शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
2
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
3
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
4
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
5
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
6
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
7
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
8
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
9
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ
10
Nobel Prize: सुसुमू कितागावा, रिचर्ड रॉबसन आणि उमर याघी यांना रसायनशास्त्रातील नोबेल जाहीर
11
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे
12
ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकत इतिहास रचला! त्या अमन सेहरावतला आखाड्यात उतरण्यावर बंदी; जाणून घ्या कारण
13
पुण्यातील विठ्ठल भक्तांवर पंढरपुरात हल्ला करणारे 'ते' तिघे कोण? वाद इतका विकोपाला का गेला?
14
पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन; मुंबई-पुणेकरांना मोठा दिलासा!
15
देशातल्या खासगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकेनं दिलं खास दिवाळी गिफ्ट, आपल्याला कसा होणार फायदा? जाणून घ्या
16
प्रीमियम लूक, इंटीरियरमध्ये लक्झरी आणि स्पोर्टी टच; टोयोटा फॉर्च्यूनर लीडर भारतात लॉन्च!
17
रशियात शिकायला गेला आणि सैन्यात भरती झाला, अखेर युक्रेनी सैन्यासमोर सरेंडर, गुजराती तरुणासोबत काय घडलं? 
18
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता एकाच App मध्ये मिळणार बस, ट्रेन आणि मेट्रोचे तिकीट...
19
बॉलिवूड हादरलं! 'झुंड' फेम अभिनेत्याची निर्घृण हत्या, अर्धनग्नावस्थेत आढळला प्रियांशूचा मृतदेह
20
"मी जेहच्या खोलीत आलो, चोर त्याच्या बेडवर...", सैफने सांगितला घटनाक्रम, काजोल झाली भावुक

यवतमाळ जिल्हा बॅंकेची निवडणूक तत्काळ घ्या; उमेदवारांचे साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 15:22 IST

Yawatmal News Election यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या संचालक मंडळाची निवडणूक तत्काळ घ्या यासाठी ५ उमेदवारांनी मंगळवारी सायंकाळी  जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे साकडे घातले.

ठळक मुद्देसर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची पूर्तता करण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्क  यवतमाळ: कोरोनामुळे सुमारे दहा महिन्यांपासून लांबलेली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या संचालक मंडळाची निवडणूक तत्काळ घ्या आणि सर्वोच्च न्यायालयाच्या ९ सप्टेंबरच्या आदेशाची अंमलबजावणी करा यासाठी ५ उमेदवारांनी मंगळवारी सायंकाळी  जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे साकडे घातले. या निवेदनावर वसंत घुईखेडकर, शैलजा बोबडे, मनीष पाटील,  प्रफुल्ल मानकर आणि शंकरअण्णा नालमवार या पाच उमेदवारांच्या स्वाक्षऱ्या आहेत. हे निवेदन विभागीय सहनिबंधक अमरावती, सहकारी निवडणूक प्राधिकरण पुणे यांनाही पाठविण्यात आले आहे. 

जिल्हा बॅंक संचालक मंडळाची निवडणूक २६ मार्च २०२० ला होऊ घातली होती. परंतु निवडणुकीच्या दोन दिवस आधीच कोरोनामुळे लॉकडाऊन लागल्याने ही निवडणूक थांबविण्यात आली. मात्र या निवडणुकीची आचारसंहिता आजही लागू आहे. सर्वोच्च न्यायालयाने ९ सप्टेंबर २०२० रोजी ही निवडणूक तातडीने घेण्याचे निर्देश दिले होते. मात्र त्यानंतरही कोरोनाचे निमित्त करून सहकारी निवडणूक प्राधिकरण हे निवडणूक घेणे टाळत आहे. लाखो मतदार असलेल्या विधानसभा, विधान परिषदेच्या निवडणुका होत असताना अवघ्या दीड हजार मतदार असलेल्या जिल्हा बॅंक निवडणुकीच्या मतदानालाच कोरोनाचा अडथळा का असा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. निवडणुकीसाठी जिल्ह्यात २९ मतदान केंद्र आणि मतमोजणी केंद्रही निश्चीत झाले असताना प्रत्यक्ष मतदानाच्या तारखा जाहीर करण्यास विलंब का असा सवाल या उमेदवारांनी उपस्थित केला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची निवडणूक घेण्यासंबंधी तत्काळ अंमलबजावणी करावी अन्यथा आम्हाला अवमान याचिका दाखल करण्याशिवाय पर्याय राहणार नाही, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. दरम्यान कॉंग्रेसच्याच काही नेत्यांनी जिल्ह्यातील महाविकास आघाडी प्रमुखाकडे जिल्हा बॅंकेची निवडणूक घेण्याचा आग्रह धरला असता त्यांना १९ डिसेंबर ही तारीख देण्यात आल्याचेही सांगितले जाते.लांबलेल्या निवडणुकीचे मूळ दिग्रसमध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची निवडणूक लांबण्यामागे सत्ताधाऱ्यांचे राजकारण असल्याची चर्चा सहकार क्षेत्रात आहे. दिग्रस विधानसभा मतदारसंघामुळे ही निवडणूक लांबल्याचे बोलले जाते. तेथे महाविकास आघाडीच्या उमेदवारांची लढत भाजप समर्थित पॅनलच्या उमेदवाराशी आहे. तेथे महाविकास आघाडीपुढे मोठे आव्हानही आहे. मतदार खेचण्यासाठी पडद्यामागून जोरदार हालचाली केल्या जात आहेत. त्यातूनच राजकीय दबाव वापरुन ही निवडणूक लांबणीवर टाकण्याचा प्रयत्न होत असल्याचे बोलले जाते. या विलंबामागे गायब झालेल्या तीन मतदारांचा शोध घेण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा हा अजेंडा असल्याची चर्चा आहे.

टॅग्स :Electionनिवडणूक