शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सरकारच्या धोरणामुळे ग्रामीण भागात नैराश्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 22:17 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यवतमाळच्या दाभडीत येऊन जाहीर सभा घेतली. शेतकरी, शेतमजूर व बेरोजगारांना आश्वासने दिली. मात्र चार वर्षात एकाही आश्वासनाची पूर्तता झाली नाही. उलट शासकीय धोरणांमुळे ग्रामीण भागात नैराश्य निर्माण झाले आहे.

ठळक मुद्देशिवाजीराव मोघे : पांढरकवडा ते दाभडी आत्मक्लेश यात्रेतून पुढे आले वास्तव

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यवतमाळच्या दाभडीत येऊन जाहीर सभा घेतली. शेतकरी, शेतमजूर व बेरोजगारांना आश्वासने दिली. मात्र चार वर्षात एकाही आश्वासनाची पूर्तता झाली नाही. उलट शासकीय धोरणांमुळे ग्रामीण भागात नैराश्य निर्माण झाले आहे. प्रत्येक जण यामुळे त्रस्त आहे. यामुळेच आपण काढलेल्या पांढरकवडा ते दाभडी या आत्मक्लेश यात्रेत अनेक जण उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते, असे माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.आर्णी तालुक्यातील दाभडी येथे २०१४ मध्ये तेव्हाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी ‘चाय पे चर्चा’ कार्यक्रम घेतला होता. देशभरातील शेतकऱ्यांना येथून संबोधित केले होते. मात्र आता त्यांनी दिलेल्या एकाही आश्वासनाची पूर्तता झाली नाही. उलट दिवसेंदिवस शेतकरी, शेतमजुरांची परिस्थिती खालावत आहे. बाजारभावातही मोठी घसरण झाली आहे. कर्जमाफीच्या नावाखाली शेतकºयांना रांगेत उभे केले. आज अपेक्षा भंग झाल्याने शेतकरी आत्महत्या करीत आहे. त्याची खरी आकडेवारी दडपण्याचा प्रयत्न सरकार करीत असल्याचे वास्तव आपल्याला पदयात्रेतून अनुभवता आल्याचे मोघे यांनी सांगितले.राज्याचे मुख्यमंत्री चुकीचा निर्णय घेतात. त्यामुळेच त्यांना जनतेत जाण्याची भीती वाटते. त्यांनी नुकताच यवतमाळ दौरा रद्द केला. या उलट यवतमाळचे सुपुत्र वसंतराव नाईक मुख्यमंत्री असताना १९७२ च्या दुष्काळी स्थितीत थेट जनतेत जाऊन उपाययोजनांचा अभ्यास करीत होते. यातून रोजगार हमी सारखी योजना अस्तित्वात आली. पळपुटेपणा करणाºया सरकारला हे समजणार नाही, अशी कोपरखळीही शिवाजीराव मोघे यांनी लावली. सामाजिक न्याय मंत्री म्हणून काम करताना अनेक महत्वपूर्ण उपक्रम राबविले. परंतु आता सरकारने अशा योजनांनाच कात्री लावली. एकाही आर्थिक विकास महामंडळाकडे निधीच नसल्याचे त्यांनी सांगितले.पांढरकवडा ते दाभडी या आत्मक्लेश पदयात्रेचे अनुभव सांगताना ते म्हणाले, आता वयाची ७३ वर्षे पूर्ण झाली आहे. पदयात्रा काढण्याबाबत शारीरिक ताण येईल, अशी भीती होती. मात्र ग्रामीण भागातील जनतेची स्थिती पाहून हे दडपण झुगारुन दिले. काय होणार या पेक्षा वाईट म्हणून स्वत: पूर्णवेळ चालण्याचा निर्णय घेतला. चार दिवस पायी चालण्याने लढण्याचा आत्मविश्वास वाढला. गावागावात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महिलाही मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. प्रत्येक जण शासनाच्या चुकीच्या धोरणाने होरपळल्या होत्या. त्या दहासमोर ४२ अंश उन्हाच्या झळाही कमीच होत्या. म्हणूनच ही पदयात्रा चार दिवसात पूर्ण झाल्याचे मोघे यांनी सांगितले.