शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
2
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
3
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
4
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
5
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
6
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
7
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय
8
३२ विमानतळ पुन्हा सुरू करण्याची तयारी; भारत-पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे होती बंद
9
पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा
10
संरक्षण दलांना राज्यात सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री; तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक
11
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सायबर हल्ल्यांचा आकडा १५ लाखांवर; फक्त १५० यशस्वी, सायबर विभागाचा तपास
12
दहावीचा निकाल आज... मित्रांनो, मनासारखे नाही झाले, तरी हार मानू नका 
13
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा; पिकांनी टाकल्या माना, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
14
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील जखमी म्हणतात, आजही तेथून जाताना हृदयात चर्रर्र होतं
15
नवीन होर्डिंग धोरण वर्षभरानंतरही कागदावरच! घाटकोपर दुर्घटनेला वर्ष होऊनही महापालिका गप्पच
16
शाहरुख खानच्या ‘त्या’ कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला ६२ लाखांची भरपाई योग्यच; हायकोर्टाचे आदेश
17
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
18
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
19
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
20
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती

सिंचनासाठी पाणी वापर संस्थाच उदासीन

By admin | Updated: September 21, 2015 02:16 IST

खरीप हंगाम शेवटच्या चरणात आला असून लवकरच रबी हंगाम सुरू होणार आहे

कामकाजावर प्रश्न चिन्ह : सिंचन क्षेत्र घटण्याची शक्यता यवतमाळ : खरीप हंगाम शेवटच्या चरणात आला असून लवकरच रबी हंगाम सुरू होणार आहे. सिंचनासाठी पाणी वाटपाचे नियोजन करण्याची जबाबदारी प्रामुख्याने पाणी वापर संस्थांकडे आहे. मात्र रबी पूर्वीच जिल्ह्यातील पाणी वापर संस्थांमध्ये निरुत्साह दिसत असून यामुळे सिंचन प्रभावित होण्याची शक्यता आहे. यवतमाळ जिल्ह्यात १४० पाणी वापर संस्थांची नोंद पाटबंधारे विभागाकडे आहे. त्यापैकी ९० पाणी वापर संस्था विविध विभागात हस्तांतरित करण्यात आल्या आहे. जिल्ह्यातील प्रकल्पांमधून मोठ्या प्रमाणात सिंचन करता यावे, या पाण्याचा वापर योग्य प्रमाणात करता यावा म्हणून पाणी वापर संस्थांकडे धरणाचे क्षेत्र हस्तांतरित करण्याचे काम पाटबंधारे विभागाने हाती घेतले आहे. त्या दृष्टीने पाटबंधारे विभाग काम करीत आहे. मात्र गाव पातळीवरील पाणी वापर संस्था मात्र उदासीन दिसत आहे. त्यामुळे सिंचन क्षेत्रात वाढ होण्याची प्रक्रिया मंदावली आहे. पाण्याच्या बाबतीत शेतकऱ्यांना जागरुक करणे आणि पाण्याचा कर भरुन घेण्यासोबत कालव्यातील अडचणी दूर सारण्याचे काम या संस्थांकडे असते. प्रत्येक प्रश्नाचा पाठपुरावा करण्याची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. मात्र असे असतानाही संस्था त्या दृष्टीने फारश्या प्रयत्नशील दिसत नाही. त्यामुळे सिंचनाच्या मूळ उद्देशालाच तडा जात आहे.या संस्थांवर आलेली मरगळ झटकण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. तसेच शेतकऱ्यांनाही प्रशिक्षण देण्याची आवश्यकता आहे. याला काही संस्था अपवाद असल्या तरी मोठ्या प्रमाणात संस्था पाणी वाटपाबाबत उदासीन दिसत आहे. (शहर वार्ताहर)