शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
5
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
6
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
7
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
8
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
9
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
10
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
11
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
12
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
13
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
14
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
15
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
16
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
17
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
18
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
19
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
20
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 

सरकारच्या धोरणामुळे ग्रामीण भागात नैराश्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 22:17 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यवतमाळच्या दाभडीत येऊन जाहीर सभा घेतली. शेतकरी, शेतमजूर व बेरोजगारांना आश्वासने दिली. मात्र चार वर्षात एकाही आश्वासनाची पूर्तता झाली नाही. उलट शासकीय धोरणांमुळे ग्रामीण भागात नैराश्य निर्माण झाले आहे.

ठळक मुद्देशिवाजीराव मोघे : पांढरकवडा ते दाभडी आत्मक्लेश यात्रेतून पुढे आले वास्तव

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यवतमाळच्या दाभडीत येऊन जाहीर सभा घेतली. शेतकरी, शेतमजूर व बेरोजगारांना आश्वासने दिली. मात्र चार वर्षात एकाही आश्वासनाची पूर्तता झाली नाही. उलट शासकीय धोरणांमुळे ग्रामीण भागात नैराश्य निर्माण झाले आहे. प्रत्येक जण यामुळे त्रस्त आहे. यामुळेच आपण काढलेल्या पांढरकवडा ते दाभडी या आत्मक्लेश यात्रेत अनेक जण उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते, असे माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.आर्णी तालुक्यातील दाभडी येथे २०१४ मध्ये तेव्हाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी ‘चाय पे चर्चा’ कार्यक्रम घेतला होता. देशभरातील शेतकऱ्यांना येथून संबोधित केले होते. मात्र आता त्यांनी दिलेल्या एकाही आश्वासनाची पूर्तता झाली नाही. उलट दिवसेंदिवस शेतकरी, शेतमजुरांची परिस्थिती खालावत आहे. बाजारभावातही मोठी घसरण झाली आहे. कर्जमाफीच्या नावाखाली शेतकºयांना रांगेत उभे केले. आज अपेक्षा भंग झाल्याने शेतकरी आत्महत्या करीत आहे. त्याची खरी आकडेवारी दडपण्याचा प्रयत्न सरकार करीत असल्याचे वास्तव आपल्याला पदयात्रेतून अनुभवता आल्याचे मोघे यांनी सांगितले.राज्याचे मुख्यमंत्री चुकीचा निर्णय घेतात. त्यामुळेच त्यांना जनतेत जाण्याची भीती वाटते. त्यांनी नुकताच यवतमाळ दौरा रद्द केला. या उलट यवतमाळचे सुपुत्र वसंतराव नाईक मुख्यमंत्री असताना १९७२ च्या दुष्काळी स्थितीत थेट जनतेत जाऊन उपाययोजनांचा अभ्यास करीत होते. यातून रोजगार हमी सारखी योजना अस्तित्वात आली. पळपुटेपणा करणाºया सरकारला हे समजणार नाही, अशी कोपरखळीही शिवाजीराव मोघे यांनी लावली. सामाजिक न्याय मंत्री म्हणून काम करताना अनेक महत्वपूर्ण उपक्रम राबविले. परंतु आता सरकारने अशा योजनांनाच कात्री लावली. एकाही आर्थिक विकास महामंडळाकडे निधीच नसल्याचे त्यांनी सांगितले.पांढरकवडा ते दाभडी या आत्मक्लेश पदयात्रेचे अनुभव सांगताना ते म्हणाले, आता वयाची ७३ वर्षे पूर्ण झाली आहे. पदयात्रा काढण्याबाबत शारीरिक ताण येईल, अशी भीती होती. मात्र ग्रामीण भागातील जनतेची स्थिती पाहून हे दडपण झुगारुन दिले. काय होणार या पेक्षा वाईट म्हणून स्वत: पूर्णवेळ चालण्याचा निर्णय घेतला. चार दिवस पायी चालण्याने लढण्याचा आत्मविश्वास वाढला. गावागावात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महिलाही मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. प्रत्येक जण शासनाच्या चुकीच्या धोरणाने होरपळल्या होत्या. त्या दहासमोर ४२ अंश उन्हाच्या झळाही कमीच होत्या. म्हणूनच ही पदयात्रा चार दिवसात पूर्ण झाल्याचे मोघे यांनी सांगितले.