वांसमोर तिला चुकीच्या पद्धतीने का किस करेल? ट्रोल झाल्यावर राकेश बेदींनी दिलं स्पष्टीकरण
20
Vijay Mallya : देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
Daily Top 2Weekly Top 5

सत्याग्रह सुरूच ठेवण्याचा मंचचा निर्धार

By admin | Updated: October 6, 2015 03:20 IST

पुसद जिल्हा निर्मितीसाठी पुसद विकास मंचने गांधी जयंतीपासून अन्नत्याग सत्याग्रहाला प्रारंभ केला असून सोमवारी

पुसद : पुसद जिल्हा निर्मितीसाठी पुसद विकास मंचने गांधी जयंतीपासून अन्नत्याग सत्याग्रहाला प्रारंभ केला असून सोमवारी माजी मंत्री आमदार मनोहरराव नाईक यांनी सत्याग्रहस्थळाला भेट दिली. त्यावेळी अन्नत्याग सत्याग्रह थांबवा, अशी विनंती केली. मात्र लोकहितार्थ निर्धारित तारखेपर्यंत सत्याग्रह सुरूच ठेवण्याचा निर्धार पुसद विकास मंचने यावेळी केला. अन्नत्याग सत्याग्रहाच्या चौथ्या दिवशी पुसद विकास मंचचे अ‍ॅड.सचिन नाईक, शाकीब शहा, अभिलेश खैरमोडे यांच्यासह पुसद अर्बनचे अध्यक्ष शरद मैंद, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस डॉ.वजाहत मिर्झा, महेंद्र मस्के ही मंडळी या सत्याग्रहात सहभागी झाली आहे. चार दिवसांपासून अन्नत्याग सत्याग्रह करणारे अ‍ॅड.सचिन नाईक यांची प्रकृती खालावली. सोमवारी सकाळी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ.आरती फुपाटे, जिल्हा परिषद सदस्य ययाती नाईक, नगराध्यक्ष माधवी गुल्हाने, नगरपरिषद उपाध्यक्ष डॉ.मोहमद नदीम, पंचायत समिती सभापती सुभाष कांबळे, जिनिंग प्रेसिंगचे उपाध्यक्ष अण्णासाहेब ठेंगे, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष रतिराव राऊत, पंचायत समिती उपसभापती विवेक मस्के, जिल्हा परिषद सदस्य माधवी पाटील, साहेबराव कदम, सीताराम ठाकरे, गुलाबराव जाधव, गोदावरी जाधव, आशाताई पांडे, आशा चव्हाण, अ‍ॅड.माधव माने, दीपक आसेगावकर, डॉ.उत्तम रुद्रवार, माजी नगराध्यक्ष सतीश बयास, महेश खडसे यांच्यासह अनेकांनी भेटी दिल्या. दरम्यान, माजी मंत्री आमदार मनोहरराव नाईक यांनी सत्याग्रहस्थळाला भेट देवून आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. त्यावेळी ते म्हणाले, पुसद जिल्हा निर्मितीसाठी पुसद विकास मंचने गांधी जयंतीपासून अन्नत्याग सत्याग्रहाची कठोर भूमिका घेतली. पुसद जिल्हा करण्यास मी स्वत: विकास मंचच्या चळवळीत सहभागी आहे. मुख्यमंत्री यांच्याशी भेट घेऊन पुसद जिल्हा निर्मितीबाबत चर्चा करू. लवकरच मुख्यमंत्र्यांसोबत पुसद विकास मंचची बैठक घडवून आणणार आहो. या बैठकीला आपण उपस्थित राहू, असे त्यांनी सांगितले. नेते, समाजसेवी मोठ्या संख्येने सत्याग्रहाला भेट देवून जिल्हा निर्मितीला पाठिंबा दर्शवित आहे. बार असोसिएशनने जिल्हा निर्मितीचा ठराव करून विकास मंचच्या सुपूर्द केला. यावेळी संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड.कैलास राठोड, अ‍ॅड.माधवराव माने, अ‍ॅड.प्रशांत देशमुख, अ‍ॅड.विवेक पांडे, अ‍ॅड.चंद्रशेखर शिंदे उपस्थित होते. यशस्वीतेसाठी निशांत बयास, धनंजय सोनी, अभय गडम, पंकज पारधे, राहुल कांबळे, किरण देशमुख, नारायण पुलाते, कैलास जगताप, रवी ग्यानचंदाणी, सुरज डुबेवार, संजय भंडारी, निखिल चिद्दरवार, अ‍ॅड. नसरूल्ला खान, अजय क्षीरसागर, देवेंद्र खडसे, डॉ.उमेश रेवणवार आदी परिश्रम घेत आहे. (तालुका प्रतिनिधी)