शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

विदर्भ राज्याची मागणी सर्वात जुनी

By admin | Updated: November 15, 2014 22:53 IST

स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी महाराष्ट्र, मुंबई व इतर राज्यांच्या मागणीपेक्षाही जुनी असल्याचे प्रतिपादन सर्वाेच्च न्यायालय (दिल्ली) चे अधिवक्ता श्रीहरी अणे यांनी केले.

श्रीहरी अणे : ‘स्वतंत्र विदर्भाची आर्थिक व कायदेशीर बाजू’वर व्याख्यानयवतमाळ : स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी महाराष्ट्र, मुंबई व इतर राज्यांच्या मागणीपेक्षाही जुनी असल्याचे प्रतिपादन सर्वाेच्च न्यायालय (दिल्ली) चे अधिवक्ता श्रीहरी अणे यांनी केले. लोकनायक बापूजी अणे महिला महाविद्यालयात आयोजित ‘जाणून घेऊया, स्वतंत्र विदर्भाची आर्थिक व कायदेशीर बाजू’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार दिवाकरराव पांडे होते. प्रमुख पाहुणे जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. राजेश चव्हाण, अ‍ॅड. रुपेश अमरावत, अ‍ॅड. बालाजी येरावार, प्राचार्य डॉ. विनायक भिसे, अ‍ॅड. मुकेश समर्थ उपस्थित होते. विदर्भ राज्य अतिशय प्राचीन आहे. आज राज्यकर्ते मराठी भाषिक दोन किंवा त्यापेक्षा अधिक राज्य नको असे सांगतात. ते धादांत खोटे असून इतिहासाशी साधर्म्य सांगणारे नाही. १८७० साली नागपुरात भोसलेंचे राज्य होते. त्याचवेळी मराठवाड्यात आजच्या मध्य प्रदेशात व इतरत्र मराठ्यांचे मराठी राज्य अस्तित्वात होते. त्यापूर्वी १८५६ मध्येही सी पी अ‍ॅन्ड बेरार नावाने हा प्रांत वेगळा होता. त्यावेळी नागपूर हीच विदर्भाची राजधानी होती. १९०५ साली इंग्रजांनीसुद्धा स्वतंत्र विदर्भासाठी प्रयत्न केलेले आढळतात. १९३८ साली तसा ठराव पारित झाला होता. १९४७ साली अकोला करार झाला होता. परंतु या कराराची अंमलबजावणीच झाली नाही. १९२७ मध्ये मद्रास येथे झालेल्या काँग्रेसच्या अधिवेशनातसुद्धा विदर्भ राज्याचा ठराव पारित झाला होता. याबाबत नेमण्यात आलेल्या जेव्हीपी कमेटीने स्वातंत्र्यानंतर १९४८ साली स्वतंत्र विदर्र्र्र्भाची शिफारस केली होती. या कमेटीत जे म्हणजे जवाहरलाल नेहरू आणि व्ही म्हणजे वल्लभभाई पटेल हे होते. असे असताना ही मागणी पुन्हा मागे पडल्याचे अ‍ॅड. अणे म्हणाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनीसुद्धा विदर्भाचे अस्तित्व कायम ठेवा, असे घटनेत सांगितल्याचे त्यांनी म्हटले. विदर्भाची आर्थिक स्थिती यापूर्वीसुद्धा अतिशय चांगली होती. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांसारखे प्रकार शासनाच्या नाकर्तेपणामुळे आता घडत असल्याचे ते म्हणाले. संयुक्त चळवळ ही मुंबईसाठी होती ती विदर्भासाठी नव्हती, असेही त्यांनी स्पष्ट केले. आज ‘जय विदर्भ’म्हणण्यावरसुद्धा आक्षेप घेण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. आम्हाला जय महाराष्ट्र म्हणण्याचाही अभिमानच आहे. परंतु विदर्भ वेगळा हवा असल्याचे ते म्हणाले. यावेळी माजी मंत्री राजाभाऊ ठाकरे, माजी प्राचार्य शंकरराव सांगळे, रेखा कोठेकर आदींसह शहरातील वकील व प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)