शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
3
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
4
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
5
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
6
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
7
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
8
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
9
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
10
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
11
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
12
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
13
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
14
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
15
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
16
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
17
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
18
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
19
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
20
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत

नगर पालिकेला 44 कोटींचा निधी मिळूनही विकासकामे रेंगाळलेलीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 05:00 IST

शहरात योग्य नियोजनाअभावी  कामांवर खर्च करूनही मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात सत्ताधारी कमी पडल्याच्या नागरिकांच्या भावना आहेत. त्यामुळेच नागरिकांना विविध समस्यांचा आजही सामना करावा लागत आहे.  शासनाच्या  विविध योजनांअंतर्गत विकास कामांसाठी मिळालेल्या निधीतून विकास कामे  करण्यात आली. परंतु कामाचे नियोजन आवश्यक असताना, मूलभूत सोयी-सुविधांऐवजी इतर कामांना प्राधान्य दिले असल्याचे दिसते. 

नरेश मानकरलोकमत न्यूज नेटवर्कपांढरकवडा : नगरपरिषदेत नगराध्यक्षासह १९ पैकी १४ सदस्य निवडून देऊन पांढरकवडावासीयांनी प्रहार जनशक्ती पार्टीवर विश्वास दाखवित एकहाती सत्ता दिली.  पालिकेला विकास कामासाठी मागील चार वर्षात ४४ कोटी ६७ लाखांचा घसघशीत निधीही मिळाला. परंतु  नियोजनाचा अभाव असल्याने अनेक कामांना मुहूर्तच मिळाला नाही. दुसरीकडे मंजूर असलेली अनेक कामेही रखडलेली असल्याने शहरवासीयांचा मोठा अपेक्षाभंग झाल्याचे दिसून येते. शहरात योग्य नियोजनाअभावी  कामांवर खर्च करूनही मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात सत्ताधारी कमी पडल्याच्या नागरिकांच्या भावना आहेत. त्यामुळेच नागरिकांना विविध समस्यांचा आजही सामना करावा लागत आहे.  शासनाच्या  विविध योजनांअंतर्गत विकास कामांसाठी मिळालेल्या निधीतून विकास कामे  करण्यात आली. परंतु कामाचे नियोजन आवश्यक असताना, मूलभूत सोयी-सुविधांऐवजी इतर कामांना प्राधान्य दिले असल्याचे दिसते. 

अतिक्रमणांची समस्या कायम  शहरातील मुख्य बाजारपेठ, आठवडी बाजार परिसर, डीपी रोड,  बसवेश्वर चौक ते डायमंड चौक, शिबला पॉईंट्सह अनेक ठिकाणी अतिक्रमणांची समस्या कायम आहे. शहरातील रस्ते मोठे असूनही  व्यापाऱ्यांनी रस्त्यावरच अतिक्रमण केल्यामुळे रस्ते अरुंद बनले आहेत.

रस्त्यांची दयनीय अवस्थापावसामुळे  रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. वाहतुकीचा रस्ता असलेल्या वाय पॉईंट ते  बसवेश्वर चौकादरम्यान, बिरसा मुंडा चौक ते  स्टेट बँक रोड, तसेच वसंतराव नाईक चौक ते विश्रामगृह रोड ते बिर्सा मुंडा चौकदरम्यान मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे रहदारीस अडथळा होत आहे.

नवीन वसाहतीत घाणीचे साम्राज्यशहरात नवीन झालेल्या काही वसाहतींमध्ये नाल्यांची कामे न झाल्यामुळे सांडपाणी मोकळ्या जागेत व रस्त्यावर येत आहे. त्यामुळे दुर्गंधी पसरली आहे. नीलकंठनगरमध्ये नाल्यांचे बांधकाम न केल्याने सांडपाणी मोकळ्या जागेत जमा होत आहे. त्यामुळे डासांचा उपद्रव वाढला आहे. 

पावसाळ्यात रस्त्यांवर पाणी

पावसाळ्याच्या दिवसात नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ च्या जुन्या पुलावरून जाणाऱ्या रस्त्यावरही घाणीचे साम्राज्य पसरले आहे. येथे पावसाचे पाणी साचल्याने नागरिकांना जीव मुठीत घ्यावा लागतो. 

वारंवार वाहतूक होते ठप्प

शहराच्या मुख्य रस्त्यावर दुतर्फा भाजीपाला, फळ विक्रेते व मिठाईवाल्यांची दुकाने लागतात. त्यातच गुरांचा ठिय्याही रस्त्यावरच असतो. त्यामुळे वाहतूक वारंवार ठप्प होते. यामुळे पांढरकवडावासीय त्रस्त झाले आहेत. 

ही महत्त्वाची कामे आहेत अर्धवट स्थितीतशहराला खुनी नदीच्या पाण्याद्वारे पाणीपुरवठा होतो.  या योजनेची पाईपलाईन बदलणे आवश्यक असताना, हे काम रखडले आहे. हिंदू स्मशानभूमीवरील मोठ्या शेडचे बांधकामही सत्ताधाऱ्यांच्या  कार्यकाळात  रखडलेलेच आहे. महादेव घाट सौंदर्यीकरणाचे कामही जैसे थे आहे. 

 

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमण