शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

आदिवासींची पंढरी जागजई सुविधांपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 22:13 IST

येत्या शनिवारी, १८ मे रोजी वैशाख पौर्णिमा स्नानााठी विदर्भातील हजारो भाविक आदिवासींची पंढरी आणि काशी असलेल्या तालुक्यातील जागजई येथे येणार आहे. मात्र हे क्षेत्र अद्याप मूलभूत सुविधांपासून कोसो दूर असल्याने भाविकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

ठळक मुद्देवैशाख पौर्णिमेला स्नान : विदर्भातील हजारो भाविकांची उपस्थिती राहणार, रस्त्याअभावी भाविकांचे हाल

के.एस. वर्मा ।लोकमत न्यूज नेटवर्कराळेगाव : येत्या शनिवारी, १८ मे रोजी वैशाख पौर्णिमा स्नानााठी विदर्भातील हजारो भाविक आदिवासींची पंढरी आणि काशी असलेल्या तालुक्यातील जागजई येथे येणार आहे. मात्र हे क्षेत्र अद्याप मूलभूत सुविधांपासून कोसो दूर असल्याने भाविकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.पेरसापेन, भिमालपेन, रान, मानको, तोडोबा, कल्यासूर आदी अनेक देवतांच्या स्नानाचा वैशाख पौर्णिमा हा पवित्र दिवस आहे. त्यामुळे हजारो आदिवासी बांधव या ठिकाणीच्या पवित्र स्नानास येतात. विशेषत: यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर जिल्ह्यातील ५० ते ६० हजार आदिवासी भाविक दरवर्षी हजेरी लावतात. त्यामुळे जागजई हे आदिवासींची पंढरी आणि काशी म्हणून ओळखी जाते. वर्धा आणि यशोदा नदीच्या संगमावर हे क्षेत्र वसले आहे. वैशाख पौर्णिमेला भल्या पहाटे भाविक या देवांच्या मूर्त्यांच्या मागे वाजत-गाजत सहभागी होऊन स्नान करतात. ठिकठिकाणचे आदिवासी बांधव आपापल्या गावातील देवांची पूजा-अर्चना आटोपून या ठिकाणच्या वर्धा नदीच्या पंचधारात स्नानाकरिता दाखल होत असतात.सुंदर चवरने सजविलेले देव, गावागावातून मिरवणुकीने जागजई येथे येतात. आदिवासी बांधव त्यांचे खास पेहराव करून नृत्य करीत येथे पोहोचतात. याकरिता दोन-दोन दिवस आधीच ते आपपल्या गावातून निघतात. वैशाख स्नान म्हणजे आदिवासी देवदेवतांचे अडीच दिवसाचे माहेर मानले जाते. सोबत असलेल्या सर्व देवदेवतांना प्रथम भल्या पहाटे या संगमावर स्नान घातले जाते. जागजई तीर्थक्षेत्रास आदिवासींची ‘काशी’ असेही मानले जाते. पहाटे ४ ते सकाळी १० वाजतापर्यंत प्रथम भाविक तेथील श्रीराम मंदिर, विठ्ठल मंदिर, निगुणशी महाराज मंदिरात दर्शन घेऊन गंगास्नान करतात.जागजई ते आजनसरा (भोजाजी महाराज समाधीस्थळ) या तीन किलोमीटर क्षेत्रात वर्धा नदीचे पाणी डोह स्वरुपात बाराही महिने असते. डोह ४०-५० फूट खोल आहे. तेथील नदी उत्तरवाहिनी आहे. पाणी कधीही आटत नाही. पात्रात ५० फूट क्षेत्रात सदैव पाणी असते. त्यामुळे तापत्या उन्हातही येथे वैशाख महिन्यात ही जत्रा भरते. मात्र ही तीर्थक्षेत्र अद्याप मूलभूत सुविधांपासून कोसो दूर आहे. त्यामुळे भाविकांमध्ये संताप आहे.अंतरगाव-जागजई रस्ता अत्यंत दयनीयजागजई येथे अंतरगाव येथून जावे लागते. मात्र हा सात किलोमीटरचा रस्त्या अत्यंत दयनीय अवस्थेत आहे. रस्त्यावर केवळ खड्डे दिसतात. गावातून संगमापर्यंत पायऱ्या नाहीत. डोहानजिक पुरेशा सुविधा नाही. परिणामी दोन वर्षांपूर्वी दोन भाविकांचा डोहात बुडून मृत्यू झाला होता. त्यामुळे तेथे बचावात्मक सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. या क्षेत्राला तीर्थक्षेत्र अथवा पर्यटन क्षेत्र म्हणून मान्यता देण्याची मागणी आहे. त्यानुसार किमान मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.