शहरं
Join us  
Trending Stories
1
कारमध्ये बसून आमदार मोजत होता रोकड; ACB च्या पथकानं रंगेहाथ पकडले, काय आहे प्रकरण?
2
Maharashtra HSC Result 2025: कोकण पुन्हा नंबर 'वन'! बारावीचा निकाल जाहीर; मुलींचीच बाजी, जाणून घ्या निकाल
3
विश्वास बसला नसता...! युक्रेनने समुद्री ड्रोनद्वारे रशियाचे सुखोई फायटरजेट पाडले; अमेरिकेसह सर्व देशांच्या सैन्यांना धक्का
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवाद्यांचा आणखी एक कट उघड; गुप्तचर विभागाची माहिती, अलर्ट जारी
5
पहलगाम नरसंहाराला देशाचे गृहमंत्री अमित शाह जबाबदार; संजय राऊतांचा हल्लाबोल
6
Video - रेस्टॉरंटमध्ये टेबल न मिळाल्याने संतापले मंत्री; रातोरात बोलावली फूड सेफ्टी टीम अन्...
7
धक्कादायक! पुण्यात नऊ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार; तरुणाविरोधात गुन्हा दाखल
8
Crime News: पंखा दाखवा म्हणाले अन् दुकानदारावर गोळी झाडून निघून गेले; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
9
निवेदिता सराफ यांच्याकडून घडलेली 'ती' चूक, अशोक सराफ यांनी पत्नीला चांगलंच सुनावलं
10
"मी पाकिस्तानात राहणाऱ्या मामे बहिणीशी लग्न केलं कारण..."; जवानाने उघड केलं मोठं रहस्य
11
"हिला पण गोळी मारायला हवी"; मुस्लिमांच्या विरोधात जाऊ नका म्हणणाऱ्या सैनिकाच्या पत्नीला केलं ट्रोल
12
भारत-पाकिस्तान तणावावर आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक; बंद खोलीत चर्चेची मागणी
13
"पाकिस्तानवाल्यांनो मी तुमच्या सोबत, जय पाकिस्तान!" राखी सावंतचा व्हिडीओ पाहून संतापले नेटकरी
14
मोठी बातमी! पहलगाम नंतर पूंछ होते निशाण्यावर, दहशतवाद्यांचा मोठा कट फसला; ५ आयईडी जप्त
15
उदय कोटक यांचा रियल इस्टेट क्षेत्रात धमाका, केली देशातील सर्वात महागडी ४०० कोटींची प्रॉपर्टी डील
16
VIDEO: दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या तरुणाने पोलिसांपासून वाचण्यासाठी नदीत उडी मारली; इम्तियाजचा मृतदेह सापडल्याने खळबळ
17
लोकप्रिय 'पंचायत' सीरिजला सचिवजी देणार होते नकार? जितेंद्र कुमार म्हणाला, "मला वाटलं..."
18
"बॉलिवूड चोर आहे!" नवाजुद्दीन सिद्दीकीचं मोठं विधान, म्हणाला- "लोक या गोष्टींना कंटाळतात..."
19
Samsung ला ४४००००००००० रुपयांचा टॅक्स भरण्याचे आदेश; कंपनीने लावला Reliance Jio वर आरोप, प्रकरण काय?
20
Stock Market Today: १६० अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला, TATA Motors चा शेअर सुस्साट; ऑटो-आयटी क्षेत्रात तेजी

शिक्षकांच्या आपसी बदल्यांमध्ये आरटीई समायोजनाचा खोडा

By admin | Updated: November 1, 2014 01:18 IST

दिवाळीच्या सुटीत शिक्षकांच्या आपसी बदल्या कराव्या असे पत्र ग्रामविकास विभागाने दिले आहे. मात्र यामध्ये नमूद असलेल्या अटींमुळे आपसी बदलीच्या प्रक्रियेत खोडा निर्माण झाला आहे.

यवतमाळ : दिवाळीच्या सुटीत शिक्षकांच्या आपसी बदल्या कराव्या असे पत्र ग्रामविकास विभागाने दिले आहे. मात्र यामध्ये नमूद असलेल्या अटींमुळे आपसी बदलीच्या प्रक्रियेत खोडा निर्माण झाला आहे. बदलीसाठी अधिर झालेल्या शिक्षकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला असून जिल्हा परिषदेसमोर धरणे दिल्या जात आहे. या प्रकरणात तोडगा काढण्याचा पेच जिल्हा परिषद प्रशासनासमोर निर्माण झाला आहे.ग्रामविकास व जलसंधारण विभागाने २२ आॅगस्ट २०१४ मध्ये दिलेल्या शासन आदेशानुसार २०११-१२ या वर्षात प्रशासकीय बदलीने बदलून गेलेल्या शिक्षकांच्या आपसी बदल्या करता येणार आहे. मात्र यासाठी शिक्षणहक्क कायदा २००५ मधील तरतुदीनुसार शिक्षकांचे समायोजन करणे आवश्यक आहे. या समायोजनानंतरच आपसी बदलीची प्रक्रिया करण्याचे निर्देश या आदेशातून देण्यात आले आहे. ही अट घातल्यामुळे जिल्हा परिषद शिक्षण विभागही अडचणीत सापडला आहे. आपसी बदल्याबाबत स्पष्ट निर्देश असले तरी ती प्रक्रिया करण्यासाठी अट घालण्यात आली आहे. दिवाळीच्या सुट्या संपत असून केवळ दोन दिवसाचा कालावधी शिल्लक आहे. यामध्ये शिक्षण हक्क कायदा २००५ नुसार शिक्षकांचे समायोजन करणे शक्य नाही आणि या समायोजनापूर्वी आपसी बदल्या करता येणार नाही, अशी अटच शासन आदेशात आहे. हा तिढा सोडवायचा कसा, असा प्रश्न शिक्षण विभागापुढे निर्माण झाला आहे. तर दुसरीकडे शिक्षण विभाग सातत्याने आपसी बदल्यांसाठी टाळाटाळ करीत असल्याचे आरोप शिक्षक संघटनेकडून केले जात आहे. आपसी बदल्यांसाठी शिक्षक संघटनेने आंदोलन सुरू केले आहे. आता जिल्हा परिषद प्रशासन या प्रकरणात तोडगा काढू शकणार नाही ही बाब लक्षात आल्याने शिक्षकांनी आयुक्तांपुढे दाद मागण्याच्या हालचाली सुरू केल्या आहे. नेमका या प्रकरणात कोणता निर्णय होतो, याकडे बदली पात्र असलेल्या शिक्षकांचे लक्ष लागले आहे. शासकीय अटींच्या गुंत्यात ही बदली प्रक्रिया अडकली आहे. यावर लवकरात लवकर तोडगा काढला जावा असे निर्देशही जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आले आहे. (कार्यालय प्रतिनिधी)