शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

यवतमाळ जिल्हा बॅंकेची निवडणूक तत्काळ घ्या; उमेदवारांचे साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 15:22 IST

Yawatmal News Election यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या संचालक मंडळाची निवडणूक तत्काळ घ्या यासाठी ५ उमेदवारांनी मंगळवारी सायंकाळी  जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे साकडे घातले.

ठळक मुद्देसर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची पूर्तता करण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्क  यवतमाळ: कोरोनामुळे सुमारे दहा महिन्यांपासून लांबलेली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या संचालक मंडळाची निवडणूक तत्काळ घ्या आणि सर्वोच्च न्यायालयाच्या ९ सप्टेंबरच्या आदेशाची अंमलबजावणी करा यासाठी ५ उमेदवारांनी मंगळवारी सायंकाळी  जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे साकडे घातले. या निवेदनावर वसंत घुईखेडकर, शैलजा बोबडे, मनीष पाटील,  प्रफुल्ल मानकर आणि शंकरअण्णा नालमवार या पाच उमेदवारांच्या स्वाक्षऱ्या आहेत. हे निवेदन विभागीय सहनिबंधक अमरावती, सहकारी निवडणूक प्राधिकरण पुणे यांनाही पाठविण्यात आले आहे. 

जिल्हा बॅंक संचालक मंडळाची निवडणूक २६ मार्च २०२० ला होऊ घातली होती. परंतु निवडणुकीच्या दोन दिवस आधीच कोरोनामुळे लॉकडाऊन लागल्याने ही निवडणूक थांबविण्यात आली. मात्र या निवडणुकीची आचारसंहिता आजही लागू आहे. सर्वोच्च न्यायालयाने ९ सप्टेंबर २०२० रोजी ही निवडणूक तातडीने घेण्याचे निर्देश दिले होते. मात्र त्यानंतरही कोरोनाचे निमित्त करून सहकारी निवडणूक प्राधिकरण हे निवडणूक घेणे टाळत आहे. लाखो मतदार असलेल्या विधानसभा, विधान परिषदेच्या निवडणुका होत असताना अवघ्या दीड हजार मतदार असलेल्या जिल्हा बॅंक निवडणुकीच्या मतदानालाच कोरोनाचा अडथळा का असा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. निवडणुकीसाठी जिल्ह्यात २९ मतदान केंद्र आणि मतमोजणी केंद्रही निश्चीत झाले असताना प्रत्यक्ष मतदानाच्या तारखा जाहीर करण्यास विलंब का असा सवाल या उमेदवारांनी उपस्थित केला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची निवडणूक घेण्यासंबंधी तत्काळ अंमलबजावणी करावी अन्यथा आम्हाला अवमान याचिका दाखल करण्याशिवाय पर्याय राहणार नाही, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. दरम्यान कॉंग्रेसच्याच काही नेत्यांनी जिल्ह्यातील महाविकास आघाडी प्रमुखाकडे जिल्हा बॅंकेची निवडणूक घेण्याचा आग्रह धरला असता त्यांना १९ डिसेंबर ही तारीख देण्यात आल्याचेही सांगितले जाते.लांबलेल्या निवडणुकीचे मूळ दिग्रसमध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची निवडणूक लांबण्यामागे सत्ताधाऱ्यांचे राजकारण असल्याची चर्चा सहकार क्षेत्रात आहे. दिग्रस विधानसभा मतदारसंघामुळे ही निवडणूक लांबल्याचे बोलले जाते. तेथे महाविकास आघाडीच्या उमेदवारांची लढत भाजप समर्थित पॅनलच्या उमेदवाराशी आहे. तेथे महाविकास आघाडीपुढे मोठे आव्हानही आहे. मतदार खेचण्यासाठी पडद्यामागून जोरदार हालचाली केल्या जात आहेत. त्यातूनच राजकीय दबाव वापरुन ही निवडणूक लांबणीवर टाकण्याचा प्रयत्न होत असल्याचे बोलले जाते. या विलंबामागे गायब झालेल्या तीन मतदारांचा शोध घेण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा हा अजेंडा असल्याची चर्चा आहे.

टॅग्स :Electionनिवडणूक