शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
2
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
4
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
5
IND vs ENG : हेडिंग्लेच्या मैदानात कसा राहिलाय टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
6
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
7
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
8
दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं वाटतं का? सायली संजीव म्हणाली- "त्या दोघांनाही..."
9
एअर इंडिया विमान अपघातात सापडलेल्या ७० तोळे सोने आणि रोख रकमेवर कुणाचा हक्क? कायदा काय सांगतो?
10
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
11
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?
12
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
13
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
14
Viral Video: वा क्या कारीगरी है; विजेच्या खांबातून रस्ता, बंगळुरूतील व्हिडीओ व्हायरल, तुम्ही बघितला का?
15
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
16
Yogini Ekadashi 2025: योगिनी ते आषाढी एकादशी, १५ दिवस ऐका 'हे' स्तोत्र; मिटेल चिंता, होईल अपार लाभ!
17
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
18
गरिबांच्या खिशावर ‘दरोडा’ टाकणाऱ्या लाचखोरांच्या मालमत्तेवर ‘हातोडा’ कधी?
19
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
20
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली

सत्याग्रह सुरूच ठेवण्याचा मंचचा निर्धार

By admin | Updated: October 6, 2015 03:20 IST

पुसद जिल्हा निर्मितीसाठी पुसद विकास मंचने गांधी जयंतीपासून अन्नत्याग सत्याग्रहाला प्रारंभ केला असून सोमवारी

पुसद : पुसद जिल्हा निर्मितीसाठी पुसद विकास मंचने गांधी जयंतीपासून अन्नत्याग सत्याग्रहाला प्रारंभ केला असून सोमवारी माजी मंत्री आमदार मनोहरराव नाईक यांनी सत्याग्रहस्थळाला भेट दिली. त्यावेळी अन्नत्याग सत्याग्रह थांबवा, अशी विनंती केली. मात्र लोकहितार्थ निर्धारित तारखेपर्यंत सत्याग्रह सुरूच ठेवण्याचा निर्धार पुसद विकास मंचने यावेळी केला. अन्नत्याग सत्याग्रहाच्या चौथ्या दिवशी पुसद विकास मंचचे अ‍ॅड.सचिन नाईक, शाकीब शहा, अभिलेश खैरमोडे यांच्यासह पुसद अर्बनचे अध्यक्ष शरद मैंद, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस डॉ.वजाहत मिर्झा, महेंद्र मस्के ही मंडळी या सत्याग्रहात सहभागी झाली आहे. चार दिवसांपासून अन्नत्याग सत्याग्रह करणारे अ‍ॅड.सचिन नाईक यांची प्रकृती खालावली. सोमवारी सकाळी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ.आरती फुपाटे, जिल्हा परिषद सदस्य ययाती नाईक, नगराध्यक्ष माधवी गुल्हाने, नगरपरिषद उपाध्यक्ष डॉ.मोहमद नदीम, पंचायत समिती सभापती सुभाष कांबळे, जिनिंग प्रेसिंगचे उपाध्यक्ष अण्णासाहेब ठेंगे, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष रतिराव राऊत, पंचायत समिती उपसभापती विवेक मस्के, जिल्हा परिषद सदस्य माधवी पाटील, साहेबराव कदम, सीताराम ठाकरे, गुलाबराव जाधव, गोदावरी जाधव, आशाताई पांडे, आशा चव्हाण, अ‍ॅड.माधव माने, दीपक आसेगावकर, डॉ.उत्तम रुद्रवार, माजी नगराध्यक्ष सतीश बयास, महेश खडसे यांच्यासह अनेकांनी भेटी दिल्या. दरम्यान, माजी मंत्री आमदार मनोहरराव नाईक यांनी सत्याग्रहस्थळाला भेट देवून आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. त्यावेळी ते म्हणाले, पुसद जिल्हा निर्मितीसाठी पुसद विकास मंचने गांधी जयंतीपासून अन्नत्याग सत्याग्रहाची कठोर भूमिका घेतली. पुसद जिल्हा करण्यास मी स्वत: विकास मंचच्या चळवळीत सहभागी आहे. मुख्यमंत्री यांच्याशी भेट घेऊन पुसद जिल्हा निर्मितीबाबत चर्चा करू. लवकरच मुख्यमंत्र्यांसोबत पुसद विकास मंचची बैठक घडवून आणणार आहो. या बैठकीला आपण उपस्थित राहू, असे त्यांनी सांगितले. नेते, समाजसेवी मोठ्या संख्येने सत्याग्रहाला भेट देवून जिल्हा निर्मितीला पाठिंबा दर्शवित आहे. बार असोसिएशनने जिल्हा निर्मितीचा ठराव करून विकास मंचच्या सुपूर्द केला. यावेळी संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड.कैलास राठोड, अ‍ॅड.माधवराव माने, अ‍ॅड.प्रशांत देशमुख, अ‍ॅड.विवेक पांडे, अ‍ॅड.चंद्रशेखर शिंदे उपस्थित होते. यशस्वीतेसाठी निशांत बयास, धनंजय सोनी, अभय गडम, पंकज पारधे, राहुल कांबळे, किरण देशमुख, नारायण पुलाते, कैलास जगताप, रवी ग्यानचंदाणी, सुरज डुबेवार, संजय भंडारी, निखिल चिद्दरवार, अ‍ॅड. नसरूल्ला खान, अजय क्षीरसागर, देवेंद्र खडसे, डॉ.उमेश रेवणवार आदी परिश्रम घेत आहे. (तालुका प्रतिनिधी)