शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
2
'समृद्धी'वर दगडफेक करून लुटीचा प्रयत्न; छ. संभाजीनगर ते नागपूर मार्गावरील प्रकार वाढले!
3
गुरुवारी गुरुपौर्णिमा: ४ गुरुवार करा स्वामी सेवा, कृपा होईलच विश्वास ठेवा; नेमके काय करावे?
4
Tata Motors Shares: परदेशातून चांगली बातमी, तरीही आपटले टाटा मोटर्सचे शेअर्स; गुतवणूकदारांनी काय करावं?
5
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
6
घाईगडबडीत चुकीची कर व्यवस्था निवडली? घाबरू नका! ITR दाखल करताना 'ही' ट्रिक वापरा आणि टॅक्स वाचवा
7
इस्राइलने इराणचा आणखी एक बडा मोहरा टिपला, चीफ ऑफ आर्मी स्टाफ अली शादमानी यांना मारल्याचा दावा  
8
हुल्लडबाजांच्या दुचाकी पुलावर आल्याने गर्दी झाली अन् होत्याचे नव्हते झाले!
9
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
10
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
11
मैत्री, न्यूड कॉल अन् धमकी...; तरुणाकडे सापडले १३ हजार अश्लील फोटो, मुंबई पोलिसांनाही बसला धक्का
12
डॉली चायवाला Starbucks चा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनणार का? समोर आलं सत्य, कंपनी म्हणाली...
13
Maharashtra Teachers: 'मी आजारी आहे किंवा...' बदलीसाठी खोटे बोलल्यास शिक्षकांच्या अंगलट येणार!
14
Sonam Raghuwanshi Video: सोनम आणि राजाच्या पुढे चालत होते तिन्ही आरोपी, नवीन व्हिडीओ व्हायरल
15
Video: ५ चेंडूत ५ बळी... IPL नंतरही दिग्वेश राठीचा जलवा कायम, केली अप्रतिम गोलंदाजी
16
Wedding Ritual: लग्नकार्य निर्विघ्नपणे पार पडावे म्हणून 'या' पाच देवतांना ठेवली जाते लग्नपत्रिका!
17
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
18
हद्दच झाली राव! वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बुक केली रुग्णवाहिका अन्...; 'अशी' झाली पोलखोल
19
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
20
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या

संत्रा बागायतदार उद्ध्वस्त

By admin | Updated: August 27, 2014 23:53 IST

आधीच अपुऱ्या पावसामुळे शेतकरी वर्ग चिंतेत आहे. यावर्षी शेती पिकणार की, नाही अशी विदारक परिस्थिती आहे. अशातच संत्राही हातचा गेल्यात जमा आहे. संत्र्याचा आंबिया बहार मोठ्या प्रमाणात गळाला आहे.

कळंब : आधीच अपुऱ्या पावसामुळे शेतकरी वर्ग चिंतेत आहे. यावर्षी शेती पिकणार की, नाही अशी विदारक परिस्थिती आहे. अशातच संत्राही हातचा गेल्यात जमा आहे. संत्र्याचा आंबिया बहार मोठ्या प्रमाणात गळाला आहे. हातात येणारे संत्रा पीक उद्ध्वस्त होतानाचे चित्र पाहावे लागण्याची दुर्देवी वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. तालुक्यात भाजीपाल्यासह फळवर्गीय पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात. अनेक शेतकऱ्यांकडे संत्रा बागा आहे. परंतु यावेळेस आंबिया बहार डोळ्यादेखत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. फळांची गळती इतकी मोठी आहे की, अर्ध्यापेक्षा अधिक संत्रा पडलेला आहे. संत्र्याने लदबदलेली झाडे बोडखी झाली आहे. याला हवामानातील बदल कारणीभूत असल्याचे सांगितले जाते. फळगळती थांबविण्यासाठी शेतकऱ्यांनी अनेक प्रकारची फवारणी केली. यासाठी शेतकऱ्यांनी हजारो रुपये खर्च केले. परंतु पदरी निराशाच पडली. याचा फटका तालुक्यातील १२० पैकी ८० हेक्टरातील संत्राबागांना बसला. पर्यायाने २३ हजार झाडे क्षतिग्रस्त झाली. त्यामुळे संत्रा बागाच्या नुकसानीचा सर्वे करून भरपाई देण्याची मागणी शेतकरी चंद्रशेखर चांदोरे, विजय वाके, विनोद पद्माकर काळे, अविनाश मेत्रे, माणिक वाके, रफीक शेख, संजय रावेकर, श्याम केवटे, श्याम बांते, मुरलीधर डेहनकर, सुनील बरडे, भास्कर महाजन, तुषार मेत्रे, डॉ.मोहन तुंडलवार, विलास खसाळे, मोहन उमरतकर, विशाल अजमिरे, पुनमचंद छल्लानी, त्र्यंबक वाके, काशिनाथ काळे आदींनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)