शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

गारपीटग्रस्तांच्या पुनर्सर्वेक्षणाची मागणी

By admin | Updated: May 14, 2014 02:07 IST

यंदाचा रबी हंगाम गारपिटीमुळे पूर्णत: नष्ट झाला. यामुळे जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला. अतवृष्टीने खचलेल्या शेतकऱ्यांना रबी हंगामात तडाखा बसल्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले.

यवतमाळ : यंदाचा रबी हंगाम गारपिटीमुळे पूर्णत: नष्ट झाला. यामुळे जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला. अतवृष्टीने खचलेल्या शेतकऱ्यांना रबी हंगामात तडाखा बसल्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. वादळ व गारपिटीमुळे गहू, हरभरा, ओलिताची कपाशी, संत्रा, मोसंबी, लिंबू, पपई, आंबा या फळबागांचे नुकसान झाले. गारपिटग्रस्तांच्या सर्वेक्षणामध्ये मोठय़ा प्रमाणात चालढकल करण्यात आली असून गारपिटग्रस्तांचे पुनर्सर्वेक्षण करावे या मागणीसाठी शिवसेनेने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली.गारपीटग्रस्तांची विवंचना लक्षात घेऊन शासनाने आर्थिक सहाय्य करण्याचा निर्णय घेतला. मात्र नुकसानीचे सर्वेक्षण करताना निम्नस्तरीय शासकीय यंत्रणेने मोठय़ा प्रमाणात चालढकल केली. गारपीट झालेल्या क्षेत्रातील काही शेतकऱ्यांच्या नुकसानीचे सर्वेक्षण केले. तर काही शेतकऱ्यांच्या नुकसानीचे सर्वेक्षणच केले नाही. गारपिट झाली तेव्हा अनेक शेतकऱ्यांच्या शेतात ओलिताची कपाशी होती. परंतु कापूस या पिकाच्या नुकसानीची भरपाई द्यायची नाही, असा निर्णय शासनाने घेतला आहे. गहू, हरभरा, फळबागांच्या नुकसानीच्या तुलनेत शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत मिळाली. सर्वेक्षणापेक्षा जादा प्रमाणात नुकसान झाले आहे. पिकांची पैसेवारी ५0 टक्क्यांपेक्षा कमी असताना शेतकऱ्यांना दुष्काळाच्या सवलती मिळालेल्या नाही, असा आरोप शिवसेनेने केला आहे.जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनामध्ये गारपीट व वादळग्रस्त सर्व शेतकऱ्यांच्या नुकसानीचे सर्वेक्षण करण्यात यावे, गारपीटग्रस्तांना वाढीव अर्थसहाय्य देण्यात यावे, ओलिताच्या कपाशीचा विचार व्हावा, दुष्काळीस्थितीत मिळणार्‍या सवलती देण्यात याव्या, शेतकऱ्यांकडील बँक कर्जाचे पुनर्गठण करण्यात यावे आदी मागण्या ठेवण्यात आल्या होत्या.यावेळी खासदार भावना गवळी, आमदार संजय राठोड, माजी आमदार श्रीकांत मुनगिनवार, विश्‍वास नांदेकर, नामदेव खोब्रागडे, माया राणे, प्रवीण पांडे, गजानन डोमाळे, श्रीधर मोहोड, पवन जयस्वाल, बाबू पाटील जैत, शैलेश ठाकूर, हरिहर लिंगनवार, विनोद जयसिंगपुरे, महेश नाईक, भाऊराव ढवळे, गजानन बेजंकिवार, गजानन भोकरे, अभय व्यास, अतुल गुल्हाने यांच्यासह शिवसैनिकांची मोठय़ा संख्येने उपस्थिती होती.(शहर प्रतिनिधी)