शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
2
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
3
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
4
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
5
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
6
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
7
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
8
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
9
जॉन अब्राहमच्या 'फोर्स ३'मध्ये साउथच्या या प्रसिद्ध अभिनेत्रीची झाली एन्ट्री, जाणून घ्या कोण आहे ती?
10
Dombivli Video: हात सोडला अन् ११व्या मजल्यावरून तरुण कोसळला; डोंबिवलीतील घटनेचा व्हिडीओ
11
दुहेरी हत्येच्या प्रयत्नाने दिल्ली हादरली, पतीने पत्नी आणि मुलावर झाडल्या गोळ्या 
12
'सोनम वांगचुकच्या संपर्कात पाकिस्तानी नागरिक, बांगलादेशातही गेले'; पोलिसांचा धक्कादायक खुलासा
13
संविधान रक्षणासाठी काँग्रेस काढणार दीक्षाभूमी ते सेवाग्राम ‘संविधान सत्याग्रह पदयात्रा’
14
"आम्ही जगायचं की नाही, मुख्यमंत्र्यांनी सांगावं"; लक्ष्मण हाकेंचा संतप्त सवाल, हल्ल्याचा सगळा घटनाक्रम सांगितला
15
सुंदर वहिनीला नणंदेने पळवून नेले, घरदार सोडून दोघे झाले गायब, असं फुटलं बिंग   
16
लिव्हिंग रुम, किचन अन् बेडरुम! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील 'सावत्या'ने खूपच सुंदर सजवलंय मुंबईतील आलिशान घर
17
Laxman Hake: दहा-बारा पोलीस असताना लक्ष्मण हाकेंची गाडी फोडली; बांबूने हल्ला, काय घडलं?
18
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
19
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे
20
'आज आपण संघाची सुरुवात करत आहोत', ना कुठली घोषणा, ना कुठले अतिथी; शंभर वर्षांअगोदर अशी झाली संघाची सुरवात

सरकारच्या धोरणामुळे ग्रामीण भागात नैराश्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 22:17 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यवतमाळच्या दाभडीत येऊन जाहीर सभा घेतली. शेतकरी, शेतमजूर व बेरोजगारांना आश्वासने दिली. मात्र चार वर्षात एकाही आश्वासनाची पूर्तता झाली नाही. उलट शासकीय धोरणांमुळे ग्रामीण भागात नैराश्य निर्माण झाले आहे.

ठळक मुद्देशिवाजीराव मोघे : पांढरकवडा ते दाभडी आत्मक्लेश यात्रेतून पुढे आले वास्तव

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यवतमाळच्या दाभडीत येऊन जाहीर सभा घेतली. शेतकरी, शेतमजूर व बेरोजगारांना आश्वासने दिली. मात्र चार वर्षात एकाही आश्वासनाची पूर्तता झाली नाही. उलट शासकीय धोरणांमुळे ग्रामीण भागात नैराश्य निर्माण झाले आहे. प्रत्येक जण यामुळे त्रस्त आहे. यामुळेच आपण काढलेल्या पांढरकवडा ते दाभडी या आत्मक्लेश यात्रेत अनेक जण उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते, असे माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.आर्णी तालुक्यातील दाभडी येथे २०१४ मध्ये तेव्हाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी ‘चाय पे चर्चा’ कार्यक्रम घेतला होता. देशभरातील शेतकऱ्यांना येथून संबोधित केले होते. मात्र आता त्यांनी दिलेल्या एकाही आश्वासनाची पूर्तता झाली नाही. उलट दिवसेंदिवस शेतकरी, शेतमजुरांची परिस्थिती खालावत आहे. बाजारभावातही मोठी घसरण झाली आहे. कर्जमाफीच्या नावाखाली शेतकºयांना रांगेत उभे केले. आज अपेक्षा भंग झाल्याने शेतकरी आत्महत्या करीत आहे. त्याची खरी आकडेवारी दडपण्याचा प्रयत्न सरकार करीत असल्याचे वास्तव आपल्याला पदयात्रेतून अनुभवता आल्याचे मोघे यांनी सांगितले.राज्याचे मुख्यमंत्री चुकीचा निर्णय घेतात. त्यामुळेच त्यांना जनतेत जाण्याची भीती वाटते. त्यांनी नुकताच यवतमाळ दौरा रद्द केला. या उलट यवतमाळचे सुपुत्र वसंतराव नाईक मुख्यमंत्री असताना १९७२ च्या दुष्काळी स्थितीत थेट जनतेत जाऊन उपाययोजनांचा अभ्यास करीत होते. यातून रोजगार हमी सारखी योजना अस्तित्वात आली. पळपुटेपणा करणाºया सरकारला हे समजणार नाही, अशी कोपरखळीही शिवाजीराव मोघे यांनी लावली. सामाजिक न्याय मंत्री म्हणून काम करताना अनेक महत्वपूर्ण उपक्रम राबविले. परंतु आता सरकारने अशा योजनांनाच कात्री लावली. एकाही आर्थिक विकास महामंडळाकडे निधीच नसल्याचे त्यांनी सांगितले.पांढरकवडा ते दाभडी या आत्मक्लेश पदयात्रेचे अनुभव सांगताना ते म्हणाले, आता वयाची ७३ वर्षे पूर्ण झाली आहे. पदयात्रा काढण्याबाबत शारीरिक ताण येईल, अशी भीती होती. मात्र ग्रामीण भागातील जनतेची स्थिती पाहून हे दडपण झुगारुन दिले. काय होणार या पेक्षा वाईट म्हणून स्वत: पूर्णवेळ चालण्याचा निर्णय घेतला. चार दिवस पायी चालण्याने लढण्याचा आत्मविश्वास वाढला. गावागावात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महिलाही मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. प्रत्येक जण शासनाच्या चुकीच्या धोरणाने होरपळल्या होत्या. त्या दहासमोर ४२ अंश उन्हाच्या झळाही कमीच होत्या. म्हणूनच ही पदयात्रा चार दिवसात पूर्ण झाल्याचे मोघे यांनी सांगितले.