शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
मोदी सरकार नववर्षाला गोड भेट देणार! १ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार
3
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
4
वाल्मीक कराडला जामीन नाकारला; संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडपीठाचा मोठा निकाल
5
भयंकर! लग्नात वाजत होता DJ; १५ वर्षांच्या मुलीला सहन झाला नाही आवाज, हार्ट अटॅकने मृत्यू
6
“किडनी विकावी लागणे शेतकऱ्यांच्या अडचणींची परीसीमा, अतिशय दुर्दैवी”; सुप्रिया सुळेंची टीका
7
'आता निष्पक्ष निवडणुका राहिलेल्या नाहीत', राजदचे खासदार मनोज कुमार झा स्पष्टच बोलले
8
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण! टाटा समुहाच्या 'या' कंपनीला सर्वाधिक फटका, IT सेक्टरचा आधार
9
ICC T20 Rankings : तिलक वर्माची उंच उडी! बटलरसह पाकिस्तानच्या साहिबजादा फरहानला फटका
10
घाई करू नका! नवीन स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी 'ही' आहे सर्वोत्तम वेळ; हमखास वाचतात तुमचे हजारो रुपये..
11
Secret Santa : अरे व्वा! ऑफिसमध्ये 'सीक्रेट सँटा'साठी गिफ्ट द्यायचंय? ५०० रुपयांपर्यंतचे झक्कास पर्याय
12
IPL 2026: "मला नवं आयुष्य दिल्याबद्दल धन्यवाद" पिवळी जर्सी मिळताच मुंबईच्या पोराची इमोशनल पोस्ट!
13
वंदे भारत की राजधानी, कोणत्या ट्रेनच्या लोको पायलटला सर्वाधिक पगार मिळतो? आकडा पाहून व्हाल थक्क
14
कर्जदारांना 'अच्छे दिन'! भारतीय अर्थव्यवस्था 'गोल्डीलॉक्स' स्थितीत; गव्हर्नर मल्होत्रा म्हणाले...
15
पहिल्याच बैठकीत जागावाटपावरून 'मविआ'त काडीमोड, पवारांच्या नेत्यांचा बैठकीतून वॉक आऊट
16
रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! वेटिंग-RAC तिकिटाची स्थिती आता १० तास आधी कळणार
17
काँग्रेसची कार्यकर्ती, वरपर्यंत ओळख असल्याचं सांगून आणायची प्रेमासाठी दबाव, त्रस्त पोलीस इन्स्पेक्टरची महिलेविरोधात तक्रार
18
मुंबई इंडियन्सची 'ती गोष्ट 'जितेंद्र भाटवडेकर'च्या मनाला लागली? रोहितसोबतचा फोटो शेअर करत म्हणाला...
19
‘टॅरिफला आता हत्यार बनवले जातेय’, निर्मला सीतारमण यांनी सांगितला 'ट्रम्प टॅरिफ'मागील खेळ...
20
ICICI Prudential AMC IPO Allotment: कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस? जीएमपीमध्येही जोरदार तेजी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात १३०० कोटींच्या खर्चानंतरही विकास शून्य

By admin | Updated: November 1, 2014 23:14 IST

जिल्ह्याच्या विकासावर गत पाच वर्षांत विविध विकास कामांवर १३०० कोटी रूपये खर्ची घातले. मात्र जिल्ह्यातील समस्या आजही जैसे थेच आहे. त्यामुळे नियोजनाच्या अंमलबजावणीवरच प्रश्नचिन्ह लागले आहे.

यवतमाळ : जिल्ह्याच्या विकासावर गत पाच वर्षांत विविध विकास कामांवर १३०० कोटी रूपये खर्ची घातले. मात्र जिल्ह्यातील समस्या आजही जैसे थेच आहे. त्यामुळे नियोजनाच्या अंमलबजावणीवरच प्रश्नचिन्ह लागले आहे. गावाकडचे रस्ते उखडले आहेत. तर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आजही कायम आहे. पर्यटनाची कामे अपूर्ण अवस्थेत आहेत.जिल्ह्याच्या विकासाचे नियोजन करून विकासकामांना दिशा देण्याचा प्रयत्न करण्यात येतो. जिल्हा नियोजन समिती याबाबत निर्णय घेते. यातून कृषी व सलग्न सेवा, ग्रामीण विकास, सामाजिक व सामुहिक सेवा, जलसंधारण व जलसंपदा, उर्जा विकास, उद्योग व खानकाम, परिवहन, सामान्यसेवा, सामान्य आर्थिक सेवा, लघु पाटबंधारे व पूरनियंत्रण, वाहतूक आणि दळणवळण या प्रमुख बाबींवर हा निधी खर्च करण्यात आला. यानंतरही या सर्वच क्षेत्रात समस्या कायम आहेत. प्रामुख्याने वाहतुकीच्या मार्गावर जागोजागी खड्डे आहेत. ऊर्जा विकासाची कामे खोळंबली आहेत. डीपीअभावी अनेक भागात वीज पुरवठा खंडित होतो. तर कृषीपंपाचे हजारो वीज जोडणी निधी अभावी खोळंबली आहे. अनेक भागात पाण्याच्या टाक्या झाल्या. मात्र काही ठिकाणी निकृष्ट कामाच्या तक्रारी आहेत. तर काही ठिकाणी थोडा निधी कमी पडल्याने पाणी पुरवठा थांबला आहे. सिंचनासाठी असलेले कालवे जागोजागी नादुरुस्त आहेत. दुरूस्ती अभावी शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहचले नाही. पर्यटनस्थळ म्हणून काही ठिकाणे जाहीर झाले. मात्र त्याला मिळणारा निधी आणि काम करण्याची गती मंद आहे. यातून या स्थळांचा विकास खोळंबला आहे. सिंचनाच्या सोयी वाढाव्या ओलीताचे क्षेत्र दुप्पट व्हावे म्हणून सुक्ष्म सिंचन आणि स्प्रिंकलवर अनुदान जाहीर झाले. मात्र सुक्ष्म सिंचनाच्या निधी अभावी आजही शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. आदीवासी बांधवाच्या प्रगतीसाठी शासनाने निधी आरक्षित केला. त्यातून विविध विकास कामे हाती घेण्यात आले. मात्र आदिवासी विकास विभागाने हा निधी दरवर्षी खर्च करण्यात आखडता हात घेतला. परिणामी निधी परत जावून दुसऱ्यावर्षी अनुदानात मर्ज झाला. मात्र लाभार्थ्यांना त्याचा फायदा मिळणे अवघड झाले. लोकप्रतिनिधीची उदासिनता आणि काम करणाऱ्या यंत्रणेचे दुर्लक्ष यातून विकास कामे प्रभावित झाली. पाच वर्षात १३०० कोटी रूपयांचा निधी वित्त विभागाकडून वळता झाला. मात्र त्यातून ठोस उपाय झाले नाही. त्यामुळे आजही जिल्हा विकासापासून कोसो दूर आहे. (शहर वार्ताहर)