शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

आदिवासींची पंढरी जागजई सुविधांपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 22:13 IST

येत्या शनिवारी, १८ मे रोजी वैशाख पौर्णिमा स्नानााठी विदर्भातील हजारो भाविक आदिवासींची पंढरी आणि काशी असलेल्या तालुक्यातील जागजई येथे येणार आहे. मात्र हे क्षेत्र अद्याप मूलभूत सुविधांपासून कोसो दूर असल्याने भाविकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

ठळक मुद्देवैशाख पौर्णिमेला स्नान : विदर्भातील हजारो भाविकांची उपस्थिती राहणार, रस्त्याअभावी भाविकांचे हाल

के.एस. वर्मा ।लोकमत न्यूज नेटवर्कराळेगाव : येत्या शनिवारी, १८ मे रोजी वैशाख पौर्णिमा स्नानााठी विदर्भातील हजारो भाविक आदिवासींची पंढरी आणि काशी असलेल्या तालुक्यातील जागजई येथे येणार आहे. मात्र हे क्षेत्र अद्याप मूलभूत सुविधांपासून कोसो दूर असल्याने भाविकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.पेरसापेन, भिमालपेन, रान, मानको, तोडोबा, कल्यासूर आदी अनेक देवतांच्या स्नानाचा वैशाख पौर्णिमा हा पवित्र दिवस आहे. त्यामुळे हजारो आदिवासी बांधव या ठिकाणीच्या पवित्र स्नानास येतात. विशेषत: यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर जिल्ह्यातील ५० ते ६० हजार आदिवासी भाविक दरवर्षी हजेरी लावतात. त्यामुळे जागजई हे आदिवासींची पंढरी आणि काशी म्हणून ओळखी जाते. वर्धा आणि यशोदा नदीच्या संगमावर हे क्षेत्र वसले आहे. वैशाख पौर्णिमेला भल्या पहाटे भाविक या देवांच्या मूर्त्यांच्या मागे वाजत-गाजत सहभागी होऊन स्नान करतात. ठिकठिकाणचे आदिवासी बांधव आपापल्या गावातील देवांची पूजा-अर्चना आटोपून या ठिकाणच्या वर्धा नदीच्या पंचधारात स्नानाकरिता दाखल होत असतात.सुंदर चवरने सजविलेले देव, गावागावातून मिरवणुकीने जागजई येथे येतात. आदिवासी बांधव त्यांचे खास पेहराव करून नृत्य करीत येथे पोहोचतात. याकरिता दोन-दोन दिवस आधीच ते आपपल्या गावातून निघतात. वैशाख स्नान म्हणजे आदिवासी देवदेवतांचे अडीच दिवसाचे माहेर मानले जाते. सोबत असलेल्या सर्व देवदेवतांना प्रथम भल्या पहाटे या संगमावर स्नान घातले जाते. जागजई तीर्थक्षेत्रास आदिवासींची ‘काशी’ असेही मानले जाते. पहाटे ४ ते सकाळी १० वाजतापर्यंत प्रथम भाविक तेथील श्रीराम मंदिर, विठ्ठल मंदिर, निगुणशी महाराज मंदिरात दर्शन घेऊन गंगास्नान करतात.जागजई ते आजनसरा (भोजाजी महाराज समाधीस्थळ) या तीन किलोमीटर क्षेत्रात वर्धा नदीचे पाणी डोह स्वरुपात बाराही महिने असते. डोह ४०-५० फूट खोल आहे. तेथील नदी उत्तरवाहिनी आहे. पाणी कधीही आटत नाही. पात्रात ५० फूट क्षेत्रात सदैव पाणी असते. त्यामुळे तापत्या उन्हातही येथे वैशाख महिन्यात ही जत्रा भरते. मात्र ही तीर्थक्षेत्र अद्याप मूलभूत सुविधांपासून कोसो दूर आहे. त्यामुळे भाविकांमध्ये संताप आहे.अंतरगाव-जागजई रस्ता अत्यंत दयनीयजागजई येथे अंतरगाव येथून जावे लागते. मात्र हा सात किलोमीटरचा रस्त्या अत्यंत दयनीय अवस्थेत आहे. रस्त्यावर केवळ खड्डे दिसतात. गावातून संगमापर्यंत पायऱ्या नाहीत. डोहानजिक पुरेशा सुविधा नाही. परिणामी दोन वर्षांपूर्वी दोन भाविकांचा डोहात बुडून मृत्यू झाला होता. त्यामुळे तेथे बचावात्मक सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. या क्षेत्राला तीर्थक्षेत्र अथवा पर्यटन क्षेत्र म्हणून मान्यता देण्याची मागणी आहे. त्यानुसार किमान मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.