शहरं
Join us  
Trending Stories
1
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
2
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
3
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
4
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
5
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
6
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
7
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
8
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
9
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
10
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
11
भारीच! महागडे प्रोडक्ट सोडा... गळणाऱ्या केसांवर रामबाण उपाय; एकदा करून बघाच
12
“मुंबईच्या गरब्यात सेलिब्रिटींवर लाखोंची उधळण, तेच पैसे शेतऱ्यांना दिले असते”: रोहित पाटील
13
Video: अमानवीय! आधी टक्कर मारली, मग गाडीखाली चिरडले; बैलाची अतिशय क्रुर हत्या...
14
इंट्राडे उच्चांकावरून थेट ११% घसरला हा शेअर, गुंतवणूकदारांना मोठा फटका; रेखा झुनझुनवालांचीही गुंतवणूक
15
Bhiwandi Crime: तोंडात कुरकुरे अन् निपचित पडलेला मृतदेह; कोर्टातून फरार झालेल्या आरोपीचा चिमुकलीवर अत्याचार
16
सचिन तेंडुलकरची गुंतवणूक असलेला शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% वधारला! दिला जातोय खरेदीचा सल्ला
17
Navi Mumbai Crime: इन्स्टाग्रावर ओळख, वाशीमध्ये भेटायला बोलावले; 16 वर्षाच्या मुलीवर कारमध्येच...
18
Kojagiri Purnima 2025:कोजागरी पौर्णिमेला चंद्र प्रकाश अंगावर घ्यावा असे म्हणतात; का ते माहितीय?
19
मुंबई-पुण्यात घरांच्या विक्रीत १७% घट; 'या' कारणांमुळे ग्राहकांनी फिरवली पाठ; किमती कमी होणार का?
20
‘आयुष्मान भारत’ योजना बंद पडली? नागपूरच्या रुग्णालयांमध्ये उघडकीस आले धक्कादायक वास्तव; रुग्णांना सेवा नाकारल्या

सिंचनासाठी पाणी वापर संस्थाच उदासीन

By admin | Updated: September 21, 2015 02:16 IST

खरीप हंगाम शेवटच्या चरणात आला असून लवकरच रबी हंगाम सुरू होणार आहे

कामकाजावर प्रश्न चिन्ह : सिंचन क्षेत्र घटण्याची शक्यता यवतमाळ : खरीप हंगाम शेवटच्या चरणात आला असून लवकरच रबी हंगाम सुरू होणार आहे. सिंचनासाठी पाणी वाटपाचे नियोजन करण्याची जबाबदारी प्रामुख्याने पाणी वापर संस्थांकडे आहे. मात्र रबी पूर्वीच जिल्ह्यातील पाणी वापर संस्थांमध्ये निरुत्साह दिसत असून यामुळे सिंचन प्रभावित होण्याची शक्यता आहे. यवतमाळ जिल्ह्यात १४० पाणी वापर संस्थांची नोंद पाटबंधारे विभागाकडे आहे. त्यापैकी ९० पाणी वापर संस्था विविध विभागात हस्तांतरित करण्यात आल्या आहे. जिल्ह्यातील प्रकल्पांमधून मोठ्या प्रमाणात सिंचन करता यावे, या पाण्याचा वापर योग्य प्रमाणात करता यावा म्हणून पाणी वापर संस्थांकडे धरणाचे क्षेत्र हस्तांतरित करण्याचे काम पाटबंधारे विभागाने हाती घेतले आहे. त्या दृष्टीने पाटबंधारे विभाग काम करीत आहे. मात्र गाव पातळीवरील पाणी वापर संस्था मात्र उदासीन दिसत आहे. त्यामुळे सिंचन क्षेत्रात वाढ होण्याची प्रक्रिया मंदावली आहे. पाण्याच्या बाबतीत शेतकऱ्यांना जागरुक करणे आणि पाण्याचा कर भरुन घेण्यासोबत कालव्यातील अडचणी दूर सारण्याचे काम या संस्थांकडे असते. प्रत्येक प्रश्नाचा पाठपुरावा करण्याची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. मात्र असे असतानाही संस्था त्या दृष्टीने फारश्या प्रयत्नशील दिसत नाही. त्यामुळे सिंचनाच्या मूळ उद्देशालाच तडा जात आहे.या संस्थांवर आलेली मरगळ झटकण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. तसेच शेतकऱ्यांनाही प्रशिक्षण देण्याची आवश्यकता आहे. याला काही संस्था अपवाद असल्या तरी मोठ्या प्रमाणात संस्था पाणी वाटपाबाबत उदासीन दिसत आहे. (शहर वार्ताहर)