शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील", ओबीसी समाजाला आवाहन करत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान
2
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
3
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
4
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
5
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
6
अंगावर धावून गेली, चप्पल फेकून मारली अन्...; रुची गुज्जरची निर्मात्याला मारहाण, व्हिडीओ व्हायरल
7
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
8
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
9
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
10
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
11
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
12
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
13
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
14
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
15
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
16
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
17
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
18
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."
19
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
20
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...

नगर पालिकेला 44 कोटींचा निधी मिळूनही विकासकामे रेंगाळलेलीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 05:00 IST

शहरात योग्य नियोजनाअभावी  कामांवर खर्च करूनही मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात सत्ताधारी कमी पडल्याच्या नागरिकांच्या भावना आहेत. त्यामुळेच नागरिकांना विविध समस्यांचा आजही सामना करावा लागत आहे.  शासनाच्या  विविध योजनांअंतर्गत विकास कामांसाठी मिळालेल्या निधीतून विकास कामे  करण्यात आली. परंतु कामाचे नियोजन आवश्यक असताना, मूलभूत सोयी-सुविधांऐवजी इतर कामांना प्राधान्य दिले असल्याचे दिसते. 

नरेश मानकरलोकमत न्यूज नेटवर्कपांढरकवडा : नगरपरिषदेत नगराध्यक्षासह १९ पैकी १४ सदस्य निवडून देऊन पांढरकवडावासीयांनी प्रहार जनशक्ती पार्टीवर विश्वास दाखवित एकहाती सत्ता दिली.  पालिकेला विकास कामासाठी मागील चार वर्षात ४४ कोटी ६७ लाखांचा घसघशीत निधीही मिळाला. परंतु  नियोजनाचा अभाव असल्याने अनेक कामांना मुहूर्तच मिळाला नाही. दुसरीकडे मंजूर असलेली अनेक कामेही रखडलेली असल्याने शहरवासीयांचा मोठा अपेक्षाभंग झाल्याचे दिसून येते. शहरात योग्य नियोजनाअभावी  कामांवर खर्च करूनही मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात सत्ताधारी कमी पडल्याच्या नागरिकांच्या भावना आहेत. त्यामुळेच नागरिकांना विविध समस्यांचा आजही सामना करावा लागत आहे.  शासनाच्या  विविध योजनांअंतर्गत विकास कामांसाठी मिळालेल्या निधीतून विकास कामे  करण्यात आली. परंतु कामाचे नियोजन आवश्यक असताना, मूलभूत सोयी-सुविधांऐवजी इतर कामांना प्राधान्य दिले असल्याचे दिसते. 

अतिक्रमणांची समस्या कायम  शहरातील मुख्य बाजारपेठ, आठवडी बाजार परिसर, डीपी रोड,  बसवेश्वर चौक ते डायमंड चौक, शिबला पॉईंट्सह अनेक ठिकाणी अतिक्रमणांची समस्या कायम आहे. शहरातील रस्ते मोठे असूनही  व्यापाऱ्यांनी रस्त्यावरच अतिक्रमण केल्यामुळे रस्ते अरुंद बनले आहेत.

रस्त्यांची दयनीय अवस्थापावसामुळे  रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. वाहतुकीचा रस्ता असलेल्या वाय पॉईंट ते  बसवेश्वर चौकादरम्यान, बिरसा मुंडा चौक ते  स्टेट बँक रोड, तसेच वसंतराव नाईक चौक ते विश्रामगृह रोड ते बिर्सा मुंडा चौकदरम्यान मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे रहदारीस अडथळा होत आहे.

नवीन वसाहतीत घाणीचे साम्राज्यशहरात नवीन झालेल्या काही वसाहतींमध्ये नाल्यांची कामे न झाल्यामुळे सांडपाणी मोकळ्या जागेत व रस्त्यावर येत आहे. त्यामुळे दुर्गंधी पसरली आहे. नीलकंठनगरमध्ये नाल्यांचे बांधकाम न केल्याने सांडपाणी मोकळ्या जागेत जमा होत आहे. त्यामुळे डासांचा उपद्रव वाढला आहे. 

पावसाळ्यात रस्त्यांवर पाणी

पावसाळ्याच्या दिवसात नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ च्या जुन्या पुलावरून जाणाऱ्या रस्त्यावरही घाणीचे साम्राज्य पसरले आहे. येथे पावसाचे पाणी साचल्याने नागरिकांना जीव मुठीत घ्यावा लागतो. 

वारंवार वाहतूक होते ठप्प

शहराच्या मुख्य रस्त्यावर दुतर्फा भाजीपाला, फळ विक्रेते व मिठाईवाल्यांची दुकाने लागतात. त्यातच गुरांचा ठिय्याही रस्त्यावरच असतो. त्यामुळे वाहतूक वारंवार ठप्प होते. यामुळे पांढरकवडावासीय त्रस्त झाले आहेत. 

ही महत्त्वाची कामे आहेत अर्धवट स्थितीतशहराला खुनी नदीच्या पाण्याद्वारे पाणीपुरवठा होतो.  या योजनेची पाईपलाईन बदलणे आवश्यक असताना, हे काम रखडले आहे. हिंदू स्मशानभूमीवरील मोठ्या शेडचे बांधकामही सत्ताधाऱ्यांच्या  कार्यकाळात  रखडलेलेच आहे. महादेव घाट सौंदर्यीकरणाचे कामही जैसे थे आहे. 

 

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमण